Mumbai BMC Election – कमळाबाईंच्या अंगात घुमतंय मुंबईचं वारं ….
Mumbai BMC Election – कमळाबाई आता ‘मुंबई, मुंबई…मुंबई
मुंबई महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसं या कमळाबाईंच्या अंगात आता Mumbai BMC Election – मुंबईच वारं घुमू लागलय,
आणि या कमळाबाई आता ‘मुंबई, मुंबई…मुंबई ” असं घुमत घुमत, गोल गोल फिरत, आरडत ओरडत आता Mumbai BMC Election – मुंबईभर पिंगा घालू लागल्या आहेत.
अंगात मुंबईचे वारं शिरलेल्या या कमळाबाई आणि तिच्या या वारीत नव्याने सामील झालेले तिचे नवकोट भक्तगण यांना Mumbai BMC Election – मुंबईभर
पिंगा घालता घालता हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी मुंबईसाठी पाहिलेली स्वप्न अचानकच जागेपणी दिसू लागल्याची
आणि झपाटल्यामुळे त्यांच्या त्या स्वप्नांची बाधा झाल्याचे दिसून येतंय. त्यामुळे बाळासाहेबांची ती अपूर्ण स्वप्ने,
पूर्ण करण्याची जबादारी केवळ त्यांच्यावरच असल्याचे या कमळाबाई आणि त्यांचे हवेत तरंगत असलेले पन्नास थरांवरचे नाथ बेंबीच्या देठापासून
ओरडत ओरडत मुंबईकरांना सांगू लागलेले आहेत. पण अंगात मुंबईच वारं आलेल्या घुमणाऱ्या या ढोंगी कमळाबाईंच्या
आणि तिच्या ढोंगी भक्तांच्या अंगातलं त्यांना झपाटलेल मुंबईचं हे वारं बाहेर कसं काढायच असतं हे मुंबईकराना कोणीही सांगण्याची गरज आहे
असं मला वाटत नाही. कारण या मुंबईने आणि येथील मुंबईकरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून ते आजपर्यंत,
या मुंबईवर बेगडी प्रेम करणाऱ्या दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या अशा अनेक ढोंगी आणि संधीसाधू पुढाऱ्यांचे मुखवटे कसे टराटरा फाडलेले आहेत
हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि मुंबईकरांचे हे कसब, Mumbai BMC Election – मुंबई जिंकण्याचे वारं अंगात संचारलेल्या या कमळाबाईंनी आणि
या मुंबईचे अचानक बेगडी प्रेम आलेल्या कमळाबाईंच्या ‘पन्नास थरांच्या हंड्या रचणाऱ्या नवकोट’ भक्तगणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या
आणि शिवसेनेच्या गेल्या ६० वर्षांच्या इतिहासात जाऊन पक्के लक्षात ठेवण्याची गरज आहे.
माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉल मध्ये नुकत्याच झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि
नुकतेच भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीत बढती मिळालेले देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्याला उपस्थित असलेल्या आपल्या कार्यकर्त्यांसमोर
नागपुरी वडाभात खाऊन, अंगात वारं संचारल्याप्रमाणे, नेहमीप्रमाणे आपले सुटलेले पोट सांभाळत,
बेंबीच्या देठापासून ओरडत ओरडत अशी घोषणा केली की “कार्यकर्त्यांनो आता आपल्याला Mumbai BMC Election – मुंबईला जिंकायचेय आणि
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करायचेय कारण ती आता आपली जबादारी आहे.
कारण बाळासाहेबांचे नाव सांगून जे लोक आजपर्यंत निवडून आले त्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न धुळीस मिळविले
आणि बाळासाहेबांचे ते स्वप्न पूर्ण करू शकलेले नाहीत. कारण ते इतके आत्ममग्न होते की, ते स्वतःच्या पलिकडे काहीही पाहू शकले नाहीत.
तेव्हा वंदनीय बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची आता ही आपली जबादारी आहे कारण Mumbai BMC Election – मुंबई ही आपली जबादारी आहे आणि
आम्ही या मुंबईच्याच भल्यासाठी सारखे दिल्लीच्या फेऱ्या मारतो आहोत. मुंबईला आम्ही महाराष्ट्रापासून दूर जाऊन देणार नाही.. वगैरे वगैरे, वगैरे”….
