- Ambikabai bhosale mahadik
Ambikabai bhosale mahadik – आंबिकाबाई भोसले महाडिक
Ambikabai bhosale mahadik – शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या
सगळ्यात लहान कन्या म्हणजे अंबिकाबाई
23/10/2021,
शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या सगळ्यात लहान कन्या म्हणजे Ambikabai bhosale mahadik अंबिकाबाई . Ambikabai bhosale mahadik अंबिकाबाई साहेब या तारळे येथील हरजी महाडिक यांना दिल्या होत्या. हरजी महाडिक कर्नाटकात राहून तेथील जहागिरीचे मुख्य काम पहात होते.
कर्नाटकातील मराठ्यांचे मुख्य सुभेदार म्हणून हरजी राजे यांची नेमणूक होती.संभाजी महाराजांनी कर्नाटक राज्याचा संपूर्ण बंदोबस्त हरजीराजे महाडिक यांच्यावर सोपविला होता. हरजी महाडिक यांच्या मृत्यूनंतर जिंजीचा किल्ला राजाराम महाराजांच्या सावत्र बहिण अंबिकाबाई यांच्या ताब्यात आला. कारण संभाजी महाराजांच्या काळात हरजीराजे कर्नाटकातील मुख्य सुभेदार होते .हरजी राजांचे निधन झाले तेव्हा त्यांच्यामागे Ambikabai bhosale mahadik अंबिकाबाई यांनी जिंजीचा किल्ला (तामिळनाडू)तेथील साधनसंपत्ती सह आपल्या ताब्यात घेतला .
राजाराम महाराजांच्या आगमनाने Ambikabai bhosale mahadik अंबिकाबाई यांच्या स्वतंत्र होण्याच्या उद्योगात मोठी अडचण निर्माण झाली. त्यांनी आपल्या बंधूस विरोध करावयाचे ठरवून तशी तयारी चालू केली .त्यांच्या तयारीच्या वार्ता राजाराम महाराजांना समजल्यामुळेच अंबूरहून सरळ जिंजीकडे न जाता त्यांनी वेल्लोर चा मार्ग धरला. 28 ऑक्टोबर 16 89 रोजी ते वेल्लोरच्या कोटात पोहोचले .पन्हाळगड ते वेल्लोर हे अंतर कापण्यास त्यांना एकून 33 दिवस लागले .
काही दिवस वेलोरच्या कोटात महाराजांनी वास्तव्य केले. दरम्यानच्या काळात त्यांनी आपले दूत आपल्या बहिणीकडे पाठवून जिंजीचा किल्ला (तामिळनाडू) आपल्या हवाली करण्यासाठी निरोप पाठवला. परंतु निरोपाप्रमाणे किल्ला हवाली करणे तर दूरच राहिले ,ऊलट त्यांनी राजाराम महाराजांशी प्रतिकार करण्यासाठी ससैन्य किल्ल्यातून कूच केले . काही अंतर गेल्यावर त्यांच्या सैन्यातील अधिकाऱ्यांनीच अंबिका बाईंना या विचारापासून परावृत्त केले .शेवटी आपली बाजू कमकुवत झाल्याचे ध्यानात येताच निरुपाय होऊन त्या किल्ल्यात परतल्या .
राजाराम महाराज कर्नाटकात आल्याचे समजताच तेथील मराठी सेनांनी व मुलकी अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून शिवछत्रपतीच्या सिंहासनाचा वारसदार म्हणून त्यांचा पक्ष उचलून धरला, त्यामुळेच Ambikabai bhosale mahadik अंबिका बाईंना आपला विचार सोडून देऊन जिंजी किल्ल्याचे दरवाजे आपल्या बंधूच्या स्वागतासाठी उघडावे लागले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात(स.1689) राजाराम महाराज जिंजीत पोहोचले . कर्नाटकात व खुद्ध जिंजीमधे(तामिळनाडू) असणाऱ्या मराठी लोकांनी मोठ्या उत्साहाने राजाराम महाराजांचे स्वागत केले .
