Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRA

shahaji raje – भातवडीची लढाई व शरिफजी राजेंचा मृत्यू

1 Mins read

shahaji raje – भातवडीची लढाई व शरिफजी राजेंचा मृत्यू

shahaji raje – शरिफजीराजे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

३१ आॅक्टोबर १६२४ मधे भातवडीची लढाई झाली.मालोजी व विठोजी हे दोन भोसले बंधू प्रथमत: फलटणच्या वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांच्या बरोबर राहत होते.मालोजीराजे यांच्या पराक्रमामुळे वणगोजी नाईक निंबाळकर यांनी आपली मुलगी ऊमाबाई ऊर्फ दिपाबाई मालोजीराजे यांना दिली होती.त्यांना दोन मुले .एक shahaji raje शहाजी व दुसरे शरीफजी
        मालोजीराजेंच्या अकाली मृत्यूनंतर shahaji raje शहाजीराजे वयाच्या पाचव्या वर्षीच निजामशाहीचे जहागीरदार झाले. शहाजीराजे अत्यंत देखणे व तेजस्वी होते. त्यांची कीर्तीही निजामशाही आणि आदिलशाहीत कदाचित इतर कुळातील सरदारांपेक्षा अधिकच झालेली होती.
        shahaji raje शहाजीराजांच्या आई उमाबाई या एक धाडसी दूरदृष्टी असलेल्या स्री होत्या. आणि त्यांच्या देखरेखीखाली शहाजीराजे घडले होते व वाढलेही होते. बालपणापासून राजकारण -समाजकारण त्यांना जवळून पाहता आले .त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला युद्धशास्त्र निपुणतेचे उच्च कोटींचे अधिष्ठान लाभले होतेच,आणि त्यांच्या मनावर चांगले संस्कारही झाले होते .त्यामुळे ते फक्त योध्दा नसून त्यांचे मन साहित्य – संगीत इ.
  कलांकडेही आकर्षित झाले होते.
               मालोजीराजांकडून शूर लढवय्येपण , द्रष्टेपण आणि रयतेच्या सुखाला प्राधान्य देण्याचे औदार्य हे गुण त्यांच्यात होते तर ,आई उमाबाई राणीसाहेबांकडून धाडस, दूरदृष्टी, आणि गोरगरिब रयतेसाठी”‘करूणा ” हे गुण शहाजीराजांनी आत्मसात केले होते.शहाजीराजे हे मुळातच महापराक्रमी होते.
           त्यामुळे पुढे युद्धात त्यांची मदत मिळविण्यासाठी निजामशाही, आदिलशाही आणि मोगलशाही वेळप्रसंगी प्रयत्न करत होते. shahaji raje शहाजीराजे ध्येय धुरंदर व अत्यंत महत्त्वाकांक्षी होते. राजनीती व प्रशासनाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. सत्ता ही खऱ्या अर्थाने सत्ताधिशांना नव्हे तर आम रयतेला सुखावणारी असावी हे ब्रीद त्यांनी मालोजीराजेंकडूनच शिकून घेतले होते.
            मराठी मातीत स्वराज्य निर्मितीचा पाया प्रथमतः शहाजीराजांनी घातला. आपले स्वप्न आपल्या मुलाच्या हातून साकार करून घेणारा हा नवा पायंडा जगासमोर ठेवणारा हा राजा होता.स्वराज्य स्थापनेची स्फुर्ती जिजाऊ शिवरायांना देणारा व स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता म्हणून शहाजीराजांचे योगदान लक्षणीय आहे.
          भातवडीच्या युद्धामुळे shahaji raje शहाजी राजांची प्रतिष्ठा खूप वाढली. त्यांना वगळून आता दक्षिणेत कोणतेही राजकारण सिद्धीस नेणे अशक्य होते .भातवडीच्या लढाईचे खरे शिल्पकार शहाजीराजेच होते. शहाजीराजांनी भातवडीच्या लढाईत फार मोठा पराक्रम गाजवला. अहमदनगरच्या पूर्वेस भातवडीची गढी सुमारे दहा मैलावर डोंगराळ प्रदेशात गणिमीयुध्द पध्दतीने अत्यंत अनुकूल आहे. येथे मोगल व विजापूरच्या सैन्याचा शहाजीराजांनी पूर्ण पराभव केला. या लढाईत शहाजीराजांनी मोठा पराक्रम केल्यामुळे मलिक अंबरला त्यांचा हेवा वाटू लागला. फक्त शहाजीराजांच्या पराक्रमाच्या दृष्टीने हे युद्ध अत्यंत महत्त्वाचे ठरले .या युद्धानंतर शहाजीराजे हे व्यक्तिमत्व राजकीय पटलावर विशेष चमकू लागले.
           shahaji raje शहाजीराजे व शरीफजी राजे यांनी या लढाईत विशेष शौर्य दाखवले. आपल्या बाणांनी पाडणाऱ्या मोगल सैन्यावर शहाजीराजे तुटून पडले व त्यांनी मोगलांची दाणादाण उडवून दिली भातवडीच्या युद्धाने निजामशाहीचा बचाव झाला ,म्हणून हा प्रसंग ,ही लढाई महत्त्वाची मानली जाते. मोगल व विजापुरी फौजांचा जंगी पराभव करून शहाजीराजांनी निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांना विजय मिळवून दिला. निजाम व मलिक अंबरला खूप आनंद झाला .त्यांना कळून चुकले की राजांच्या शौर्याचा दरारा चारही पातशाहीत विलक्षण वाढला. सर्वांना शहाजीराजांच्या सामर्थ्याचा, शौर्याचा धाक निर्माण झाला. निजामशाहीचा बचाव झाला व शहाजीराजांचे नाव इतिहासात अजरामर झाले.
       या युद्धात दुर्दैवाने शहाजी राजे यांचे बंधु शरिफजीराजे ठार झाले.
         खंडागळे हत्ती प्रकरणांमध्ये मलिक अंबर वजीर व निजाम शहा यांचा हात होता .लखुजीराजे यांचा काटा काढण्यासाठी हे प्रकरण पण निजामशहाणे घडवून आणले. लखुजीराजे निजामशाही सोडून थेट शहाजहानला सामील झाले . हे कळताच विजापूरच्या आदिलशहाने जहांगीर बादशहाशी युती करून निजामशाहीवर आक्रमण करण्यासाठी मोगलांच्या सैन्यास मिळून नगरवर आक्रमण केले. नगर जवळच्या भातवडी या गावी मोगल आदिलशहा यांच्या संयुक्त सैन्यावर मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली निजामशाही सैन्य चालून आले.निजामशहाने गनिमी काव्याचा कुशलतेने वापर करून शत्रु सैन्याची रसद तोडली व अचानक हल्ला करून ह्या बलाढ्य शत्रूंचा दणदणीत पराभव केला. ह्या लढाईत शहाजीराजांनी खूप मोठा पराक्रम गाजवला.

अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतातील इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे आणि शरीफजीराजे व वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ. स. १६२४). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत shahaji raje शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले.
         शरीफजींच्या धर्मपत्नी म्हणजे देवगिरीच्या सोमवंशी यादव कुळातील यादवराजांची कन्या व सिद्धराजांच्या भगिनी दुर्गाबाईसाहेब.
शरीफजीराजे यांना दोन मुले, एक महादजी आणि एक त्रिंबकजी. यांच्या मुलाचं नाव व्यंकटजी, यांना अहमदनगर भागातील जहागिरी मिळाली होती, त्याना सहा मुले संभाजी, माणकोजी (खानवट घराणे) शहाजी ,बेळवंडी घराणे शरीफजी, तुकोजी, बाबाजी. आज यातील भोसले वंशज वेगवेगळ्या विभागात रहात आहेत.शरीफजीराजे यांचे भातवडी येथे स्मारक असून राशीन येथील प्रसिद्ध देवी मंदिराशेजारी त्यांच्या पत्नीचे व पुत्र त्र्यंबकजी यांची समाधी स्थळे आहेत.

        अशा या थोर व शोर्यशाली शरीफजीराजे यांचा ३१ आॅक्टोबर १६२४ रोजी मृत्यू झाला. स्मृतिदिनानिमित्त शरीफजीराजे यांना विनम्र अभिवादन 

Also Visit : https://www.postboxlive.com

                    लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर 

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!