अहो देवेंद्र फडणवीस, तुम्ही काय बोलताय याच तुम्हाला जरा तरी काही भान आहे काय…?
तुमचे हे राणा भीमदेवी थाटाचे भाषण ऐकून बाळासाहेबांनाच काय पण अगदी प्रबोधनकारांना देखील स्वर्गात नक्कीच हसूं अनावर झाले असेल.
अहो देवेन्द्रजी, सगळ्यात पाहिलं म्हणजे हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबादारी तुमच्यावर कोणी टाकली बुवा …??
नाही म्हणजे, २०२४ मध्ये भारताला ‘५ ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी’ करणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सगळी स्वप्न आता पूर्ण झाली काय ..?
की त्यामुळे आता तुम्हाला हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेबांची स्वप्न पुरी करावीशी वाटत आहेत ..?
या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आम्ही Mumbai – मुंबईकरांनी आता समजायचं तरी काय ..?
अहो फडणवीस, मोठा भाऊ म्हणून इतकी वर्षे शिवसेनेचे बोट धरून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि
मुंबई महापालिकेत प्रवेश करणाऱ्या तुमच्या पक्षाने आजपर्यंत शिवसेनेला दगा देण्यापलीकडे, असं काय केलय की जे इथल्या मुंबईकरांनी लक्षात ठेवावं..?
आजपर्यंत तुम्हाला आणि मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या आधाराने निवडून आलेल्या तुमच्या नगरसेवकांना या आधी कधी बाळासाहेबांचे स्वप्न आठवले नाही का…?
पण शिवसेनेत फूट पाडल्यानंतर तुमच्या त्या अश्लाघ्य कृतीचे आणि गलिच्छ राजकारणाचे, जे भूत आता तुमच्या मानगुटीवर बसलेलं आहे,
त्याच्यामुळे मुंबईचा हा मराठी मतदार आता आपल्याला या महापालिकेच्या निवडणुकीत निश्चितपणे डावलेल आणि
कधीही माफ करणार नाही या भीतीपोटी तुम्हाला आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी बघितलेल्या स्वप्नांची अचानक आठवण आलेली आहे.
आणि म्हणूनच आता, मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत निवडून येण्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदींचे नव्हे तर
हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय दुसरा अन्य पर्याय नाही, याची पक्की खात्री पटल्यामुळे “बाळासाहेबांची स्वप्ने पूर्ण करूया ”
असे हे भावनिक आवाहन, जे तुम्ही मुंबईकरांना केलेले आहे, ते न कळण्याइतका हा Mumbai BMC Election – मुंबईकर दुधखुळा नाही.
त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की की, बाळासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय, आणि खरी – खोटी असे शाब्दिक खेळ करत शिवसेनेविषयी
मुंबईकर मतदारांच्या मनात एक संभ्रम निर्माण केल्याशिवाय, Mumbai BMC Election – मुंबई महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला अपेक्षित यश मिळणं अशक्य आहे
याची एक स्पष्ट कबुली तुम्ही आपल्या या भाषणातून दिलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
अहो, देवेन्द्रजी वंदनीय बाळासाहेबांची स्वप्न पूर्ण करायला तुमच्यासारखी शेजाऱ्यापाजाऱ्यांची आणि ज्यांनी आपल्याला मोठं केलं, वाढवलं,
पोसलं त्यांनाच फसवून घरातून पळून गेलेली आणि तुमच्या वळचणीला आलेली असली नाकर्ती मुलं कशाला हवीत…?
अहो त्यांचीच रक्तामांसाची कर्तबगार मुलं आहेत की.. आणि ती नक्कीच आपल्या वडिलांची स्वप्न पूर्ण करतील.त्यांची तेवढी ताकद आहे की.
तुम्ही नका इतकी काळजी करू. बरं त्यातही बाळासाहेबांनी मुंबईसाठी कोणती स्वप्न पहिली होती याची
काही स्पेशल यादी आहे का तुमच्याकडे किंवा बाळासाहेबांचे नाव सांगणाऱ्या, तुमच्या वळचणीला आलेल्या त्या नाकर्त्या मुलांकडे ..?
