Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORY

Raj Thakrey speech – रायगडावरील शिवसमाधी आणि टिळक

1 Mins read

रायगडावरील शिवसमाधी आणि टिळक

अनिल माने

 

Raj Thakrey speech महात्मा फुलेंनी १८६९ मध्ये किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीची स्वच्छता केली आणि पुण्यात शिवजयंती उत्सव सुरु झाला. शिवसमाधीच्या देखभालीसाठी त्यांनी मुंबई गव्हर्नरकडून अनुदान मंजूर करुन घेतले.

न्या.रानडेंनी १८८५ मध्ये शिवरायांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णोद्धारासाठी स्थानिक प्रशासनाकडून फंड मिळवण्यासाठी पुण्यात सभा घेतली.

राजर्षी शाहू महाराजांचा १८९४ मध्ये आपल्या राज्याभिषेकावेळी शिवशक पुन्हा चालू केला. त्यापूर्वीच त्यांचे वडील आबासाहेब घाटगे यांनी रायगडावर इंजिनिअर पाठवून शिवसमाधीच्या जिर्णोद्धारासाठी आराखडाही तयार केला होता, पण दुर्दैवाने आबासाहेबांचे निधन झाले.

Raj Thakrey speech  शाहू महाराजांनी जेव्हा रायगडावरील शिवसमाधीचा विषय हाती घेतला तेव्हा टिळकांनी पुण्यात सभा घेऊन त्यात खोडा घातला. ही समाधी एकट्या शाहू महाराजांऐवजी सर्व जनतेच्या आर्थिक योगदानातुन व्हावी अशी त्यांनी घोषणा केली.

टिळकांनी १८९५ मध्ये रायगडावरील शिवसमाधीचा जीर्णोद्धार करायचा म्हणुन निधी उभा करण्यासाठी पुण्यात सभा घेऊन “शिवाजी फंड” समिती काढली. लोकांनीही शिवरायांच्या समाधीसाठी उत्स्फूर्तपणे मदत केली. शाहू महाराजांनी शिवाजी क्लब, शिवाजी फंडसाठी मोठी मदत केली. पण टिळकांनी त्यावेळी शिवसमाधीच्या जिर्णोद्धारासाठी जमा झालेला निधी १८९६ मध्ये रायगडावरील शिवाजी उत्सवासाठी खर्च केला.

पुढे १९०१ च्या वेदोक्त प्रकरणात टिळकांनी छत्रपती शाहू महाराजांविरोधात भूमिका घेतली आणि रायगडावरील शिवसमाधीचा विषय रखडत गेला. ज्या शिवाजी क्लबला शाहू महाराजांनी मदत केली तो क्लबही शाहू महाराजांच्या विरोधात कारवाया करु लागला.

पुढे शिवसमाधीच्या जिर्णोद्धारासाठी जमा केलेले सर्व पैसे (८० हजार रुपये अशी रक्कम सांगितली जाते) ज्या बँकेत ठेवले होते, ती डेक्कन बँक बुडाल्याने सगळा पैसा बुडाला असे कारण सांगून टिळकांनी शिवसमाधी जिर्णोद्धाराच्या विषयापासून हात झटकले.

टिळक आणि कंपूची शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराच्या कामाबाबतची निष्क्रियता पाहून १९१७ मध्ये शाहू महाराजांनी पुण्यात शिवरायांचे भव्य स्मारक उभे करण्याचा निर्णय घेतला. १९२० मध्ये टिळकांचा मृत्यू झाला. त्यानंतर १९२१ मध्ये शाहू महाराजांनी पुण्यातील शिवस्मारकाची पायाभरणी केली.

ते पाहून टिळकांच्या इशाऱ्यावर शाहू महाराजांना स्वराज्यद्रोही छत्रपती म्हणणाऱ्या न.चि.केळकर आणि इतर टिळक अनुयायांनी पुन्हा एकदा रायगडावरील शिवसमाधी कामाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. पुन्हा एकदा निधी उभा राहिला. यात शिवप्रेमी होळकरांनी मोठी मदत केली.

ब्रिटिशांनीही मोठी मदत केली आणि त्यातून १९२७ मध्ये रायगडावरील शिवसमाधीचे काम पूर्ण झाले. तर इकडे १९२८ मध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या प्रयत्नातून त्यांच्या वारसांनी पुण्यात शिवरायांचा जगातील पहिला पुतळा उभा केला.

Raj Thakrey speech टिळकांच्या वेळी रायगडावरील शिवसमाधीची एकही वीट न रचता जमा झालेले ८० हजार रुपये डेक्कन बँकेसोबतच बुडीत गेले होते. परंतु राजर्षी शाहू महाराजांनी लोकांच्या हृदयात शिवस्मारक उभे केले.

Raj Thakrey speech रायगडावरील शिवसमाधीचा विषय शाहू महाराज स्वखर्चाने वेळेत मार्गी लावायला तयार असताना टिळकांनी विनाकारण त्यात खोडा घातला आणि शिवसमाधी पूर्णत्वास यायला जवळपास ३०-३२ वर्ष उशीर झाला.

त्यातही टिळकांनी शिवसमाधीसाठी गोळा झालेला काही निधी शिवाजी उत्सवावर खर्च केला आणि उरलेला निधी ज्या डेक्कन बँकेत ठेवला होता ती बँक बुडाल्याने तो निधीही बुडीत गेल्याचे कारण सांगून शिवसमाधीच्या कामात वेळकाढूपणा केला.

सत्यशोधक दिनकरराव यांनी तर “देशाचे दुष्मन” या पुस्तकात बुडालेल्या निधीबाबत टिळकांवर भ्रष्टाचाराचे फार गंभीर आरोप केले होते. त्याविरुद्ध टिळक कंपू न्यायालयात गेला. त्यावेळी जवळकरांची केस डॉ.बाबासाहेब आंबेडकर लढले आणि त्यांनी जवळकरांची निर्दोष मुक्तता केली. Raj Thakrey speech शिवसमाधीसाठी गोळा केलेला निधी टिळकांनी काय केला हा प्रश्न तेव्हाही होता, आजही आहे…

लेखन संदर्भ :
The Myth of Lokmanya: Richard I. Cashman
छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध आणि बोध : इंद्रजित सावंत
राजर्षी शाहूंच्या आठवणी : नानासाहेब साळुंखे
 

संकलन

अनिल माने

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.posboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox 

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

Postbox India

Anytime Everything

 

 

 

Leave a Reply

error: Content is protected !!