Gandhi – गांधीहत्या आणि महाराष्ट्रातील ब्राह्मण
सुनिल तांबे
Gandhi – गांधीहत्येनंतर महाराष्ट्रातील ब्राह्मणांची घरं जाळली गेली, त्यांना मारहाण झाली हे वास्तव नाकारण्याची टूम काही गांधीप्रेमी लोकांनी काढली आहे. सदर अत्याचारांचे एफआयआर दाखल झाले होते का, किती ब्राह्मणांची घरं जाळली गेली, केवळ छुटपुट घटना होत्या, अफवा आणि सांगोवांगीच्या गोष्टीच अधिक आहेत असे अचाट युक्तिवाद ही मंडळी करतात.
बहुजनांना लुटून ब्राह्मणांनी आपली घरं उभी केली होती, त्यामुळे त्यांना धडा मिळाला तर काय गैर असंही या हिंसेचं समर्थन केलं जातं.
ही मोहीम सोशल मिडियावर राबवली जात आहे. मुळात काही गांधीद्वेष्ट्या ब्राह्मणांनी अतिशयोक्तीपूर्ण, खोट्या बातम्या या माध्यमातून पसरवल्या आणि त्याला उत्तर देण्यासाठी निमखोट्या माहितीचा आधार घेतला जातो आहे.
हा निव्वळ गाढवपणा आहे.
ज्यू व्याजबट्ट्याचा धंदा करायचे, त्यामुळे ते श्रीमंत झाले. त्यांनी जर्मन नागरिकांना लुटलं असा प्रचार हिटलर व नाझी पक्षाने केला आणि ज्यूंचं शिरकाण केलं. ज्यू व्याजबट्ट्याचा धंदा करायचे, त्यातले बहुसंख्य श्रीमंतही होते ही वस्तुस्थिती आहे. परंतु म्हणून त्यांच्या शिरकाण करणं हे आपलं कर्तव्य आहे हे हिटलरचं म्हणणं बहुसंख्य जर्मन नागरिकांनी स्वीकारलं. आज जर्मन लोकांना त्या हिंसाचाराची लाज वाटते, घृणास्पद नाझी विचार आपल्या देशातून समूळ नष्ट केला पाह्यजे यासाठी जर्मन सरकारने शैक्षणिक अभ्यासक्रमात मूलभूत बदल केले. आजही त्या धोरणाची कठोर अंमलबजावणी केली जाते.
विनोबा हे वयाने Gandhi – गांधीजींपेक्षा लहान होते. ते काशीला वेदाध्ययनासाठी गेले होते. तिथून ते गांधीजींच्या आश्रमात पोचले. विनोबांच्या वडलांना लिहीलेल्या पत्रात गांधीजी म्हणतात, की तुमचा मुलगा माझ्या गुरुची भूमिका निभावतो आहे. विनोबा, साने गुरुजी (नागनाथ अण्णा नायकवडींनी आयोजित केलेल्या कुमार साहित्य संमेलनात साने गुरुजी अध्यक्ष होते), अप्पासाहेब पटवर्धन असे अनेक कोकणस्थ ब्राह्मण गांधीजींचे निस्सीम अनुयायी होते. मात्र त्यांचा अपवाद करून अन्य ब्राह्मणांच्या घरावर झुंडीने हल्ले केले.
ह्याच झुंडीने दलितांच्या घरावर हल्ले केले, भटक्या-विमुक्तांना नागवलं ही देखील वस्तुस्थिती आहे. नितीन आगे हा विद्यार्थी रयत शिक्षण शाळेत शिकत होता. त्याला शाळेतून ओढून बाहेर काढण्यात आलं. शाळेच्या मुख्याध्यापकावर रयत शिक्षण संस्थेने कारवाई केली का? याची माहिती मला नाही. रयत शिक्षण संस्थेने यासंबंधात कोणतंही पत्रक काढलं नाही.
