- Sawitribai desai
Sawitribai desai – यादवाडच्या सावित्रीबाई देसाई
Sawitribai desai – अपरिचित महा विरांगना
20/10/2021,
यादवाडच्या विरांगना Sawitribai desai – सावित्रीबाई देसाई दक्षिण भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम संपवून शिवाजी महाराज तंजावर वरून महाराष्ट्रात परतत होते .परत येताना त्यांनी आपल्या मार्गातील अनेक छोटी-मोठी राज्य व स्थानिक देसाई यांना पत्र पाठवून शरण येण्याची व खंडणी भरण्याची सूचना दिली होती. परंतु कर्नाटक मधील बेलवाडी येथील ईशप्रभू देसाई शिवाजी महाराजांना शरण आले नाहीत.ऊलट मराठ्यांवर हल्ला करत रसद गोळा करणार्या पथकाचे ४०० बैल पळवुन बेलवडीला नेले.मराठ्यांनी बेलवाडीला धाव घेतली व तिथल्या गढीला वेढा घातला.मराठा सैन्याकडे तोफखाना नसल्यामुळे गडी जिंकता येईना.
तरीही मराठ्यांनी गढीवर हल्ल्यावर हल्ले सुरूच ठेवले .अशा धुमश्चक्रीत ईशप्रभुदेसाई मारले गेले .आता गडी जिंकली असे वाटत असतानाच ईशप्रभूची पत्नी Sawitribai desai – सावित्रीबाई या स्वतः मराठ्यांवर चालून आल्या. बेलवाडीच्या इतर स्रियासुद्धा लढाईत सैनिकांच्या बरोबरीने लढू लागल्या .सावित्रीबाई यांनी विलक्षण शौर्याने महिनाभर लढत दिली व मराठ्यांना हतबल करून सोडले. ही वार्ता या भागात सर्वत्र पसरली. एक स्त्री मराठ्यांना हार जात नाही ही बातमी त्याकाळच्या ब्रिटिश्यापर्यंतसुद्धा पोहोचली. ही बातमी कळताच शिवराय स्वतः तोरगळहून बेलवाडीला आले.
आता सावित्रीबांईची हार निश्चित झाली होती. मात्र तरीही त्या शरण आल्या नाहीत. पुढे लढाईत शिवरायांपुढे त्यांचा पराभव झाला. Sawitribai desai – सावित्रीबाईंना अल्पवयीन पुत्रासह अटक करीत शिवाजी महाराजांसमोर हजर केले .त्याचवेळी त्या कैदेत असताना सेखोजी गायकवाड याने सावित्रीबाईंवर बदनजर ठेवल्याचे शिवरायांना कळले. शिवरायांनी शेखोजीचे डोळे काढून शिक्षा करण्याचा हुकूम फर्मावला. आता शिवराय सावित्रीबाईंना कोणती शिक्षा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र शिवरायांनी अनपेक्षित धक्का देत सावित्रीबाईंना माफ करीत , त्यांचा प्रदेश गढीसह पुन्हा त्यांनाच बक्षीस म्हणून दिला. शिवरायांनी Sawitribai desai – सावित्रीबाईंना बहीण मानून तिला व तिच्या लहान मुलाला दुध भातासाठी म्हणून हीच गढी भेट म्हणून दिली.
एप्रिल (१६७८) या अनपेक्षित उपकाराने भारावलेल्या Sawitribai desai – सावित्रीबाईंनी या घटनेचे चिरकाल स्मरण राहावे म्हणून त्यांच्या जहागिरीतील बेलवाडीजवळच्या यादवाड या गावी शिवरायांचे छोटे मंदिर बनवून त्यात शिवरायांची अश्वारूढ मूर्ती दगडात कोरून घेऊन स्थापन केली. शिवरायांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेतील दक्षिण भारत हा स्थानिक भारतीयांच्या हातातच राहिला पाहिजे हा हेतू जेवढा या प्रसंगातून व्यक्त होतो तेवढाच शिवरायांचा स्त्रियांविषयीचा अतिशय आदर्श असा दृष्टिकोनही येथे दिसून येतो पती मारला गेलेल्या , अल्पवयीन मुलं पदरी असलेल्या पराभूत स्त्रीलासुद्धा मानाने वागवून शिवरायांनी दक्षिण भारतातील स्थानिकांची मने जिंकली. अशाच प्रसंगामुळे मराठ्यांविषयी दक्षिण भारतात आपुलकीची भावना निर्माण झाली.
शिवाय या मोहिमेत शिवरायांनी दक्षिण भारतातील अनेक महत्वाची मंदिरे सुलतानी सत्तांच्या तावडीतून सोडवून घेऊन तिथे पुन्हा पूर्ववत पूजाअर्चा सुरू केली .आपण सर्व एक आहोत आणि आपल्या भूमीच्या रक्षणासाठी हे कार्य चालू आहे हा संदेश शिवाजीमहाराजांनी दक्षिणेतील लोकांना दिला. याचाच परिणाम म्हणून जेव्हा शिवरायांच्या व संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज तामिळनाडू जिंजी येथे आले तेव्हा स्थानिक जनतेला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत होती व म्हणूनच त्यांनी मराठ्यांना मदत केली.अशा अनेक शूर व धाडसी स्रिया स्वराज्यात होऊन गेल्या ,परंतु इतिहासाने ही पाने उघडलीच नाहीत.
Also Visit : https://www.postboxlive.com
लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर
The post Iron woman of India – यादवाडच्या सावित्रीबाई देसाई appeared first on Postbox India.
postboxindia
Postbox India – Anytime Everything