Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

wine shop near me – पाचशे रूपये आणि दारूच्या बाटली

1 Mins read

wine shop near me – पाचशे रूपये आणि दारूच्या बाटली

 

 

 

 

पाचशे रूपये आणि दारूच्या बाटलीवर मतदान करणारांच्या वाट्याला गद्दारीच येणार !

 

 

दत्तकुमार खंडागळे 

 

 

 

गेले आठ-दहा दिवस राज्यात राजकीय तमाशा जोरात सुरू होता. खरेतर तो विधानसभा निवडणूक झाल्यापासून सुरूच होता, फक्त त्याचे भाग पहिला भाग व दुसरा भाग असे वर्गीकरण करता येईल इतकेच.

शिवसेनेतील चाळीस आमदारांनी विधान परिषदेची निवडणूक झाल्या झाल्या बंड करत सुरत गाठली आणि राज्यात राजकीय भुकंप झाला. ४० आमदारांनी पलटी मारत पक्ष, पक्षप्रमुख आणि जनतेलाही कोलत वेगळा संसार मांडला.

या आमदारांना भाजपाने पन्नास-पन्नास कोटी दिल्याची चर्चा आहे. अनेक लोक या आमदारांना पन्नास कोटीचे भिकारी म्हणत आहेत.

एकूणच राजकीय वगनाट्य जोरात सुरू आहे. त्या आधी वगनाट्याच्या पहिल्या भागात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी पहाटे पहाटे शपथ घेत वगनाट्याचा पहिला भाग बहारदार केला होता.

आत्ता जे बंड झाले आहे ते या ‘वगा’ चे मध्यांतर आहे. अजून या तमाशातल्या ‘वगा’ चा शेवट बाकी आहे. तो कसा कसा होणार, कसा असणार, अजून काय काय घडणार ?

ते येणा-या दोन-अडीच वर्षात पहायला मिळेल. विधानसभेची अजून अडीच वर्षे आहेत त्यामुळे हा वग जोरात चालेल. अध्ये-मध्ये लोकांचे मनोरंजन करत त्याचा शेवट होईल.

या सगळ्या प्रकारावर जनतेतून फार तीव्र प्रतिक्रीया येत होत्या. सोशल माध्यमात लोक बंडखोर आमदारांच्यावर, मंत्र्यांच्यावर टिका करत होते. काहीजण शिव्या देत होते.

बारकाईने एकूण सध्याच्या सामाजिक स्थितीचा विचार केला तर बंड केलेल्या आमदारांचे, पहाटे पहाटे शपथ घेणा-या अजित पवार,

फडणवीसांचे व तत्वांना आणि विचांराना कोलून कशाही आघाड्या करणा-या नेत्यांचे काय चुकले ? आपण त्यांनाच का शिव्या देणार आणि कुठवर देणार ? असे प्रश्न पडल्याशिवाय रहात नाहीत.

जनता म्हणून, समाज म्हणून, या राष्ट्राचा एक जबाबदार नागरिक आणि मतदार म्हणून आपणच याला जबाबदार नाही का ?

निवडणूका आल्या की wine shop near me – पैसे, दारू, मटन व बासूंदी घेतल्याशिवाय मतदान करायला बाहेर न पडणारा मतदार या स्थितीला जबादार नाही का ?

विकाऊ, बाजारू आणि फुटकळ वृत्तीच्या समाजाचे प्रतिनिधी छत्रपती शिवाजी राजांसारखे ध्येयवादी कसे असू शकतील ?

जे स्वत: बरोबर स्वत:च्या देशाचा सौदा करतात, स्वत:ला लिलावात काढतात अशा बाजारू लोकांचे प्रतिनिधी प्रामाणिक, ध्येयवादी व इमानदार असावेत ही अपेक्षा मुर्खपणाची नाही का ?

wine shop near me – पाचशे रूपयेची नोट, दारूची बाटली व मटनाची पिशवी घेवूनच मतदान केले जाते. एखादा सत्संगवाला असेल, माळकरी असेल तर त्यालाही पाचशे रूपयेसोबत श्रीखंड-बासूंदी द्यावी लागते.

कारण तो मांसाहार करत नाही. या शाकाहारी व माळकरी प्राण्यांनाही मतांसाठी बासूंदी व पैसे हवेच असतात. शिवाजी राजे संत तुकारामांना सोन्याच्या मोहरांचा नजराणा पाठवतात.

संत तुकाराम महाराज शिवरायांनी पाठवलेला तो नजराणा तेवढ्याच स्वाभिमानाने राजांना परत पाठवतात. सोन्याला मातीसमान मोजणा-या तुकोबांचा वारसा सांगणारे आजचे भणंग माळकरीही स्वत:चा लिलाव करतात.

