Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Jijau – जिजाऊजन्मोत्सव 

1 Mins read

Jijau – जिजाऊजन्मोत्सव 

तुमसर, पौराणिक काळापासून विदर्भ भारतातील अलौकिक आणि असामान्य कर्तृत्ववान असणाऱ्या कन्यांची खाण राहिलेला आहे. श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी तर श्रीकृष्णाचे ज्येष्ठ पुत्र प्रद्धम्नाची पत्नी शुभांगी ही रुक्मि राजाची कन्या, रघुवंशातील इंदूमती, अगस्तीला साथ देणाऱ्या लोपामुद्रा या सर्व विदर्भातील कन्यांच्या लौकिकाची मालिका समोर नेण्याचे काम सिंदखेडराजा येथे लखोजीराजे जाधव व म्हाळसाराणी यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 ला जन्मलेल्या Jijau जिजाऊने केले. लखोजीराजे जाधव यांच्या दरबारातील रामसिंग भाट व बजरंग भाट यांनी जिजाऊ जन्मा संबंधि म्हटलं आहे, “जगदंब कृपेने झाली, मुलगी म्हाळसाबाईला | तीच Jijau जिजामाता प्रसिद्ध सर्वांला || सुमारे चारशे वर्षापूर्वी सिंदखेडराजात जिजाऊंच्या रूपाने अशी शक्ती जन्माला आली की तिने दुष्टाचे निर्दालन आणि आबाल वृद्धाचे संगोपन करण्याची प्रेरणा दिली. अन्याय -अत्याचारा विरुद्ध लढण्याची शक्ती या महाराष्ट्रात निर्माण करुन संपूर्ण भारतवर्षाला स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखविला. Jijau जिजाऊचा विवाह वेरूळचे मालोजीराजे भोसले यांचे ज्येष्ठ पुत्र संस्कृत पंडित शहाजीराजे यांच्यासोबत सन 1610 साली दौलताबाद येथे संपन्न झाला. Jijau जिजाऊ – शहाजी राजे यांचा विवाह झाल्यानंतर शहाजीराजेंच्या दरबारातील कवी जयराम पिंडे त्यांच्या राधामाधवविलासचंपू या ग्रंथात म्हणतात,

“जशी चंपकेशी खुले फुल जाई | भली शोभली ज्यास जाया जिजाई || तिचे किर्तीचा | चंबू जबुदिपाला, करी साउली माऊली मुलाला || 

यवनांचा सामान्य रयतेवर होत असलेला अन्याय -अत्याचार बघून, स्वाभिमान हरविलेला राष्ट्र बघून जिजाऊ व शहाजीच्या मनात सर्वसामान्य रयतेला स्वाभिमानाने जगता यावं म्हणून स्वराज्य निर्माण करण्याचे विचार येत होते. शहाजीराजेंनी स्वतंत्र स्वराज्य स्थापनेकरिता परिस्थिती अनुकूल नसतांना सुद्धा प्रयत्न केला. त्यात यशस्वी जरी झाले नसले तरी सुद्धा त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न शेवट पर्यंत शहाजीराजेंनी केला. शहाजीराजेंच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नात Jijau जिजाऊ भक्कमपणे त्यांच्या सोबत उभे राहिल्या होत्या. शहाजीराजेंना सुद्धा जिजाऊमधील गुणांची आणि कर्तृत्वाची जाणीव होती. जिजाऊ आणि शाहजीराजेंच्या संसारात 1623 ला पहिले पुत्ररत्न संभाजी जन्माला आले. संभाजीराजे सुद्धा बहुभाषिक आणि वडिलांसारखे कर्तृत्ववान होते. कनकगिरीच्या लढाईत लढतांना 1663 ला मृत्यू झाला. दुसरे पुत्ररत्न शिवाजी 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्यावर जन्माला आले. ज्यांनी पुढे माता – पित्याचा स्वराज्यनिर्मितीचा संकल्प पूर्ण केला.