ब्राह्मण विरोध अवश्य असला पाहिजे. परंतु राज्यघटनेच्या चौकटीत. Gandhi – गांधी हत्या झाली त्यावेळी राज्यघटना स्वीकारण्यात आली नव्हती असा दावा करता येईल. परंतु महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राची आणि चारित्र्याची साक्ष काढली तर त्यांनी कधीही अशा वेडेचाराचं समर्थन केलं नव्हतं आणि केलंही नसतं. ब्राह्मण्याला त्यांच्याएवढा कट्टर विरोध करणारा नेता महाराष्ट्रात झाला नाही. जातिव्यवस्थेचे चटके या महापुरुषांनी सहन केले होते मात्र त्यांनी कधीही नीतीची कास सोडली नाही. बाबासाहेब आंबेडकर तर गांधीजींचेही कट्टर विरोधक होते.
Gandhi – गांधीहत्येचं समर्थन करणारे ब्राह्मण होते यात शंका नाही. अनेक ब्राह्मणांनी गांधीहत्येनंतर पेढे वाटले ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्यासाठी संपूर्ण ब्राह्मण जातीला जबाबदार धरणं आणि कायदा हातात घेऊन शासन करणं याचं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समर्थन करणं गैर आहे. जातसमूहापेक्षा व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व नसतं अशी धारणा त्यामागे आहे. ही धारणा आधुनिक म्हणजे निवडणुकांच्या राजकारणाशी जोडलेली आहे.
म्हणूनच इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर दिल्लीतील शिखांचं शिरकाण करण्यात आलं. सुमारे दोन हजार शीखांना हल्लेखोरांनी कंठस्नान घातलं. त्यांची घरं जाळण्यात आली. बांग्ला देश युद्धात पाकिस्तानी सैन्याला धूळ चारणारे आणि जनरल नियाजी यांना शरण येण्यास भाग पाडणारे, लेफ्टनंट जनरल जगजितसिंह अरोरा यांच्या घरावरही हिंदू हल्लेखोरांनी हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी त्यांना घराबाहेर पळ काढावा लागला. इंदिराजींच्या हत्येनंतर तिसर्या दिवशी मी दिल्लीत होतो. जगजितसिंग अरोरा न्यू फ्रेंडस् कॉलनीत राहात होते, तिथेच मी मुक्कामाला होतो. जगजितसिंग अरोरा यांच्या नजरेला नजर मिळवण्याची हिंमत मला झाली नाही.
गांधीजींबद्दल मी अनेक पोस्ट टाकल्या आहेत. आज Gandhi – गांधी हत्येचं समर्थन करणारे केवळ ब्राह्मण नाहीत. प्रज्ञा सिंग या ठाकूर आहेत. अमोल कोल्हे जातीने माळी आहेत. कलाकाराचं स्वातंत्र्य म्हणून त्यांनी नथूरामची भूमिका केल्याचं कारण दिलं होतं. शरद पवारांसारख्या सर्वपक्षीय अब्राह्मण नेत्याने अमोल कोल्हे यांना अभय दिलं. मात्र तरिही लोकक्षोभ शमत नाही असं पाहून अमोल कोल्हे यांनी आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला.
मुद्दा साधा आहे. जात या संस्थेत व्यक्तिस्वातंत्र्याला वाव नसतो. जात नावाच्या झुंडीपुढे व्यक्तीने नतमस्तक व्हायला हवं असा नियम असतो. या तर्काला तथाकथित पुरोगामी, समाजवादी, कम्युनिस्ट, गांधीवादी, अब्राह्मणवादी, फुले-शाहू-आंबेडकरवादी, शरद पाटीलवादी (सत्यशोधक कम्युनिस्ट), इत्यादिंनी बळी पडणं हा दैवदुर्विलास आहे. कारण व्यक्तिस्वातंत्र्य आणि निर्वैर असणं हा मुद्दा गांधीजींच्या विचाराच्या केंद्रस्थानी आहे.
