Tirupati balaji – तिरुपती बालाजी मंदिर
Tirupati balaji – तिरुपती बालाजी मंदिर मराठ्यांनी मुक्त केले मुघलांच्या ताब्यातून.
इसवी सन १५६५ मध्ये मुघल सुलतानांनी एकत्र येऊन विजयनगर साम्राज्यावर हल्ला चढवला व त्यात विजयनगर साम्राज्याचा पराभव झाला.
विजयनगर साम्राज्याचा शेवटचा हिंदू राजा रामरायाचे मुंडके कापून आदिलशहाने सैन्याचे हवाली केले.
आदिलशहाच्या सैन्याने रामरायाचे मुंडकं भाल्याला लटकवून पूर्ण हम्पी शहरात फिरवले.
हम्पी शहरात लूटपाट अत्याचार बलात्कार केलं मंदिर लुटली.
रामरायाच्या एक लाख सैन्याच्या कत्तली केल्या व हम्पी शहराला आग लावली.
त्यानंतर विजयनगर साम्राज्याचा अस्त झाला.
पुढे दख्खनवर मुस्लिम सुलतानी वर्चस्व आले.
परंतु कालांतराने नायकवंशी राजांनी दक्षिण भारतावर आपले साम्राज्य पसरवले.
मुघलांनी तोडफोड केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार नायकवंशी राजांनी केला.
मंदिरांचे पुनर्निर्माण केले, परंतु दक्षिण भारतामध्ये हिंदू नायकवंशाच्या विरोधात मुस्लिम शासकांनी युद्ध पुकारले,
दक्षिणेतील मुस्लिम शासक यांनी नायकवंशातल्या शेवटच्या हिंदू राणी मीनाक्षीचा पराभव करून त्यांना कैद केले.
नायकवंशी हिंदूशासक महाराणी मीनाक्षीने कैदेत असताना विषप्राशन करून आत्महत्या केली.
अशाप्रकारे नायकवंशी राजांवरही अली खान व त्याचा दोस्त चंदासाहेब या मुस्लिम शासकांनी विजय मिळवला.
पुढे त्यांची नजर तंजावरच्या मराठ्यांच्या साम्राज्यावर पडली.
मुगल शासक नवाब, मराठ्यांशी पंगा घ्यायला निघाले.
तंजावरचे प्रतापसिंग भोसले यांनी हिंदू नृपती शाहू महाराजांना मदत मागितली.
हिंदू नृपती शाहू महाराज यांच्या आदेशावरून (छत्रपती संभाजी महाराज पुत्र) रघुजीराजे भोसले नागपूर येथून व फत्तेसिंहराजे भोसले अक्कलकोट येथून निघाले नागपूर वरून नांदेड व हैदराबादहून कर्नाटकला पोहचले.
पुढे रघुजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात २० मे, १७४० मध्ये तमलचेरी घाटीत मराठा सेना व नवाब व त्याचा दोस्त अली खान मध्ये मोठे युद्ध झाले.
या युद्धात अली खान व त्याचा मुलगा हसन खान मराठ्यांच्या हातून मारला गेला.
मराठ्यांनी कर्नाटक राज्यावर विजय मिळवला.
कर्नाटक राज्य मराठ्यांच्या राज्यात सामील झाले. मराठ्यांकडून झालेला पराभव पाहून मराठ्यांना घाबरुन नवाब चंदासाहेब तिरुचिरापल्ली तामिळनाडूला पळून गेला.
पुढे नवाब चंदासाहेबचा भाऊ बडासाहेब खान मराठ्यांना रोखायला आला पण मराठ्यांनी त्याला रस्त्यातच आडवा करून युद्धात ठार केलं.
पुढे तामिळनाडू तिरुचिरापल्ली किल्ल्यात लपून बसलेला नवाब चंदासाहेब मराठ्यांना शरण आला.
रघुजीराजेंच्या कैदेत असलेला नवाब चंदासाहेब खान याने रघुजीराजे भोसले यांना त्याला कैदेतून मुक्त करण्यासाठी त्यावेळच्या आठ लाखाची लाच देण्याचा प्रयत्न केला.