असेल तर ती जरा आम्हा मुंबईकरांनाही सांगा. त्यासाठी महाराष्ट्रातून फुटून निघून “स्वतंत्र विदर्भाचे”
राज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तुमच्यासारख्यानी तरी Mumbai BMC Election -मुंबईसाठी नसती उठाठेव करू नये. कारण न जाणो,
उद्या तुम्ही केंद्रात गेलात आणि मुंबईसाठीची स्वप्न पूर्ण करण्याच्या नावाखाली, अचानक मुंबईला “केंद्रशासित करण्याची चोरटी स्वप्ने”
दिल्लीस्थित मुंबई द्वेष्ट्याना पक्ष शिस्तीच्या नावाखाली साथ दिलीत तर..? काय सांगावं.. ? भविष्यात काहीही घडू शकत.
तेव्हा देवेन्द्रजी मुंबईसाठी तुम्ही इतकं हवालदिल होण्याची काहीच आवश्यकता नाही. खऱ्या खोट्या माणसांची जन्मजात पारख असलेला
हा मुंबईकरही अगदी “खऱ्या खुऱ्या शिवसेनेलाच” मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीत अगदी मनापासून साथ देईल.
तेव्हा तुम्ही आणि तुमच्या नवकोट नारायण भक्तगणांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या स्वप्नांची चिंता करू नये हेच उत्तम…!!
या निमित्ताने दुसरी एक आठवण तुम्हाला करून द्यावीशी वाटते की, आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर,
तुम्हाला आता अचानक मुंबईचा, Mumbai BMC Election – मुंबईकरांचा आणि बाळासाहेबांच्या स्वप्नांचा पुळका आलाय.
कारण तुमच्या लेखी मुंबईचे महत्व हे सुमारे ४६ हजार कोटींचे वार्षिक बजेट असणारी, आणि सोन्याचं अंड देणारी फक्त एक कोंबडी इतकंच आहे.
तुमचं मुंबईवरचे प्रेम आणि बाळासाहेबांच्या स्वप्नांची पूर्तता हे सगळं झूट आहे. देवेन्द्रजी लक्षात घ्या,
या मुंबईसाठी इथल्या खऱ्या खुऱ्या मुंबईकरांनी आपलं रक्त सांडवलेलं आहे. मुंबईच्या आणि मुंबईकरांच्या प्रत्येक प्रश्नावर
आणि समस्येवर इथल्या मुंबईकर चारमान्यानी, कामगारांनी आणि शिवसैनिकांनी नेहमीच लढा दिलेला आहे. त्यावेळी तुम्ही कुठे होतात ?
एकेकाळी Mumbai BMC Election – मुंबईचा लचका महाराष्ट्रापासून तोडू पाहणाऱ्या मोरारजी देसाईंना इथल्याच मुंबईकरांनी धडा शिकविलेला आहे.
जरा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास बघा. संयुक्त महाराष्ट्राच्या त्या जगप्रसिद्ध अशा आंदोलनाशी आताचा भाजपा झालेल्या
त्यावेळच्या जनसंघाचा काडीचाही संबंध नव्हता. तो लढा कॉ. श्रीपाद अमृत डांगे, एस एम जोशी, आचार्य अत्रे आणि ज्यांची स्वप्न
आता आपण पूर्ण करायला निघालेले आहात त्या बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी लढविलेला होता.
त्यानंतर आठवून पहा बेळगाव, कारवार यांचा महाराष्ट्रात समावेश व्हावा या करीत झालेला १९७३ मधील तो संघर्ष.
मोरारजी देसाई यांची मोटार शिवसैनिकांनी अडवली. सत्यकांत पेणकर नावाच्या एका शिवसैनिकाच्या अंगावरून गाडी गेली
आणि अख्खी मुंबई पेटली. चार दिवस मुंबई पेटत होती.पोलीस गोळीबारांत ६८ ठार झाले, तेव्हा शिवसेनाप्रमुखांना आणि
शिवसेनेच्या अन्य नेत्यांना अटक झाली होती तेव्हा Mumbai BMC Election – मुंबईच्या आणि बाळासाहेबांच्या स्वप्नांच्या आता गप्पा मारणारा तुमचा हा भाजपा कुठे होता जरा सांगाल का ..?
त्यामुळे ही मुंबई इथल्या खऱ्याखुऱ्या मुंबईकरांची आहे. तुमचे राज्यपाल म्हणाले त्याप्रमाणे मुंबईला सोडून जाण्याचा विचार करणाऱ्या तुमच्यासारख्यांची तर अजिबात नाही.