Gandhi – गांधीहत्या आणि महाराष्ट्रातील ब्राह्मण
गांधीहत्येनंतर महाराष्ट्रातील ब्राह्मणांची घरं जाळली गेली, त्यांना मारहाण झाली हे वास्तव नाकारण्याची टूम काही गांधीप्रेमी लोकांनी काढली आहे. सदर अत्याचारांचे एफआयआर दाखल झाले होते का, किती ब्राह्मणांची घरं जाळली गेली, केवळ छुटपुट घटना होत्या, अफवा आणि सांगोवांगीच्या गोष्टीच अधिक आहेत असे अचाट युक्तिवाद ही मंडळी करतात.
बहुजनांना लुटून ब्राह्मणांनी आपली घरं उभी केली होती, त्यामुळे त्यांना धडा मिळाला तर काय गैर असंही या हिंसेचं समर्थन केलं जातं.
ही मोहीम सोशल मिडियावर राबवली जात आहे. मुळात काही Gandhi – गांधीद्वेष्ट्या ब्राह्मणांनी अतिशयोक्तीपूर्ण, खोट्या बातम्या या माध्यमातून पसरवल्या आणि त्याला उत्तर देण्यासाठी निमखोट्या माहितीचा आधार घेतला जातो आहे.
हा निव्वळ गाढवपणा आहे.
ज्यू व्याजबट्ट्याचा धंदा करायचे, त्यामुळे ते श्रीमंत झाले. त्यांनी जर्मन नागरिकांना लुटलं असा प्रचार हिटलर व नाझी पक्षाने केला आणि ज्यूंचं शिरकाण केलं. ज्यू व्याजबट्ट्याचा धंदा करायचे, त्यातले बहुसंख्य श्रीमंतही होते ही वस्तुस्थिती आहे. परंतु म्हणून त्यांच्या शिरकाण करणं हे आपलं कर्तव्य आहे हे हिटलरचं म्हणणं बहुसंख्य जर्मन नागरिकांनी स्वीकारलं. आज जर्मन लोकांना त्या हिंसाचाराची लाज वाटते, घृणास्पद नाझी विचार आपल्या देशातून समूळ नष्ट केला पाह्यजे यासाठी जर्मन सरकारने शैक्षणिक अभ्यासक्रमात मूलभूत बदल केले. आजही त्या धोरणाची कठोर अंमलबजावणी केली जाते.
विनोबा हे वयाने Gandhi – गांधीजींपेक्षा लहान होते. ते काशीला वेदाध्ययनासाठी गेले होते. तिथून ते गांधीजींच्या आश्रमात पोचले. विनोबांच्या वडलांना लिहीलेल्या पत्रात गांधीजी म्हणतात, की तुमचा मुलगा माझ्या गुरुची भूमिका निभावतो आहे. विनोबा, साने गुरुजी (नागनाथ अण्णा नायकवडींनी आयोजित केलेल्या कुमार साहित्य संमेलनात साने गुरुजी अध्यक्ष होते), अप्पासाहेब पटवर्धन असे अनेक कोकणस्थ ब्राह्मण गांधीजींचे निस्सीम अनुयायी होते. मात्र त्यांचा अपवाद करून अन्य ब्राह्मणांच्या घरावर झुंडीने हल्ले केले.
ह्याच झुंडीने दलितांच्या घरावर हल्ले केले, भटक्या-विमुक्तांना नागवलं ही देखील वस्तुस्थिती आहे. नितीन आगे हा विद्यार्थी रयत शिक्षण शाळेत शिकत होता. त्याला शाळेतून ओढून बाहेर काढण्यात आलं. शाळेच्या मुख्याध्यापकावर रयत शिक्षण संस्थेने कारवाई केली का? याची माहिती मला नाही. रयत शिक्षण संस्थेने यासंबंधात कोणतंही पत्रक काढलं नाही.