मटन नको बासूंदी द्या म्हणतात. गळ्यात माळ घालणे म्हणजे शरिरावर तुळशीपत्र ठेवणे. शरिरावर तुळशीपत्र ठेवणे म्हणजे देहाच्या आसक्तीची राखरांगोळी करणे.

स्वत:ला विकणारे माळकरी आणि रयत असेल तर शिवबासारखा नितीवान राजा कसा घडणार ?

wine shop near me – पाचशे रूपये व दारूच्या बाटलीवर स्वत:ला विकणा-या, स्वार्थासाठी स्वत:चा सौदा करणा-या समाजाच्या वाट्याला गद्दारीच येणार.

अशा विकाऊ जनतेस नेत्यांना प्रश्न विचारायचा, शिव्या द्यायचा अधिकार काय ? ज्या औकादीचा समाज त्याच औकादीचे त्याचे प्रतिनिधी असणार आहेत.

ही माणसं याच समाजातून जन्माला आली आहेत. ती आभाळातून पडलेली नाहीत. केवळ राजकारण्यांना शिव्या देवून भागणार नाही. समाज म्हणून, देशाचे नागरिक म्हणून आपण काय लायकीचे आहोत ?

हे समाजाने तपासायला हवे. देशाला व देशबांधवांना आपल्या स्वार्थासाठी रोज घोडा लावणारेच भुसकाट देशभक्तीच्या गपड्या ठोकतात.

अशा गद्दार व बाजारू लोकांची देशभक्ती भुसकाट ठरते. आपल्या डोक्यातली जात-धर्माची विष्ठा आपण राजकारणात वापरतो. जात-धर्म पाहूनच मत देतो.

अशा समाजाला सात्विक, ध्येयवादी, प्रामाणिक, तत्वनिष्ठ व निष्ठावंत नेते मिळू शकत नाहीत.

शिव छत्रपतींचा काळ केव्हाच गेला. स्वांतत्र्याच्या काळातही समाजासाठी, देशासाठी बलिदान देणारी पिढी होती. आज अशी पिढी संपली.

आत्ताच्या औलादी क्वाईन बॉक्ससारख्या आहेत. पैसा टाकला तरच चालू अशी त्यांची स्थिती आहे. जो अधिक पैसे टाकेल त्याचीच लाईन जोडली जाते.

डॉक्टर, वकील, पत्रकार, प्राध्यापक, प्राचार्य, इंजिनियर असणारे, क्लासवन, क्लास टू असणारे अधिकारीही स्वत:ला विकतात.

“आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे !” म्हणत पोटच्या पोराचे लग्न बाजूला ठेवून किल्ले कोंढाण्यावर धारातिर्थी पडणारे तानाजी मालूसरे, २ मार्च १६६० रोजी सिध्दीने पन्हाळगडाला वेढा टाकला

आणि त्या वेढ्यात स्वराज्याचा राजा अडकला होता. तब्बल चार महिने पन्हाळगडावर अडकलेल्या राजाला सोडवण्यासाठी मावळ्यांनी जीवाची बाजी लावली.

खोटा शिवाजी होवून गेले तर सिध्दी जौहर जीवंत ठेवणार नाही हे माहित असतानाही शिवाजी राजांचे सोंग घेवून गेलेले शिवाजी काशिद, “राजा गडावर पोहोचल्याशिवाय हटणार नाही !”

या इराद्याने विशाळ गडाच्या पायथ्याशी लढलेले बाजीप्रभू, एक मुलगा गेला तर स्वराज्यासाठी दुसरा मुलगा शिवरायांच्याकडे देणारे अनेक बाप होते. अशी एक ना अनेक निष्ठावंत मांणस होती.

ती जीवाला जीव देत होती. तत्वासाठी, ध्येयासाठी मरायला तयार होती म्हणून शिवाजी राजे घडले. तेव्हाचा समाज त्या लायकीचा होता.

आग्र्याच्या दरबारातून शिवाजी राजांना सोडवताना मदारी मेहत्तर यांनी शिवरायांचा धर्म पाहिला असता आणि स्वधर्मीय औरंगजेबास मदत केली असती तर स्वराज्य तेव्हाच बुडाले असते.

ज्या लायकीचा समाज त्या लायकीचे नेते भेटतात. तत्कालीन समाज विकाऊ असता, निष्ठा आणि विचारांना कोलणारा असता, जाती-धर्माचे राजकारण करणारा असता,

wine shop near me – दारूच्या व मटणाच्या बदल्यात मत कुणाला द्यायचे ठरवणारा असता तर स्वराज्यच उभे राहिले नसते. शिवाजी महाराज छत्रपती झाले नसते.

म्हणूनच बाजारू wine shop near me – समाजाच्या वाट्याला दलबदलू, तत्वहीन, गद्दार, प्रतिनिधीच वाट्याला येणार यात शंका नाही.

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!