Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Hindutva – हिंदुत्व समजून घेताना 

1 Mins read

Hindutva – हिंदुत्व समजून घेताना 

 

हे राष्ट्र प्राचीन आहे आणि हे राष्ट्र अनेक बऱ्या-वाईट टप्प्यातून गेलेले आहे. पण भारतामध्ये ज्याला ‘प्रबोधन युग’ म्हणता येईल तसं प्रबोधन युग ब्रिटीश कालखंडात घडलं. बंगालमध्ये साधारणत: १८०० च्या सुमारास ब्रिटिशांनी प्रथम सत्ता हातात घेतली आणि हळूहळू ब्रिटिशसत्ता भारतभर पसरल्यानंतर साधारणत: १८३०-४० पासून ह्या प्रबोधन युगाच्या कालखंडाला सुरुवात झाली. आणि त्या शंभर-सव्वाशे वर्षाचं,त्या सगळ्या प्रबोधन युगाचं अंतिम फळ म्हणजे भारताचं संविधान आहे हे आधीच नमूद करतो. त्यातच आपल्या आजच्या hindutva नवहिंदुत्वाची बीजं आहेत.

हे जे hindutva नवहिंदुत्व आहे ते परंपरेने प्राप्त झालेला आपला जो काही वारसा आहे त्याच्यापासून भिन्न आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि या नवहिंदुत्वाला कुणी एक प्रेषित नाही, तर या देशातील हजारो व्यक्ती व त्यांचं विचारमंथन आहे. आगरकरांच्या भाषेत हे नेमकं सांगायचं झालं तर तो ‘विचारकलह’ आहे. आणि योग्य दिशेने सुरू असलेल्या विचारकलहाने समाज कमकुवत होत नाही, तर तो अधिक सक्षम होतो हे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे.

ह्या प्रबोधन युगात होऊन गेलेली सगळी महान माणसं डोळ्यासमोर आणा, ज्यांनी आजच्या नवहिंदुत्वाला ताकद दिली. जवळपास निद्रिस्त असलेला आपला प्राचीन समाज ब्रिटीश कालखंडामध्ये जेंव्हा एका अत्यंत प्रगत अशा संस्कृतीशी(भलेही गुलामगिरीमुळे का असेना) संपर्कात आला त्यातून हा समाज जागा झाला. तो विचार करू लागला कि आपल्यात काय कमी आहे? आपल्यात काय दोष आहेत जे आपण आता टाकले पाहिजेत आणि आपला समाज हा अधिक चांगला केला पाहिजे.

त्यामुळे जेंव्हा आपण एकविसाव्या शतकातून मागे वळून पाहतो तेंव्हा आपल्याला दिसतं कि त्या काळामध्ये ते जागृत लोक एकमेकांशी अनेक विषयांवर वाद-प्रतिवाद करीत असतील, वेगवेगळ्या पद्धतीने काही प्रयोग करीत असतील, पण त्या सगळ्या प्रक्रियेतून आपल्या समाजाला काही-न-काहीतरी दृष्टी प्राप्त झाली.

ज्या बंगालमध्ये या प्रबोधन युगाची प्रथम सुरुवात झाली तिथं आपल्याला राष्ट्रवाद नामक विचारांची एक मांडणी सुरु झालेली दिसते. आणि ही मांडणी केवळ बंगालचीच नाही तर संपूर्ण भारत डोळ्यासमोर ठेवून एकूण भारतीय संस्कृती व सगळ्या समाजाचा सर्वसमावेशक विचार करून भारतीय राष्ट्रवादाची मांडणी सुरु झालेली आपल्याला दिसेल.

चर्चा म्हणून विवेकानंदांचं उदाहरण पहा. विवेकानंदांनी आपल्याला एक महत्वाची देणगी दिली. आपल्या कुंभमेळ्यात लाखो करोडो लोक जमतात पण ते सगळे व्यक्तिगत मोक्षासाठी जमतात. पण आपण एक समाज आहोत आणि परमेश्वर पाहायचा असेल तर तो आपल्या समाजातील उपेक्षितांमध्ये पाहिले पाहिजे आणि त्याची सेवा करण्याइतकं अत्त्युच दुसरं काही नाही हा तो समाजासाठी संन्यस्त होण्याचा विचार विवेकानंदांनी दिला. आजही रामकृष्ण मिशन मध्ये आपल्याला ते दिसेल.

आर्य समाजाकडे पाहिले तर दयानंदानी आपल्याला फार महत्वाचा मुद्दा दिला जो आपल्या जुन्या hindutva हिंदुत्वात नव्हता. तो म्हणजे, जे आपल्याच समाजातील आहेत परंतु काही कारणांमुळे ते बाटवले गेले होते. त्यांना पुन्हा आपल्या समाजामध्ये परत घेण्यासाठीची ‘शुद्धी चळवळ’ हे दयानंदांचं नवहिंदुत्वाला दिलेलं योगदान आहे. आणि हे खरोखरचं नवीन आहे याची आजच्या लोकांना कल्पना नाही.

