Taimur – रक्तरंजित इतिहास आणि तैमूर
Taimur – भाटनेर चा किल्ला अर्थात सध्याचा हनुमानगड
यदु वंशात जन्म झाल्यामुळे भगवान श्रीकृष्णांना यादव म्हटले गेले. पुढे भगवान श्रीकृष्णानंतरही या यादव घराण्याची खूप प्रगती झाली.
भगवान कृष्णाच्या घराण्यात, त्यांचे 90 वे वंशज “भाटी सिंह यादव” यांनी जवळजवळ संपूर्ण भारत जिंकला होता, त्यांनी त्यांच्या नावाने भाटी संवत देखील सुरू केले.
त्याच भाटी घराण्याच्या एका शाखेने भाटनेर ( सध्याचा राजस्थानचा एक जिल्हा, ज्याचे नाव हनुमानगड आहे ) येथेही राज्य केले. याच किल्ल्यावर सर्वाधिक हल्ले झाले आहेत. हा किल्ला त्याच्या मजबूत तटबंदी आणि भक्कम ताकदीसाठी प्रसिद्ध होता. पुढे पृथ्वीराज चौहान यांनाही या किल्ल्याची मालकी मिळाली.
हा किल्ला मुहम्मद गझनीने इसवी 1001 मध्ये ताब्यात घेतला. 13 व्या शतकात स्लेव्ह राजवंशातील बलबनने तो ताब्यात घेतला. आणि इसवी 1398 मध्ये Taimur – तैमूर लंगने हा किल्ला ताब्यात घेतला.
पुढे Taimur – तैमूरने त्याच्या ‘तुझुक-ए-तैमुरी’ या चरित्रात भारतातील सर्वात मजबूत किल्ला म्हणून त्याचे वर्णन केले आहे. भाटनेरसारखा भक्कम किल्ला आपण आयुष्यात पाहिला नसल्याचे त्याने यात लिहिले आहे. या किल्ल्यात हनुमान मंदिरापासून ते शिवापर्यंत अनेक मंदिरे आहेत. याशिवाय 52 बुरुजांसह या किल्ल्यात शेरशाह खान ( बलबनचा भाऊ ) यांची कबर आहे.
भाटनेरपासून भटिंडा आणि सिरसा या किल्ल्यांपर्यंत जाणारा या किल्ल्यामध्ये एक भूमिगत बोगदाही बांधण्यात आला होता, असे सांगितले जाते.
त्यावेळी Taimur – तैमूरने 1,50,000 च्या प्रचंड सैन्यासह या किल्ल्यावर हल्ला केला होता. हि संख्या इतकी होती की त्या वेळी भाटनेरची संपूर्ण लोकसंख्या सुद्धा इतकी न्हवती. संपूर्ण शहर जाळले गेले होते, 10,000 हून अधिक सैनिक हुतात्मा झाले, क्षत्रियांनी जौहर केला.
जफरनामा मध्ये या युद्धाचा उल्लेख आहे, जफरनामाचे लेखक लिहितात :- हे हिंदू अतिशय दृढनिश्चयी होते, ते मोठ्या शौर्याने हसत-हसत खेळत युद्धास आणि मृत्यूस सामोरे जात होते.
पण हार मानणारा तो राजपूत वंश कसला ?
काही काळानंतर त्यानी ( राजपुतांनी ) पुन्हा हा किल्ला ताब्यात घेतला. पुढे 1805 मध्ये बिकानेरच्या राठोडांनी हा किल्ला जिंकला, तो दिवस मंगळवार चा होता. मंगळवार हा हनुमानाचा वार आहे, म्हणून या किल्ल्याचे व शहराचे नाव “हनुमानगड” पडले आणि तेव्हापासून आजतागायत हे शहर आणि येथील किल्ल्याचे नाव “हनुमानगड” आहे.
Postbox India