रघुजीराजे भोसले यांनी त्या आठ लाखाला लाथ मारत कैद केलेल्या नवाब चंदासाहेबला राजधानी साताऱ्याला कैदेत टाकण्यासाठी हिंदू नृपती शाहू महाराजांकडे पाठवून दिले.
दक्षिण भारतावर मिळवलेल्या विजयामुळे रघुजीराजे भोसले हें आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेल्या Tirupati balaji – भगवान तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले.
त्यावेळी त्यांनी Tirupati balaji – तिरुपती बालाजीला हिरे, माणिके, सोन्याचे दागिने अशी मौल्यवान,
त्या काळात एक लाख बेचाळीस हजाराची आभूषणे Tirupati balaji -तिरुपती बालाजीला अर्पण केली.
ज्याची किंमत आज करोडों मध्ये आहे.
ते दागिने आज पण रघुजीराजेंच्या नावाने Tirupati balaji – तिरुपती संस्थानकडे उपलब्ध आहेत, जे मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देतात.
मराठ्यांच्या शासनकालामध्ये Tirupati balaji – तिरुपती बालाजीचा विकास झाला.
विदेशी आक्रमणापासून संरक्षण होण्यासाठी रघुजीराजे भोसले यांनी मंदिर सुरक्षेसाठी सैनिक तैनात केले होते.
येणाऱ्या भक्तांसाठी धर्मशाळा, भक्तनिवास निर्माण केले, अन्नछत्र सुरु केले, महाराष्ट्रातील भक्तांसाठी रस्त्याची निर्मिती केली.
जेणेकरून महाराष्ट्रातून Tirupati balaji – तिरुपती बालाजीला दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची सोय होईल.
Tirupati balaji – तिरुपती बालाजी चा दुसरा ब्रह्मोत्सव साजरा होतो. तो मराठ्यांनी सुरू केला आहे. जो अजूनही होत आहे.
अशा प्रकारे Tirupati balaji – तिरुपती बालाजी मंदिर म्हणजे महाराष्ट्रातील मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे वैभव जे मराठ्यांनी मुघलांच्या तावडीतून मुक्त केले होते.
त्याआधी छत्रपती शिवरायांनी दिनांक ४ मे, १६६७ रोजी
तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले होते.
त्यावेळी पुरुषोत्तम भटांना सनद दिली होती.
ती आज पण उपलब्ध आहे. त्या सनदेनुसार
छत्रपती शिवरायांनी Tirupati balaji – तिरुपती बालाजी सेवेसाठी
वार्षिक ३० होन,
नंदादीपसाठी वार्षिक १२ होन,
अभिषेकासाठी १२ होन, पुरोहित पुरुषोत्तम भटाला पूजेसाठी वार्षिक ३० होन
रोजच्या अन्नछत्रासाठी एकूण ३६० होन देत होते.
दर्शनाच्या दरम्यानच छत्रपती शिवरायांनी एका वर्षाचे द्रव्य पुरुषोत्तम भटाच्या स्वाधीन केले होते.
छत्रपती शिवरायांनी त्यानंतर त्यांचा नातू हिंदू नृपती शाहू महाराज यांनी अर्थातच मराठ्यांनी तिरुपती बालाजीचे रक्षण केलं आहे.
तिरुपती बालाजी मंदिराला मराठ्यांचा गौरवशाली इतिहास आहे.
Also Visit : https://www.postboxindia.com
Also Visit : https://www.postboxlive.com
Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :
https://www.youtube.com/channel/UCto0…
Subscribe our YouTube Channel :
https://www.youtube.com/channel/UCto0…
Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.
Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.
Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,
News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.
Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.
Website : https://www.postboxindia.com
Website : https://www.postboxlive.com
Facebook : https://www.facebook.com/indiapostbox
Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox
LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia
Tumbler : https://postboxindia.tumblr.com/
Twitter : https://twitter.com/IndiaPostbox
Telegram : t.me/postboxindia
Postbox India