religion – धर्माचा धंदा, सत्तेत फांदा
religion – इतिहास तपासल्यास ‘शिवसेना-भाजप’ युती हीच ‘अनैसर्गिक’ ठरते.
लेखक : ज्ञानेश महाराव
सत्तेसाठी खेळल्या जाणाऱ्या राजकारणात नैसर्गिक-अनैसर्गिक असं काही नसतं. त्यात नाममात्र विचार आणि बहुतांश स्वार्थ असतो. तो घडवून आणलेला- म्हणजे कृत्रिम व्यवहार असतो.
त्याचा सौदा ‘समान किमान कार्यक्रम’ (कॉमन मिनिमम प्रोग्रॅम) नावाने केला जातो. त्यासाठीच युत्या-आघाड्या बनतात आणि सोयीने मोडतात.
असे असताना ‘शिवसेना’ बंडखोर एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार religion – ”हिंदुत्वासाठी ‘भाजप’शी युती हवी,” असे म्हणताच,
स्वयंभू राजकीय विश्लेषकांनी ‘शिवसेना’च्या ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस’ बरोबरच्या ’महाविकास आघाडी’ला ‘अनैसर्गिक’ ठरवणे, हा अतिशहाणपणा झाला.
किंबहुना, इतिहास तपासल्यास ‘शिवसेना-भाजप’ युती हीच ‘अनैसर्गिक’ ठरते.
‘भाजप’ हा १९८४ पर्यंत पूर्वावतारी ‘जनसंघ’सारखा तत्त्वनिष्ठ आणि समाजवाद्यांच्या भाषेत सांगायचे, तर साधनशुचिता – अर्थात, साधनांची पवित्रता मानणारा;
सोप्या शब्दांत ‘सोवळे’ जपणारा पक्ष होता. आता ते सोवळे दाखवण्यापुरतेही उरले नाही. सत्ताप्राप्तीच्या उद्दिष्टासाठी वाट्टेल ते करणाऱ्या religion – ’धंदो छे’ वृत्तीच्या मंडळींचा ’भाजप’ झालाय.
या मंडळींच्या आधीच्या पिढीतील नेतृत्वाने ३० वर्षांपूर्वी अयोध्येतला religion – मंदिर-मशीद वादाचा वापर करीत;
हिंदुत्वनिष्ठ पत्रकारांच्या माध्यमातून भाबड्या अशिक्षित आणि religion – देव-धर्मभोळ्या सुशिक्षित religion – हिंदूंच्या डोक्यात हिंदुत्वाचा गॅस भरण्यासाठी नाना युक्त्या केल्या.
religion – हिंदू धर्माचा झेंडा जगभर फडकविणारा ‘महात्मा’ येत असल्याचे भविष्य शेकडो वर्षांपूर्वी ’नास्त्रादॅम’ने वर्तवलंय, तो ’धर्मवीर’ जणूकाही आपल्यातच वावरतोय,
असे लोकांच्या मनात भरावे, अशी कुजबुज ‘भाजप- संघ परिवार’ने पद्धतशीरपणे केली.
‘शिवसेना’ ही आजच्यासारखीच सुरुवातीपासून religion – मराठी माणसांचीच संघटना होती आणि आहे.
पण ‘भाजप-संघ परिवार’च्या सापळ्यात फसून ‘शिवसेना’ने religion – हिंदुत्वाचा सूळ खांद्यावर घेतला.
पण त्याने मुंबईतल्या गुजराती व उत्तर भारतीय religion – हिंदूंनी ’शिवसेना’ला आपली संघटना मानले, असे झाले नाही.
मुंबईसह महाराष्ट्रातल्या अमराठींचा अग्रक्रम ‘भाजप’लाच राहिला आहे. ’भाजप- शिवसेना युती’ असेल तरच ही मंडळी ’भाजप’ला स्मरून ’शिवसेना’ला आपलं मानतात.
ह्याचा अनुभव उद्धव ठाकरे ‘मुख्यमंत्री’ झाल्यापासून शिवसैनिक घेत आहेत. ‘शिवसेना’ची नाळ मराठी माणसाशी जुळलेली आहे,
ह्याचे विस्मरण विशेषकरून मुंबईतील अमराठी माणसांना होत नाही. उलट, त्याची खंत त्यांना सतत सलत असते.
म्हणूनच सत्तेच्या दलालासारखा वावरणारा मोहित कंबोज ’टीम एकनाथ शिंदें’ना ‘भाजप’ची रसद पोहोचवण्यासाठी सुरतला तातडीने हजर राहातो.
हा आटापिटा मुंबई महानगरपालिकेवर ‘भाजप’चा झेंडा फडकवण्यासाठी आहे. पूर्वी ‘मुंबई काँग्रेस’मध्येही अशी अमराठी शक्ती होती.
तिला रोखण्याचे काम ‘महाराष्ट्र काँग्रेस’च्या नेत्यांनी सातत्याने केले आहे. ’शिवसेना’ मुंबईत वाढली तरी ती ’काँग्रेस’च्या मुळावर येणार नाही;
’काँग्रेस’ला ज्या गोष्टी उघडपणे करता येत नाहीत, त्या ‘शिवसेना’ मार्फत करून घेता येतील; आणि मुख्य म्हणजे, मुंबईचे मराठीपण ‘शिवसेना’च्या माध्यमातून राखता येईल,
ही गोष्ट ओळखून महाराष्ट्राचे काँग्रेसी नेते हे शिवसेनाप्रमुखांशी व नेत्यांशी कायम आपलेपणाचे संबंध ठेवत आले आहेत.
त्यामुळेच ’शिवसेना’ला ’वसंत सेना’ असे हिणवले तरी त्याकडे शिवसेनाप्रमुखांनी आणि त्यांच्या समकालीन ‘काँग्रेस’ नेत्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले आहे.