कौटुंबिक_आघात  

स्वराज्य निर्मितीच्या दृष्टीने भोसले व जाधवांच्या हालचाली सुरु असतांना, जिजाऊवर मोठा कौटुंबिक आघात झाला. दौलताबाद येथे सन 1663 साली खंडागळे सरदाराच्या हत्तीमुळे दुर्दैवी घटना घडली. भोसले -जाधव समोरासमोर उभे राहिलेत. Jijau जिजाऊच्या चुलत दिराच्या तलवारीने थोरले बंधू दत्ताजी मारल्या गेले, आणि वडील लखोजी जाधवच्या तलवारीने चुलत दीर संभाजी मारल्या गेले. सासर आणि माहेरा मध्ये वितुष्ट निर्माण झाल्यावर कोणत्याही स्त्रीची काय मानसिकता होऊ शकते? 25 जुलै 1629 मध्ये दौलताबाद मध्ये निजामाने विश्वासघाताने वडील लखोजीराजे, भाऊ अचलोजी व भावाच्या मुलाची हत्या केली. सन 1663 ला थोरले पुत्र संभाजीचा मृत्यू आणि 23 जानेवारी 1664 ला पती शहाजी राजेंचा मृत्यू. घरातली अशी हक्काची माणसं सोडून गेल्यावर कोणत्याही स्त्रीची काय अवस्था होईल? हे आपण समजू शकतो. अशा परिस्तिथीतीतही Jijau जिजाऊंनी मात्र स्वराज्य निर्मितीचा संकल्प नजरेआड होवू दिला नाही, त्यासाठी आयुष्यभर प्रयत्नरत राहिल्यात.  शिवबावर_संस्कार  जिजाऊने अत्यंत विपरीत परिस्तिथीतीत पुत्र शिवाजीराजेंचे असामान्य व्यक्तीमत्व घडवून रयतेचे लोककल्याणकारी राज्याची स्थापना त्यांच्याकडून करवून घेतली. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर Jijau जिजाऊंच्या संस्काराचा प्रभाव होता. जिजाऊ शिवाजीराजेंना थोर महापुरुषांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगून त्यांच्या मानत शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे बळीराज्य निर्माण करण्याचे संस्कार रुजवित होत्या. Jijau जिजाऊ 1638 ते 1642 च्या दरम्यान शिवबाराजेना घेवून बंगलोरला शहाजीराजेंकडे होते. तिथे जिजाऊ – शाहजीने शिवबांवर संस्कार केलेत. युद्ध, धर्म, न्याय नीतीचे, भाषा शिक्षण दिले. तिथून पुणेला आल्यानंतर जिजाऊने शहाजीराजेंकडे असलेल्या पुणे जहागिरीचा कारभार स्वतःच्या हाती घेवून शिवाजी राजेंच्या नावाने कारभार सुरु केला. जिजाऊंनी शिवबांना स्वातंत्र्याचे वेड लावले होते. स्वातंत्र्याचे वेड पूर्ण करण्याकरिता स्वतःच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी राजेंना स्वराज्य निर्मितीच्या कार्याला सूरूवात करायला लावले.

स्वराज्य निर्मिती करिता शिवरायांच्या सोबतीला तानाजी मालुसरे, जिवाजी महाले, संभू जाधव, शिवाजी काशीद अशी जीवाला जिव देणाऱ्या मावळ्यांची फौज जिजाऊने दिली. स्वराज्य निर्माणच्या कार्यात जातीपातीचा विचार न करता, जिजाऊ सर्व मावळ्यांवर शिवबाप्रमाणेच प्रेम करायच्या. Jijau जिजाऊंच्या मायेच्या प्रेमाने सर्व मावळ्यांना मोहित करून टाकले होते. त्यामुळेच स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सर्वसामान्य रयत सुद्धा प्राण द्यायला तयार असे.

स्त्रीत्वाचा मान – सन्मान राखण्याचा जो गुण शिवरायांमध्ये होता, त्या गुणाचा वारसा महाराजांना जिजाऊ कडूनच मिळाला होता. म्हणूनच स्वराज्यातील स्त्रीया म्हणायच्या….