मद्रास किनारपट्टीच्या मुलखात राजकारणाचे रंग बदलू लागले.नव्या मराठा राजाने जिंजी मध्ये नवी राजधानी उभी केली .दरबार सज्ज झाला .मराठ्यांच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू झाले .हे सर्व घडत असताना महाराष्ट्रात एक दुःखद घटना घडून आली .राजाराम महाराज आपल्या सहकाऱ्यांसह जिंजीत पोहोचले(तामिळनाडू) त्याच वेळी इकडे महाराष्ट्रातील राजधानी रायगड ,राणी येसूबाई व शाहू राजे यांच्यासह मोगलांच्या हाती पडली .
शिवछत्रपतींनी सुप्रतिष्ठित केलेली रायगडची राजधानी शत्रूने काबीज केली खरी,पण त्याच वेळी दूर 500 मैल अंतरावर नव्या राजधानीच्या रूपाने मराठ्यांची स्वातंत्र लालसा जिद्दीने प्रकट झाली. छत्रपती राजाराम महाराजांचा हा प्रवास मराठ्यांच्या इतिहासातील एक रोमहर्षक पर्व आहे.आपल्या मार्गातील अनेक जीवघेण्या संकटाशी मुकाबला करीत,नाना वेष ,नाना रूपे धारण करीत राजाराम महाराजांना हा प्रवास करावा लागला .शिमोगा व बेंगलोर या ठिकाणी महाराजांवर जिवावरचे प्रसंग ऊदभवले . पण मानाजी मोरे ,रुपाजी भोसले ,बहिर्जी घोरपडे ,मालोजी घोरपडे ,खंडो बल्लाळ,प्रल्हाद निराजी यांच्यासारख्या अनेक स्वामीनिष्ठ व शूर मंडळींनी जिवाची बाजी लावून मराठ्यांच्या छत्रपतीचे रक्षण केले. त्यांच्या सेवेचे मोलही करता येणार नाही. जिंजीच्या या प्रवासात राजाराम महाराज पकडले गेले असते तर दक्षिणेतील मराठी सत्तेचा मूळ स्त्रोतच नष्ट झाला असता आणि इस्लामी सत्तेचे साम्राज्य पसरविण्याची औरंगजेब बादशहाची महत्त्वकांक्षा सफल झाली असती.
अशाप्रकारे जिंजीच्या प्रवासाची यशस्विता म्हणजे औरंगजेब बादशहाच्या दक्षिणेतील राजनीतीस तसेच युद्धनीतीस जबरदस्त शह होता. जिंजी मराठ्यांची राजधानी झाल्याने सर्वांचे लक्ष कर्नाटकाकडे वळले. बादशहास आपल्या फौजांचा मोठा भाग तिकडे वळवावा लागला. परिणामी महाराष्ट्रावरील मोगली आक्रमणाचा दबाव त्या प्रमाणात कमी झाला. याचा अचूक फायदा राजाराम महाराजांचे महाराष्ट्रातील सहकारी रामचंद्रपंत ,शंकराजी नारायण ,संताजी घोरपडे ,धनाजी जाधव या मंडळींनी उठवला, आणि मोगलांनी काबीज केलेले किल्ले व ठाणी जिंकून त्यांना आपल्या ताब्यात आणण्याचा सपाटा त्यांनी लावला.
इतका की अवघ्या सहा महिन्याच्या आत दक्षिणेत मराठी सत्ता मोगलांशी तीव्र प्रतिकार करण्यास पुन्हा जोमाने सिद्ध झाली.
Also Visit : https://www.postboxlive.com
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
The post Iron woman of India – आंबिकाबाई भोसले महाडिक appeared first on Postbox India.
postboxindia
Postbox India – Anytime Everything
Also Visit : https://www.postboxindia.com
Also Visit : https://www.postboxlive.com
Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :
https://www.youtube.com/channel/UCto0…
Subscribe our YouTube Channel :
https://www.youtube.com/channel/UCto0…
Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.
Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.
Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,
News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.
Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.
Website : https://www.postboxindia.com
Website : https://www.postboxlive.com
Facebook : https://www.facebook.com/indiapostbox
Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox
LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia
Tumbler : https://postboxindia.tumblr.com/
Twitter : https://twitter.com/IndiaPostbox
Telegram : t.me/postboxindia