Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

Ramdev baba बाबांना राग का येतो ? –   प्रेमकुमार बोके

1 Mins read

Ramdev baba रामदेव बाबा भारतातील एक मोठे नाव आहे.आपल्या योगाच्या सामर्थ्यावर रामदेव बाबांनी आपल्या देशामध्ये एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.परंतु जेव्हा रामदेव बाबांनी योगाच्या जागी औषधे विकायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्याविषयी लोकांच्या मनात काही शंका-कुशंका व प्रश्न निर्माण झाले.

त्यानंतर जेव्हा ते एका विशिष्ट पक्षाची बाजू घेऊन बोलायला लागले, तेव्हा मात्र Ramdev babaरामदेव बाबा हे योगगुरू नसून राजकीय गुरु आहे हे लोकांच्या लक्षात आले. तरीसुद्धा लोकांनी फार आक्षेप घेतले नाही. परंतु 203-14 मध्ये रामदेव बाबांनी जर नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले तर पेट्रोल 30-40 रुपये लिटर, गॅस सिलेंडर 300 रुपयात आणि विदेशातील काळा पैसा भारतात येईल अशाप्रकारे नरेंद्र मोदींच्या बाजूने जोरदार प्रचार केला होता.

नरेंद्र मोदींचे सरकार 2014 आणि 19 मध्ये सत्तेवर आले.सध्या 2022 सुरू आहे.आज देशात महागाईचा आगडोंब उडालेला आहे. लोक महागाईने त्रस्त झालेले आहे.देशाची आर्थिक अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे.अशावेळी काही पत्रकारांनी जेव्हा रामदेव बाबांना प्रश्न विचारला की, नरेंद्र मोदी जर देशाचे प्रधानमंत्री झाले तर तीस रुपये लिटरने पेट्रोल मिळेल असे तुम्ही सांगितले होते.

आज पेट्रोल 110 रुपये आहे, तर यावर तुमचे काय मत आहे ?सिलेंडरच्या किमतीसुद्धा प्रचंड वाढलेल्या आहे.याबद्दल तुम्ही सरकारला जाब का विचारत नाही ?तेव्हा प्रश्नांची सरबत्ती सहन न झाल्या मुळे Ramdev baba रामदेव बाबांनी आपले नियंत्रण गमावून पत्रकारांनाच खरे-खोटे सुनावले. मी तुम्हाला पाहून घेईल इथपर्यंत रामदेव बाबा बोलले.

शेवटी आपले काहीतरी चुकत आहे व आपण बोलण्यात चूक केलेली आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सारवासारव केली. परंतु तोपर्यंत सोशल मीडियावर संपूर्ण देशात रामदेव बाबा यांचे वक्तव्य व्हायरल झालेले होते.त्यामुळे सोशल मीडियावर असंख्य लोकांनी रामदेव बाबांच्या या वागणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि बाबांना राग का येतो असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.

रामदेव बाबांनी आपल्या देशात योगाला चांगल्या प्रकारे स्थान प्राप्त करून दिले यामध्ये शंका नाही.रामदेव बाबांना मार्केटिंगची कला चांगली अवगत असल्यामुळे त्यांनी योगाच्या माध्यमातून प्रचंड पैसाही कमावला. नंतर आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीतून ते मोठे उद्योगपती बनले.त्यामुळे रामदेव बाबा आज देशातील राष्ट्रीय स्तरावरील लोकांसोबत दररोज उठबस असणारे एक मोठे प्रस्थ बनले आहे.

त्यामुळे कधी कधी त्यांना आपल्या या प्रसिद्धीचा अहंकार झाल्याचा प्रत्ययही येतो.त्यामुळेच पत्रकारांनी सत्य विचारल्यानंतर सुद्धा ते सत्य ते पचवू शकले नाही व पत्रकारावरच त्यांनी आपला राग काढला. त्यामुळे ज्या लोकांना आपण बाबा,महाराज, सद्गुरु, बापू असे म्हणून त्यांचा जयजयकार करतो, तेच लोक जर ज्या जनतेने त्यांना मोठे केले आहे त्या जनतेचे हाल होत असताना त्यांच्यासाठी जर आवाज उठवत नसेल तर आपण यांना खरोखर जनतेचे तारणहार समजावे काय ?

Also Visit : https://www.postboxlive.com

Ramdev baba रामदेव बाबा अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती आहे.या क्षेत्रातील व्यक्तीने राजकीय लोकांची बाजू घेण्या पेक्षा सर्वसामान्य जनतेच्या बाजूने नेहमी आपले मत व्यक्त केले पाहिजे.जनतेच्या समस्या,अडचणी, प्रश्न सरकारसमोर मांडले पाहिजे. आपल्या नावाचा,अधिकाराचा, संबंधाचा वापर करून कोणतेही सरकार असो, त्यांच्यावर दबाव आणून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडले तरच खऱ्या अर्थाने भगवे कपडे घालून स्वतःला बाबा म्हणून घेण्यात काहीतरी तथ्य आहे.