“जिजाऊंच्या जीवावर | नाही कुणाची पर्वा || आम्ही जिजाऊंच्या लेकी|  जशा तलवारीच्या आणा ||

शिवबाच्या_पाठीमागे_भक्कम  जिजाऊ अत्यंत धाडसी, संकटाला न घाबरता त्यावर मात करणाऱ्या आणि निश्चित केलेल्या ध्येयापासून किंचितही मागे न सरणाऱ्या लोकमाता होत्या. शिवबाला मृत्यूच्या दाढेत अफजलखाना सारख्या पराक्रमी दुष्ट वृत्तीच्या व्यक्तीच्या भेटीला पाठविणाऱ्या जिजाऊ, तर दुसरीकडे अफझल खानाची स्वतः भेट घेवून अफजल खानाला बेसावध करणाऱ्या Jijau जिजाऊ. पन्हाळ्याच्या किल्यावर सिद्धी जौहर च्या वेढ्यात शिवाजी राजे अडकले असता त्यांची सुटका करण्यासाठी स्वतः हातात तलवार घेणाऱ्या जिजाऊ. स्वराज्य संरक्षणाकरिता शिवाजी राजे व बाळ शंभूराजेना आग्र्याला औरंगजेबाची भेट घ्यायला पाठविणाऱ्या व त्यांच्या अनुपस्थित स्वराज्य सांभाळण्या बरोबरच औरंगजेबाच्या रोषाची कोणतीही पर्वा न करता रांगणा किल्ला मोगलांकडून जिंकून स्वराज्यला जोडणाऱ्या जिजाऊ, म्हणजे धाडशी आणि मुत्सद्दीपणाचा जिवंत उदाहरण.

पुरोगामी : Jijau जिजाऊ धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याच्या बाबतीत अत्यंत पुरोगामी विचाराच्या होत्या. Jijau जिजाऊंनी स्वतः व शिवाजी राजेंना सुद्धा कधी अंधश्रद्धा, कर्मकांडाच्या मोहात पडू दिले नाही. शहाजी राजेंच्या मृत्यूनंतर सती न जावून रूढीप्रिय समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला. Jijau जिजाऊ अत्यंत बुद्धिनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ होत्या. त्यांनी सतत शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांची….

“ओले मूळ भेदी, खडकाचे अंग| अभ्यासाशी संग, कार्यसिद्धी ||” ही शिकवण दिली.

राज्यभिषेक : शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकामागच्या प्रेरणा Jijau जिजाऊच होत्या. राजपदाला लोकप्रतिष्ठा आणि धर्म मान्यता मिळवून देणे हा राज्यभिषेकामागचा हेतू होता. राजाला लोकप्रतिष्ठा आणि धर्म मान्यता नसेल तर तो राजा सर्वमान्य होत नाही. जिजाऊने शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक व त्यांना 32 मण सोन्याच्या सिंहासनावर रयतेच्या कल्याणाकरिता आरूढ झालेले स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. त्यांचे आतापर्यंतच्या कष्टाचे व त्यागाचे फलित झाल्याने त्यांना किती – किती धन्य वाटलं असेल. शहाजी राजेंसोबत पाहिलेल्या स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे अत्यंत समाधानाने राज्यभिषेकाच्या 12 दिवसानंतर 17 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा व रयतेचा निरोप घेतला. जिजाऊंनी निरंतर रयतेच्या कल्याणाचा आणि स्वराज्याचा विचार केला. त्यांनी जणू स्वराज्याशींच संसार थाटला होता. शिवरायांना स्वराज्याचे वेड लावून त्यांच्याकडून स्वराज्यनिर्मितीही करुन घेतली त्यामुळेच त्यांचा राष्ट्रमाता म्हणून गौरव केल्या जातो.

जयंती दिनी त्यांना विनम्र अभिवादन.

अनिल भुसारी

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

error: Content is protected !!