’मुंबई महानगरपालिके’त ’शत- प्रतिशत भाजप’ची सत्ता आणण्याचे स्वप्न बाळासाहेब हयात असल्यापासूनचे आहे. ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चार वेळा भंगले आणि ’शिवसेना’चा भगवा फडकला.
आताही ‘भाजप’ पुरस्कृत ‘शिवसेना’ आमदारांची बंडखोरी ही मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठीच आहे. मुंबई जिंकण्यासाठीच ’भाजप’ला महाराष्ट्राची सत्ता हवीय.
यासाठीच ’भाजप’ने ३० वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांना religion – हिंदुत्वाच्या जाळ्यात ओढले होते. ह्या जाळ्यानेच ’भाजप – संघ’ परिवाराच्या ‘थिंक टँक’ने ’शिवसेना’च्या सहाय्याने महाराष्ट्र जिंकण्याचा;
महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला भटी हिंदुत्वाकडे वळवण्याचा व त्याद्वारा ‘भाजप’ला ज्या भागात कधी प्रवेशसुद्धा मिळाला नव्हता,
तिथे भगव्याच्या आडोशाने प्रवेश करून घेण्याचा धूर्त डाव टाकला गेला. त्यात ’शिवसेना’ नेते फसले. ’काँग्रेस’ बरोबरचे त्यांचे आपलेपणाचे नाते विसरले.
’काँग्रेस’ नष्ट करण्याची भाषा त्यांनी केली. त्यासाठी ’भाजप’कडे आपले सामर्थ्य गहाण टाकले. ‘भाजप’ने ‘शिवसेना’ पोखरली.
‘भाजप’चे तत्त्वज्ञान, ’भाजप’चे राजकारण आपलेच आहे, असा भ्रम ‘शिवसेना’ कार्यकर्त्यांच्या डोक्यात शिरला. अशा डोक्यांनीच एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांनी
’भाजप’चा बुडवलेला गणपती पुन्हा बसवण्यासाठी केलेले बंड हे मराठींच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचे नाही. ते बिनडोकपणाचे आहे.
हिंदुत्वाची नशा, मराठींची दुर्दशा
’टीम शिंदे’ हिंदुत्वाच्या राजकारणासाठी ’शिवसेना’ला ‘भाजप’शी जोडण्याचा आपला अट्टहास असल्याचे सांगते.
हे जोडकाम ’मनसे’ प्रमुख राज ठाकरे यांनीही हिंदुत्वाचा पुकार करून केले आहे. परंतु,
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा ’माफी’साठी ’भाजप’ खासदार बृजभूषणसिंह यांनी अडवल्यामुळे ’मनसे’चे हिंदुत्व भोंग्यात झाकले गेले आहे.
असो, ’भाजप’च्या बरोबरीने हिंदुत्वाचे राजकारण करून ‘शिवसेना’ने शेवटी कमावले काय, हा खरा प्रश्न आहे.
ज्या शिवसैनिकांनी हातात हात घालून ’भाजप’ला मुंबईसह महाराष्ट्रात गल्लोगल्ली नेले, त्या ’शिवसेना’लाच मुंबई-ठाण्यातले आमदार फोडून गारद करण्याचे डाव ‘भाजप’ खेळला.
त्यासाठी ‘ईडी’, ‘सीबीआय’, ‘इन्कम टॅक्स’च्या केंद्रीय यंत्रणांचा हत्यारासारखा वापर केला. याकडे मराठींनी दुर्लक्ष का करायचे?
’भाजप-संघ’ परिवार हिंदूरक्षक आहेत म्हणून? हिंदुत्वाचे रक्षण ‘भाजप’च करू शकतो, हा भ्रम दूर करण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी ’काँग्रेस’ने हिंदूंचा घात केला,
अल्पसंख्याकांचे लांगूलचालन केले, ह्या आरोपांंची पूर्वग्रह न ठेवता तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच, ’काँग्रेस’ आणि ’भाजप’ यांच्या गुणवत्तेत काही फरक आहे का,
ह्याचाही विचार होण्याची जरुरी आहे. असे काही ’टीम शिंदे’ करणार नाही. ते सत्तेचे गुलाम आहेत.
म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांचा ’हिंदूहृदयसम्राट’ गौरव करीत त्यांनी वाढवलेल्या ‘शिवसेना’त गद्दारीचा उद्योग त्यांच्याकडून झाला आहे. पण ‘टीम शिंदे’ला तरी दोष किती द्यायचा?
‘शिवसेना’ने हिंदुत्वाचे राजकारण नको तितके केल्याने महाराष्ट्रातल्या तमाम मराठींची अवस्था ही हिंदू धर्मातल्या वर्ण वर्चस्वाने शूद्र-अतिशूद्रांची केली, तशी झाली आहे.
यामुळे कुणाचे कोहिनूर झळकत असेल, पण मराठी माणसांच्या स्वप्नांचा कोळसा झाला आहे. तरीही मराठी माणसासाठी ‘शिवसेना’ पुन्हा लढेल, अशी वेडी आशा होती.
’शिवसेना’ने मुख्यमंत्रीपदासाठी ’भाजप’ला सोडले. पण राजकारणाच्या धंद्याला लावलेले ‘भाजप’चे हिंदुत्व नाही सोडले. तथापि, सोडल्याचे बोलणे वेगळे आणि सोडणे वेगळे!
ही प्रक्रिया उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांपूर्वीच मुख्यमंत्रीपद स्वीकारताना पूर्ण केली असती तर ’टीम शिंदे’ला ‘भाजप’च्या फसव्या हिंदुत्वाच्या दिशेने पळ काढण्यास कारण मिळाले नसते.