sharad pawar ’टायगर अभी जिंदा है !’
एसटी संपाच्या बाबतीत न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आधी जल्लोष केला जातो
आणि नंतर त्याच टोळीकडून sharad pawar शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या घरावर अचानक खुनी हमला केला जातो, दगडफेक केली जाते, जोडे चपला फेकल्या जातात, अत्यंत गलिच्छ अशी शिवीगाळ केली जाते,
हा सारा प्रकारच संतापजनक आहे. त्याचा केवळ शाब्दिक निषेध करून चालणार नाही. तर असल्या प्रवृत्तीला ठेचून काढले पाहिजे. तीच आजच्या काळाची गरज आहे. अशावेळी कुणाचाही मुलाहिजा ठेवता कामा नये.
अर्थात् ह्या हल्ल्यामागे कोणती प्रवृत्ती आणि कोणते मानसिक रुग्ण आहेत, हे सांगण्याची गरज नाही. वकिलाच्या काळ्या कोटातील एक माकड एवढा सारा हैदोस घालण्याची हिम्मत कशी काय करू शकते ?
sharad pawar शरद पवारांसारख्या नेत्याच्या घरावर डायरेक्ट हिंसक हमला करण्याची हिम्मत यांच्यात कुठून येते ?
याच्यामागे गेल्या ७/८ वर्षात देशातील राजकारणाला जे अतिरेकी ग्रहण लागलं आहे, त्याचा हा परिणाम आहे.
खुद्द आतंकवादी जेव्हा खासदार म्हणून राजकीय पक्षातर्फे संसदेत पाठवले जातात, तेव्हा गल्लीबोळातल्या गुंडांना देखील नवा आत्मविश्वास प्राप्त होत असेल तर त्यात नवल नाही.
आपणही देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री होऊ शकतो, किमान विरोधी पक्षनेते सहज होऊ शकतो, अशी महत्त्वाकांक्षा निर्माण होणे स्वाभाविक आहे.
कशा कशा बाया, कशी कशी माणसं, असल्या राजकीय पक्षानं जाणीवपूर्वक वाढवले आहेत, पैशाच्या जोरावर मीडियाला हाताशी धरून प्रमोट केले आहेत, हे बघून संताप येतो.
किळस येते. थेट कोठ्यावर बसून धंदा करणारे लोक जेव्हा सभ्य समाजाच्या चारित्र्याची ऐशीतैशी करतात आणि तरीही समाज चूप राहतो, तेव्हा एका मोठ्या अराजकाची सुरुवात झालेली आहे, असे समजायला हरकत नाही.
भारतीय राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर कधीच गेले नव्हते. सत्तेसाठी किंवा सत्ता गेल्यामुळे सहकुटुंब पिसाळणाऱ्या लोकांची संख्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढताना दिसते.
कुठलीही मानमर्यादा या लोकांनी ठेवलेली नाही. विरोधी पक्षांच्या नेत्याबद्दल हे लोक ज्या प्रकारची भाषा वापरतात त्यावरून यांचा जन्म एखाद्या गटारात किंवा उकिरड्यावर झाला असावा की काय अशी शंका येते!
अर्थात् त्यांच्या पक्षातील इतर सर्वांना हे आवडते आहे, असाही त्याचा अर्थ नाही. त्यातील बरेच लोक अस्वस्थ आहेत. आतल्या आत संतापलेले आहेत, चिडलेले आहेत!
पण विरोधी पक्षच जिथे शेपट्या टाकून बसला आहे, तिथे ते तरी बिचारे काय करणार ? ही खंत अनेक लोकांच्या बोलण्यातून सतत जाणवत राहते. त्यातील एक मोठा वर्ग हतबल झालेला आहे, असे दिसते.
अगदी परवाची गोष्ट. एका ज्येष्ठ व्यक्तीसोबत दैनिक देशोन्नती मधील लेखांच्या संदर्भात चर्चा सुरू होती.
Also Visit : https://www.postboxlive.com
असले बेधडक लिखाण छापण्याची हिम्मत केल्याबद्दल ’देशोन्नती’ आणि संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांच्या बद्दल भरभरून बोलत होते. ’टायगर अभी जिंदा है’ हा डायलॉग पुन्हा पुन्हा वापरत होते.
२/३ महिन्यापूर्वीच त्यांनी मला भेटायची इच्छा व्यक्त केली होती. माझा पता विचारत होते. पण त्यांचं वय समजताच मी स्वतःच भेटायला येतो, असे मी त्यांना बोललो.