शुद्धीकरणा संदर्भात आपण शिवाजी महाराजांचं नेताजी पालकर यांचं उदाहरण देतो. पण कल्पना करा कि जर नेताजी पालकर महम्मद कुली खान म्हणून मेले असते, तर त्यांच्या मुलांना आपल्या समाजात परत येण्याचा मार्ग प्राचीन हिंदू धर्मात उघडा होता का? तर तो नव्हता. दयानंदांनी, तुम्ही कधी का मुसलमान झालेले असेनात, तुमचे बापजादे-परजादे, आजोबा-पंजोबा-खापर पंजोबा, कधी का परधर्मात गेलेले असेनात पण तुम्ही आमचेच आहात, त्यामुळे तुम्ही परत या असे आवाहन केले. हे फार मोठं काम त्यांनी केलं.

प्रार्थना समाजात सुरुवातीला ख्रिस्ताची प्रार्थना व्हायची. पण भांडारकरांनी, रानडेंनी ‘तुकाराम अभ्यास मंडळ’ स्थापन करून तुकाराम महाराजांचे अभंग हा त्या प्रार्थना समाजाचा पाया बनवला. म्हणजे बहुजनांच्या चळवळीतून आलेली जी काही आध्यात्मिक समतेची जी संकल्पना आहे तिला सामाजिक पातळीवर आणण्याचा तो एक नव प्रयोग आहे. सत्यशोधक समाज, ब्राम्हो समाज देखील याच प्रमाणे त्या काळातील नवप्रयोग आहेत.

जर आपण नीट पाहिले, तर हि सर्व मंडळी आपल्याला काय सांगताहेत तर ‘Change for Better’. म्हणजे समाजाचं परिवर्तन हवयं, पण ते कशासाठी हवयं? तर आपल्या समाजामध्ये अनेक दोष आहेत. आणि ह्या समाजाचा सगळ्यात मुलभूत दोष आहे तो दोष म्हणजे ‘जन्मसिद्ध समाज व्यवस्था’. ही जन्मसिद्ध व्यवस्था जी परंपरेने आलेली आहे ती हिंदू संघटन चळवळीला घातक आहे. हिंदू समाजात सर्व प्रकारच्या ज्या काही श्रेष्ठत्व-कनिष्ठ्त्वाच्या,भेदाभेदाच्या ज्या कल्पना आहेत, ज्या जन्मसिद्ध आहेत, त्या आधी गेल्या/ घालवल्या पाहिजेत.

सावरकरांनी hindutva ‘हिंदुत्व’ नावाचा जो ग्रंथ लिहिला व पुढे आयुष्यभर जी मांडणी केली, त्या hindutva हिंदुत्वामध्ये देखील हे जन्मसिद्ध, पारंपारिक पद्धतीने जे काही आपल्यापर्यंत आलेलं संचित आहे ते नाकारून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांच्या आधारावर समाजाचं पुन:निर्माण याविषयी ते बोलत होते. हेच बाबासाहेबांनीही म्हटलेलं आहे.

आणि अशा प्रकारच्या ह्या नवीन बांधणीला खऱ्या अर्थाने जलद गती देणारी एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे औद्योगिक क्रांती. तसं बघायला गेलं तर हि एक भौतिक घटना आहे, पण ती फक्त भौतिक घटना नसून एक नैतिक घटना सुद्धा आहे. कारण कालपर्यंतचा जो आपला गावगाडा होता तो गावगाडा एक प्रकारची अर्थव्यवस्था देखील होती. लोक त्या गावगाड्याच्या आधारावरच पोट भरत होते. ‘गावगाडा’ नावाचं त्र्यंबक आंत्रे लिखित एकच पुस्तक वाचले तर आपल्याला कळेल कि आपला पुरातन हिंदू समाज कसा श्रेणीबद्ध आहे. गावात कोण, गावाबाहेर कोण, भटके कोण याचे नीतिनियम किती घट्ट आहेत/होते. तो गावगाडा तोडून-फोडून टाकण्याची ताकद एखाद दुसऱ्या माणसांत नव्हती. कारण जुनं टाकून द्यायचे तर माणसाला त्याच्या कर्तबगारीच्या बळावर संधी देण्याची क्षमता असणारी एक पर्यायी अर्थव्यवस्था नव्याने जन्माला यावी लागते. या गावगाड्याला नष्ट करायचं असेल तर अशी संधी देणारी शहरं जन्माला यावी लागतात. त्यामुळे शहरं हि म्हणजे नरक नव्हे, तर एक प्रकारची मुक्तीद्वारं ठरली.

