Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIA

Daryabai naik Nimbalkar – अपरिचित विरांगना

1 Mins read
  • Daryabai naik Nimbalkar

 

Daryabai naik Nimbalkar – अपरिचित विरांगना 

Daryabai naik Nimbalkar –  दर्याबाई नाईक निंबाळकर

10/18/2021,

Daryabai naik Nimbalkar – दर्याबाई नाईक निंबाळकर म्हणजे छत्रपती राजाराम महाराज व ताराराणी यांच्या नात.त्यांचा विवाह फलटणचे मुधोजीराजे नाईक-निंबाळकर यांचे ज्येष्ठ पुत्र साबाजीराजे यांचे पणतू निंबाजी नाईक निंबाळकर (सरलष्कर ) (वैराग) यांच्याशी झालेला होता.
श्रीमंत छत्रपती रामराजांचा(सातारा) गुप्तपणे सांभाळ करणाऱ्या Daryabai naik Nimbalkar –  दर्याबाईसाहेब नाईक निंबाळकर व त्यांचे पती सरलष्कर निंबाजी नाईक निंबाळकर (वैराग) यांची माहिती करून घेऊयात .
ताराराणीसाहेब करवीर राज्याचा कारभार पाहू लागल्या. त्यानंतर करवीर राज्यामधे रक्तविहीन क्रांती घडून आली.त्यामधे बालशिवाजी व ताराराणी यांचे सत्तांतर होऊन त्यांना नजर कैदेत पडावे लागले .राजाराम महाराजांच्या दुसर्या पत्नी राजसबाई व त्यांचे पुत्र छत्रपतीं संभाजी राजे (दुसरे) यांच्या हातात सत्ता गेली.संभाजी राजेही अल्पवयीन असल्याने त्यांच्या वतीने राजसबाई राणीसाहेब कारभार पहात होत्या.ताराराणी यांचे पुत्र छत्रपती शिवाजी राजे (दुसरे) कैदेत असतानाच इ.स.१७२७ साली मृत्यू पावले. त्यावेळी त्यांची पत्नी भवानीबाई या गरोदर होत्या.छत्रपती शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर साधारणपणे तीन महिन्यांनी भवानीबाई प्रसुत होऊन त्यांच्या पोटी पुत्ररत्न जन्मास आले.सातारच्या गादीवर बसलेले हेच ते रामराजे होय.आपली सवत राजसबाई या पुत्राला दगाफटका करेल म्हणून ताराराणी यांनी तो पुत्र वारल्याचा
व त्यास पुरून टाकल्याचा बहाणा केला.रामराजे हे सरळ शिवछ्त्रपतींच्या घराण्याचे वारस असल्यामुळे ते आज ना उद्या सातारा किंवा करवीर यापैकी कोणत्याही गादीवर बसण्याची शक्यता होती.त्यामुळे ताराराणीसाहेबांनी आपल्या नातवाच्या सुरक्षितेसाठी
गृहकलहानंतर कोल्हापूर सोडले व त्या सातारा येथे येऊन राहिल्या.
आपला नातू रामराजे त्यांच्या बहिणीकडे(Daryabai naik Nimbalkar – दर्याबाई नाईक निंबाळकर) वैरागजवळील पानगाव येथे गुप्तपणे नेऊन ठेवले . कारण कोल्हापूरच्या राजसबाईंचे कडून त्यांना धोका होता. ज्यावेळी सातारचे छत्रपती शाहूमहाराज यांचा वृद्धापकाळ आला व त्यांना अपत्य नसल्याने गादीला वारस बघण्याचे काम चालू होते.गादीचा वारस म्हणून ताराराणीसाहेबानी रामराजे यांचे नाव सुचविले व ते छत्रपती शाहूमहाराज यांनी मान्य केले .कारण छत्रपती शिवाजीमहाराज यांचा वंशजच गादीला मिळत होता.दर्याबाई नाईक निंबाळकरांनी सातारच्या गादीचा वारस सांभाळण्याचे मोठे दिव्य काम पार पाडले होते.
Daryabai naik Nimbalkar – दर्याबाई या रामराजे यांच्या मोठ्या बहिण होत्या.रामराजे यांना तब्बल १८ वर्षे अज्ञात वासात काढावी लागली. १५ डिसेंबर १७४९ रोजी शाहू महाराज यांचे निधन झाले .त्यावेळी पानगाव (वैराग) येथे मोठा लवाजमा पाठवून रामराजे यांना सातारा येथे आणले.त्यावेळी दर्याबाई नाईक निंबाळकर या रामराजे यांच्या समवेत सातारा येथे आल्या.
रामराजे यांचा ४जानेवारी १७५० रोजी राज्याभिषेक झाला.त्यानंतर रामराजे आपल्या मोठ्या बहिण
दर्याबाई नाईक निंबाळकर यांच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार पाहात असत. त्यामुळे पेशवेही Daryabai naik Nimbalkar – दर्याबाई नाईक निंबाळकर यांना दबकून असत.दर्याबाई या वजनदार व लष्कराची तयारी असलेल्या सामर्थ्यवान स्री होत्या.म्हणूनच नानासाहेब पेशवे काही वेळा मुत्सद्दीपणे तर काही वेळा खोट्या_ नाट्या शकला लढवून दर्याबाईंना वतन – सरंजाम देण्याचे टाळाटाळ करत असत.
छत्रपती रामराजे यांनी दर्याबाईं यांचे पती निंबाजी नाईक निंबाळकर यांना सरलष्कर म्हणून नेमले होते.पुढे नानासाहेब पेशवे यांनी हे सरलष्कर पद जास्त काळ निंबाजी नाईक निंबाळकर यांच्याकडे टिकु दिले नाही. हे स्वाभिमानी Daryabai naik Nimbalkar –  दर्याबाईंच्या लक्षात आल्याने त्यांनी वस्रे ,हत्ती, घोडे,अलंकार स्विकारण्यास नकार दिला व नंतर त्या आपली छावणी घेऊन आपल्या जहागिरीच्या ठिकाणी वैराग येथे परत गेल्या.
दर्याबाईं या स्वतंत्र व्यक्तीमत्वाच्या सामर्थ्यवान स्री होत्या. त्यांचे राजकारणातील महत्व पाहून पेशव्यांनी अनेक हिकमती करून, प्रसंगी खोटी-नाटी आश्वासने देऊन ,डावपेच लढवून आपल्या मार्गातून दर्याबाईंना बाहेर काढले. त्यामुळे नानासाहेब पेशवे यांना सर्व रान मोकळे सापडले.सरळ मार्गी रामराजेंना त्यांनी व्यवस्थीत राज्यकारभार करू दिला नाही.
दर्याबाई स्वतः लढवय्या होत्या तर त्यांचे पती निंबाजी नाईक निंबाळकर हे अत्यंत शूर व लढवय्ये होते. निंबाळकर घराण्यातील पुरूषांबरोबर स्रियांनी ही स्वातंत्र्यानंतर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. 

 

Also visit : https://www.postboxlive.com

वैराग येथील वैभवाचे साक्षीदार म्हणजे भव्य दरवाजे ,हत्ती खाना ,अनेक शस्रास्रे आजही नाईक निंबाळकर यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत.

              लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

The post iron woman of India – अपरिचित विरांगना appeared first on Postbox India.
postboxindia
Postbox India – Anytime Everything

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

वा.रा.कांत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

error: Content is protected !!