अन्यथा पवित्र अशा भगव्या रंगाचा तो अपमान आहे व त्या रंगाच्या आडून अनेक बाबा मंडळी जनतेला लुबाडत असतात असे म्हटले तर काही चूक होणार नाही.त्यामुळे आज Ramdev baba रामदेव बाबा स्वतः जरी प्रचंड श्रीमंत झाले असले तरी, आपल्या देशात आज महागाईमुळे सामान्य जनता मात्र त्रस्त झाली आहे.सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे.

प्रत्येक वस्तूचे भाव गगनाला भिडलेले आहेत.अशावेळी सर्वसामान्य माणसांची बाजू घेऊन त्यांच्या प्रश्नांसाठी उभे राहणे व सरकारला जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडणे हे रामदेवबाबा सारख्या योगगुरूचे आद्यकर्तव्य आहे.ज्या जनतेने तुम्हाला सर्व काही दिले ,नाव गाव, पैसा, पद,प्रतिष्ठा सर्व गोष्टी तुम्हाला लोकांमुळे मिळाले आहे. आज त्याच लोकांवर जर संकट आले असेल, तर त्यांच्यासाठी धावून जाणे हे कोणत्याही धर्मगुरूचे काम असते.

परंतु तसे न करता सरकारची बाजू घेऊन पत्रकारांना धमकावणे हे भगवाधारी गुरूंना शोभत नाही.त्यामुळे रामदेव बाबांचे हे वक्तव्य चुकीचे असून त्यांचा निषेध झाला पाहिजे.त्यांनी दहा वर्षापूर्वी जनतेला जी आश्वासने दिली होती,ती आश्वासने सरकार पूर्ण करत नसेल तर सरकारला जाब विचारणे ही त्यांची जबाबदारी आहे.

Also Read : https://www.postboxindia.com/gudi-padwa-2022-why-gudi-should-saffron-flag/

कारण Ramdev baba रामदेव बाबांनी त्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासाठी देशांमध्ये प्रचंड वातावरण निर्मिती केली होती आणि त्यामुळे मोदींना खूप फायदा सुद्धा झाला होता.परंतु आज रामदेवबाबा पेट्रोल डिझेलचे भाव शंभर रुपयाच्या वर गेले असताना सुद्धा एक शब्द बोलायला तयार नाही.याचाच अर्थ ते कुठेतरी सरकारसमोर झुकलेले दबलेले आहे असे वाटते.

आपल्या देशात अनेक मोठमोठे बुवा, बापू, बाबा आहेत.त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे.शेकडो एकर जमिनी आहेत.सर्वसामान्य माणसांच्या देणगीतूनच त्यांनी आपले आर्थिक साम्राज्य उभे केले आहे.अनेक महाराजांजवळ स्वतःचे हेलिकॅप्टर व चार्टर प्लेन सुद्धा आहे.आपल्या प्रवचनातून जरी हे तथाकथित संत किंवा महाराज लोकांना अध्यात्माचे ज्ञान पाजत असले तरी यांच्या प्रत्यक्ष आचरणात मात्र खूप मोठी तफावत आहे.अनेक महाराज सध्या बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगामध्ये बंदिस्त आहे.

अशावेळी धार्मिकतेचा बुरखा पांघरलेल्या या लोकांवर कसा विश्वास ठेवायचा आहे हा प्रश्न लोकांना पडणे साहजिक आहे.ज्या लोकांच्या भरोशावर ही मंडळी नावारूपास आली, त्याच लोकांना संकटात साथ न देणे म्हणजे लोकांच्या श्रद्धेचा गैरवापर करणे होय.लोकांना मोठमोठ्या गोष्टी सांगणाऱ्या या बापू,बाबांनी अडचणीच्या काळात लोकांच्या सोबत उभे राहणे,लोकांचा आवाज बनणे,

सरकारसोबत संघर्ष करणे ही त्यांची खरी जबाबदारी व नैतिक कर्तव्य आहे.परंतु ही तथाकथित संत मंडळी जनतेच्या बाजूने उभे राहण्याऐवजी जनतेचे शोषण करणाऱ्या लोकांचे समर्थक बनलेली आहे.त्यामुळे आतातरी सर्वसामान्य लोकांनी या ढोंगी लोकांचे खरे रूप ओळखले पाहिजे व अशा शोषक प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे.

प्रेमकुमार बोके

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

 

Leave a Reply

error: Content is protected !!