१९८१ साली गिरणी कामगारांच्या संपात उधवस्त होत असलेल्या गिरणी कामगाराला बाळासाहेबांनी आणि शिवसेनेनेच आधार दिला.
अर्थात देवेन्द्रजी हे तुम्हाला कुठून ठाऊक असणार ..? बाबरी मशीद जमीनदोस्त झाली आणि त्या वेळी उसळलेल्या
दंगलीत आणि मुंबईत घडवून आणलेल्या १९९२ च्या त्या भीषण बॉम्बस्फोटात बाळासाहेबांची शिवसेना आणि
शिवसैनिकच मुंबईकरांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. आज मुंबई जिकंण्याची स्वप्न पाहणारे कुठे होतात तुम्ही तेव्हा..??
जरा आम्हा मुंबईकरांना सांगाल का ..?
असो सहज आठवलं म्हणून तुम्हाला एक आठवण करून देतो… देवेन्द्रजी, २०१६ मध्ये जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात
तेव्हा १६ नोव्हेम्बर २०१६ ला “द प्रिंट” या वृत्तपत्राचे चे संपादक शेखर गुप्ता, पत्रकार मानसी फडके आणि
पत्रकार मारूख इनायत यांना “द प्रिंट”साठी दिलेल्या एका मुलाखतीत आपण त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून देखील
बोलताना स्पष्टपणे वेगळ्या विदर्भाला पाठिंबा दिला होतात आणि एव्हढेच नव्हे तर या मुलाखतीत तुम्ही स्वतःला”हार्डकोर नागपूरकर”
म्हणवून घेण्यात धन्यता मानली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देखील वेगळ्या विदर्भाला पाठिंबा देणारे हेच तुमचे सच्चे महाराष्ट्राचे प्रेम काय..?
मग हेच जर तुमचे महाराष्ट्र प्रेम असेल आणि असा जर तुमचा नागपूरकर ‘डीएनए’ असेल तर तुम्हाला
या मुंबईचे आणि बाळासाहेबांच्या मुंबईसाठी बघितलेल्या स्वप्नांचे हे अचानक प्रेम एकदम कुठून आले ..?
असो. तुमचं तुमच्यापाशी. पण लक्षात असुद्या आम्ही Mumbai BMC Election – मुंबईकर काही तुमच्या मुंबईवरील बेगडी प्रेमाला बळी पडणार नाही आणि
मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुकीत ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या “खऱ्या खुऱ्या शिवसेनेच्या” मागे ठामपणे उभे राहू याची खात्री बाळगा.
कारण आमचा “डीएनए” हा खऱ्या खुऱ्या मुंबईकरांचा आहे .
त्यामुळे मला वाटत बाळासाहेबांच्या स्वप्नपुर्तीच्या नावाखाली मुंबईकरांना भावनिक आवाहन करणारे
आपलं हे मुंबईप्रेम अन्य कुणाचे नसून मुंबईकरांच्या जीवाचा घास घेण्यासाठी आलेल्या ‘पुतनामावशीचे” आहे हे मात्र नक्की.
त्यामुळे लक्षात असू द्या मुंबईसाठी अनेक लढे दिलेला आणि मुंबईसाठी आपले रक्त सांडविलेला
हा मुंबईकर तुमच्या या बेगड्या मुंबईप्रेमाला नक्कीच बळी पडणार नाही हे मात्र नक्की. बाळासाहेब नेहमी म्हणत असत,
“मुंबईच अस्तित्व नष्ट होऊन चालणार नाही. अजूनही मुंबईतील मराठी माणूस मेलेला नाही. तो जिवंत आहे.
मुंबईसाठी तो पुन्हा पुन्हा उभा राहील. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळी जसा तो उभा राहिला तसाच तो शिवसेनेच्या पाठीशी कायम उभा राहील आणि याची मला खात्री आहे.”
तेव्हा देवेन्द्रजी, उगाचच शिवसैनिकांना आणि मुंबईच्या मराठी माणसांना भावनिक आवाहन करू नका.
तुमच्या आणि तुमच्याकुशीत बसलेल्या फुटीरांच्या या भावनिक आवाहनाला Mumbai BMC Election – मुंबईकर अजिबात फसणार नाही एव्हढे मात्र पक्के लक्षात असुद्या,
आणि दुसऱ्यांच्या स्वप्नांवर आपले इमले बांधण्याची स्वप्ने बघू नका.
दिलीप प्रधान