तसेच उपरोक्त प्रबोधन युगातून आलेलं आपलं जे नवहिंदुत्व आहे त्यामध्ये गडबड अथवा बोटचेपेपणा असता कामा नये हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यात जात,लिंग, भाषा,आहार यावरून भेदाभेद, असमानता याला काहीही स्थान नाही. आपण सर्व हिंदूंमध्ये समान दर्जा पहायला हवा. एक माणूस म्हणून त्यांना असलेल्या हक्कात काहीही कमी-अधिक-उणे करून चालणार नाही.

पण आजही आपल्यामध्येच काही माणसं आहेत ज्यांचा काही वेळेला बेसूर लागतो. ज्यामुळे आपल्या सर्वसमावेशक व आधुनिक नवहिंदुत्वाला धक्का लागेल असा त्यांचा विचार-आचार पहायला मिळतो. त्या विरोधात ठामपणे आपण उभं रहायला पाहिजे. जो कुणी आज जुन्यापुराण्या कालबाह्य व घातक परंपरांच्या आधाराने हिंदुत्वाच्या नावाखाली काही मांडण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते आता आमचं नाहीये असं आपल्यालाच सांगावं लागेल.

त्याशिवाय काही लोकांना अजून एक खोड असते, ती म्हणजे ‘यात तुम्ही नवीन काहीच सांगत नाही हो,हे सगळं तर पूर्वीपासूनच आमच्याकडे होतं’. तर नीट लक्षात घ्या, एखादी गोष्ट आपल्याकडे नव्हती असं मानणं हे काही पराभूत वृत्तीचं लक्षण नाहीये. एखादी गोष्ट पूर्वी आपल्याकडे नव्हती आणि नव्याने आलेली असेल तर त्यात काय बिघडलं? आपल्या नवहिंदुत्वाची शक्ति काय आहे तर जे काही नव-नवीन येतय ते आत्मसात करून शक्तिमान व्हायचं. चांगल्या गोष्टींना आपण कधीच विरोध केला नाही. त्यामुळे प्राचीन काळी आमच्याकडे सगळं काही होतं, असं उगाचच म्हणण्याची काही गरज नाही.

आपलं हिंदुत्व हे कधीही विज्ञानविरोधी असूच शकत नाही/असू नये. आपण परिवर्तनशीलता हा डावा विचार मानत असू तर त्या परिप्रेक्षात हिंदुत्व हे डावे आहे, म्हणजेच परिवर्तनवादी आहे, ते स्थितीशील नाहीये, ते ‘जैसे-थे’वादी नाहीये. परंपरेने जे चालत आलेलं आहे ते तसचं चालणार या विचारांचं ते नाहीये. कुठल्याही परिस्थितीमध्ये आहार,वेशभूषा, भाषा,प्रांत, केशभूषा, खाजगी संबंध, अध्यात्म यावरून हिंदुत्ववाद्यांनी असा कोणताही कार्यक्रम राबवू नये ज्यामुळं आपल्या सगळ्या हिंदू समाजाच्या ऐक्याला त्यामुळे बाधा निर्माण होईल. आपण हिंदू आहोत हे एकत्व निर्माण करण्यासाठी स्वाभाविकच ते हिंदुत्व सर्वसमावेशक असले पाहिजे.

आपण बाकीच्यांशी नक्कीच लढू, मग ते माओवादी असतील, ब्रिगेडी असतील, बामसेफी असतील किंवा अजून कुणी असतील, पण त्याचप्रमाणे ते सनातनी, उच्च निच्च मानणारे ब्राम्हणवादीही असू शकतात. जे हिंदुत्वाचा बुरखा घेऊन विकृत स्वरुपात हिंदुत्व मांडू शकतात. आपल्याला असे जे कुणी किडे असतील ते टिपून-टिपून बाहेर काढता आले पाहिजेत.

अशा पद्धतीचं नवहिंदुत्व घेवून आपण आपल्या समाजासमोर जर उभे राहिलो व त्या हिंदुत्वाच्या रक्षणासाठी म्हणून संघर्ष केला तर या हिंदुत्वामध्ये वैगुण्य काढायला कुणाकडे काय असेल ? आणि अशा वैगुण्य विरहित समाजात सगळ्या स्तरातील लोकांना खात्री पटेल कि ‘हो, हे hindutva हिंदुत्व म्हणजेच माझा परिचय आहे.’

तुषार दामगुडे

 

Also Visit: https://www.postboxindia.com

Also Visit: https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral:

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel:

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform, which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services into Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

 

 

Leave a Reply

error: Content is protected !!