ब्राह्मण विरोध अवश्य असला पाहिजे. परंतु राज्यघटनेच्या चौकटीत. गांधी हत्या झाली त्यावेळी राज्यघटना स्वीकारण्यात आली नव्हती असा दावा करता येईल. परंतु महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राची आणि चारित्र्याची साक्ष काढली तर त्यांनी कधीही अशा वेडेचाराचं समर्थन केलं नव्हतं आणि केलंही नसतं. ब्राह्मण्याला त्यांच्याएवढा कट्टर विरोध करणारा नेता महाराष्ट्रात झाला नाही. जातिव्यवस्थेचे चटके या महापुरुषांनी सहन केले होते मात्र त्यांनी कधीही नीतीची कास सोडली नाही. बाबासाहेब आंबेडकर तर गांधीजींचेही कट्टर विरोधक होते.
गांधीहत्येचं समर्थन करणारे ब्राह्मण होते यात शंका नाही. अनेक ब्राह्मणांनी Gandhi – गांधीहत्येनंतर पेढे वाटले ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्यासाठी संपूर्ण ब्राह्मण जातीला जबाबदार धरणं आणि कायदा हातात घेऊन शासन करणं याचं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समर्थन करणं गैर आहे. जातसमूहापेक्षा व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व नसतं अशी धारणा त्यामागे आहे. ही धारणा आधुनिक म्हणजे निवडणुकांच्या राजकारणाशी जोडलेली आहे.
म्हणूनच इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर दिल्लीतील शिखांचं शिरकाण करण्यात आलं. सुमारे दोन हजार शीखांना हल्लेखोरांनी कंठस्नान घातलं. त्यांची घरं जाळण्यात आली. बांग्ला देश युद्धात पाकिस्तानी सैन्याला धूळ चारणारे आणि जनरल नियाजी यांना शरण येण्यास भाग पाडणारे, लेफ्टनंट जनरल जगजितसिंह अरोरा यांच्या घरावरही हिंदू हल्लेखोरांनी हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी त्यांना घराबाहेर पळ काढावा लागला. इंदिराजींच्या हत्येनंतर तिसर्या दिवशी मी दिल्लीत होतो. जगजितसिंग अरोरा न्यू फ्रेंडस् कॉलनीत राहात होते, तिथेच मी मुक्कामाला होतो. जगजितसिंग अरोरा यांच्या नजरेला नजर मिळवण्याची हिंमत मला झाली नाही.
गांधीजींबद्दल मी अनेक पोस्ट टाकल्या आहेत. आज Gandhi – गांधी हत्येचं समर्थन करणारे केवळ ब्राह्मण नाहीत. प्रज्ञा सिंग या ठाकूर आहेत. अमोल कोल्हे जातीने माळी आहेत. कलाकाराचं स्वातंत्र्य म्हणून त्यांनी नथूरामची भूमिका केल्याचं कारण दिलं होतं. शरद पवारांसारख्या सर्वपक्षीय अब्राह्मण नेत्याने अमोल कोल्हे यांना अभय दिलं. मात्र तरिही लोकक्षोभ शमत नाही असं पाहून अमोल कोल्हे यांनी आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला.
मुद्दा साधा आहे. जात या संस्थेत व्यक्तिस्वातंत्र्याला वाव नसतो. जात नावाच्या झुंडीपुढे व्यक्तीने नतमस्तक व्हायला हवं असा नियम असतो. या तर्काला तथाकथित पुरोगामी, समाजवादी, कम्युनिस्ट, गांधीवादी, अब्राह्मणवादी, फुले-शाहू-आंबेडकरवादी, शरद पाटीलवादी (सत्यशोधक कम्युनिस्ट), इत्यादिंनी बळी पडणं हा दैवदुर्विलास आहे. कारण व्यक्तिस्वातंत्र्य आणि निर्वैर असणं हा मुद्दा गांधीजींच्या विचाराच्या केंद्रस्थानी आहे.