परवा त्यांना भेटायला जाण्याचा योग आला. ह्या व्यक्तीचे वय नव्वदीच्या पुढे. विचारधारा काँग्रेसविरोधी. पण त्यांच्या आवडीच्या पक्षातील काही लोकांच्या आगाऊपणामुळे ते वैतागले होते.
अलीकडे जो काही गोंधळ सुरू आहे, तो त्यांना बिलकुल पसंत नव्हता. पण त्यांच्या बोलण्यातील एका वाक्यामुळे मी चमकलो.
’हे लोक देशाचे तर नुकसान करतच आहेत, पण स्वतःच्या पुढच्या पिढ्यांचेही भविष्य बर्बाद करत आहेत’ अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. मलाही धक्का बसला.
म्हणजे विकृतीने किती खोलवर हातपाय पसरले, याची जाणीव आता सर्वव्यापी होत असल्याचे मला जाणवले. ’एका गोडसेने केलेल्या चुकीची किंमत आम्ही आजपर्यंत मोजत आलो आहोत.
पुन्हा दुसरी चूक आम्हाला परवडणारी नाही’ असं नितीन गडकरी मागे एकदा बोलले होते, त्याची आठवण मला याक्षणी प्रकर्षाने झाली.
विशेष म्हणजे नव्वदी पार केलेल्या ह्या ज्येष्ठ व्यक्तीमध्ये जगण्याची प्रचंड ऊर्जा होती. वाचन होते.
उत्साह होता. समाजाची चिंता होती आणि विवेक जागा होता. त्यांच्या घरी गेल्या गेल्याच पाच आकडी रकमेचा एक वजनदार चेक त्यांनी माझ्या हातात ठेवला. हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता.
तुमची चळवळ अखंड चालू राहावी, यासाठी ही माझी छोटीसी भेट म्हणून ठेवून घ्या, असं अगदी सहजतेने म्हणाले. आणि ’टायगर अभी जिंदा है’ म्हणून अभिमानाने मूठ आवळून अभिवादन केले.
Also Read : https://www.postboxindia.com/marathi-नवी-मुंबई-चे-संग्राम-पाट/
मला नक्की खात्री आहे, की शरद पवार यांच्याशी वैचारिक मतभेद असतील तरीही, अशा समंजस आणि बुजुर्ग लोकांना sharad pawar शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामुळे नक्कीच वेदना झाली असेल.
असले हिंसक आणि गलिच्छ राजकारण पसंत नसणारा एक मोठा वर्ग भाजपामध्ये देखील आहे. सध्या तो चूप आहे. मजबूर आहे एवढंच !
घरावर हमला झाला असताना, हिंसक टोळीला सामोरं जाण्याची हिंमत ज्या तऱ्हेने खासदार सुप्रिया सुळे यांनी दाखवली, ते सुद्धा ’काबिले तारीफ’ आहे! त्यासाठी जिगर लागते !
भुरटे राजकारण करणाऱ्या लोकांच्या आवाक्यातील ही गोष्ट नाही !अन्यथा एवढी मोठी सिक्युरिटी असूनही ’आपके सिएम् को बता देना, मै जिंदा लौटकर आया हूं’
असली अत्यंत छछोर भाषा वापरणारेही देशाने पाहिले आहेत आणि त्यांच्या बिनडोक भक्तांची संख्याही काही कमी नाही.
सत्तेचे चार पेग अनपेक्षितपणे पोटात गेल्यामुळे उधाणलेली माकडं अलीकडे बेभान झालेली आहेत. बागेची धूळधाण करायला निघाली आहेत. हवा तसा नंगा नाच करू लागली आहेत.
साऱ्या बागा, सारी जंगलं आपल्या बापाच्या मालकीची आहेत, अशा भ्रमात वाटेल तशा उड्या मारत आहेत. त्या सर्व माकडांनी एकच लक्ष्यात ठेवायला हवं, की वेगवेगळ्या जंगलातील अनेक वाघ अजूनही जिवंत आहेत !
टायगर अभी जिंदा है ! तेव्हा माकडांनी वेळीच शहाणं झालेलं बरं ! त्यातच त्यांचंही भलं आहे, देशाचंही भलं आहे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांचंही भलं आहे ! निदान आपल्या पुढच्या पिढ्यांचा तरी विचार करायलाच हवा !
ज्ञानेश वाकुडकर