Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

history of india इतिहासाचे थडगे आणि धडे

1 Mins read

history of india इतिहासाचे थडगे आणि धडे

 history of india दारूच्या बाटलीच्या बदल्यात आयएसआय ला गुपित विकणारे,

हेरगिरी करणारे लोक पकडलेले आहेत ते कोण आहेत हे आडनाव वाचल कि कळत ना ?

 

 

 

सिंकदर ग्रीक राजा.जग जिंकायच्या लालसेने त्याने भारतावर आक्रमण केल.ग्रीस मधून तो जिथे कुठे गेला तिथे त्याच्या सैन्याला दाणापाणी, घोड्यांना चारा वगैरे लागल असेलच ना ? त्याने ते लुटून घेतल असेल किंवा विकत घेतल असेल.भारतात त्याला मदत करणारे राजे कोण होते ? त्यावेळी त्या राजांचा धर्म कोणता होता ? हिंदू ना ?

 history of india मुघल किंवा मुस्लिम आक्रमकांच्या बाबत त्यांचे देश वेगवेगळे होते.बाबर तैमुर आणि चेंगीजखानचा वंशज, बाबर मुळचा मंगोल.त्याच्या आधी आलेले गझनीचा महमूद , अल्लाउद्दिन खिलजी किंवा अन्य आक्रमक भारतात आले खैबरखिंडीतूनच.
महमूदने २००० किलोमीटर अंतर पार करून सोमनाथ मंदिरावर धाड टाकली.या दोन हजार किलोमीटर प्रवासात त्याला निदान पाचशे गाव लागली असतील.दर गावात एक मंदिर.त्या काळात प्रवासाला घोडेच असायचे.त्याला सोमनाथला यायला दीड महिना लागला असणार.या दरम्यान घोड्यांनी काय खाल्ल , सैनिकांनी काय खाल्ल पिल ? समजा त्याने रसद लुटायची म्हटली तर स्थानिक राजानी त्याला विरोध केला का ? कि स्थानिकांनी मदत केली ? हे स्थानिक कोण होते ? हिंदू ना ?

देवगिरीच्या अजिंक्य किल्ल्याला जिंकायला खिलजीला मदत करणारा हेमाद्री पंडीत कोण ? धान्याच्या पोत्यांऐवजी मिठाची पोती कोठारात भरल्यावर वेढ्यात अडकलेल सैन्य भुकेने व्याकूळ होणारच ना ? हेमाद्री पंडित कोण होता ? हिंदू ना ?

 history of india मुस्लीम आक्रमकांच्या सैनिकांची संख्या आणि भारतातल्या सगळ्या राजे रजवाडे,संस्थानिकांच्या सैन्याची संख्या मोजली तर काय समजत ? मग मुस्लीम आक्रमक जास्त शूर होते म्हणून जिंकले का ? ते शूर असतील तर हिंदू राजांच्या शौर्याच्या कहाण्या सगळ्या बकवास आहेत का ? मग त्यांना मदत करणारे स्थानिक राजेच ना ? ते कोण ? हिंदूच ना ?

मुघलांची सत्ता स्थापन झाल्यावर बहुतांशी सरदार, सुभेदार, सेनापती हिंदूच होते, अकबराचा सेनापती मानसिंग हे उदाहरण पुरेस आहे.राजस्थानच्या रजपुतांच्या मुघलांशी सोयरिकी तर अनेक वर्षे सुरु होत्याच ना ?

नोकरीच्या आमिषाला भुलून, पैशाला भुलून किंवा हिंदू धर्मातल्या जातिभेदाला कंटाळून भारतीयांनी इस्लाम स्विकारला हि इस्लामची भीती म्हणायची कि पैशाचा नोकरीचा लोभ म्हणायचा कि हिंदू धर्माची आडमुठी भूमिका कारणीभूत म्हणायची. उत्तर काहीही असेल तरी हिंदू धर्म सोडून लोक इस्लाम स्वीकारू लागले हे सत्य कायम राहतच. भौतिक सुखापायी जर लोक धर्म सोडून सहज इस्लाम स्विकारत असतील तर मग हा हिंदू धर्माचा कमकुवतपणा नव्हे काय ?

 history of india भारतीय उपखंडात जन्मलेल्या चार धर्मांची तत्व वेगळी असली तरीही त्यांच्यामागे कारण होत ते विषमता,म्हणूनच बौद्ध, जैन, लिंगायत आणि शीख धर्माची स्थापना झाली, हिंदू धर्मातली विषमता मोठ्या संख्येने असलेल्या समाजाला शिक्षणाची ,रोजगाराची,त्यातून येणाऱ्या संपत्ती निर्मितीची, विकासाची संधी नाकारत होती हे कटू सत्य आपण नेमकं कधी स्विकारणार ? ही हिंदू धर्मातील त्रुटी नव्हे काय ?

अगदी अलीकडल्या काळापर्यंत ज्या कालखंडाला महाराष्ट्रच सुवर्णयुग म्हणतो त्या काळातही साक्षात छत्रपती शिवाजी राजांचे वडील शहाजीराजे बंगळूरच्या दरबारात राजे म्हणून बसत असले आणि आदिलशहाने त्यांना फर्जंद किताब दिलेला असला तरीही ते आदिलशाहीशी एकनिष्ठ होतेच ना ?

संख्येने पाच दहा हजार असलेल्या इंग्रजांनी या देशावर दीडशे वर्षे राज्य केल ते स्थानिकांच्या जोरावरच ना ? जालियानवाला बाग असो, चलेजाव आंदोलन असो किंवा मिठाचा सत्याग्रह असो, भारतीय आंदोलकांच्या छातीवर गोळ्या झाडताना , लाठ्यानी झोडपत असताना एकही भारतीय पोलिसाला आदेश पाळायला नकार देऊन इंग्रजांवर उलट हल्ला करण्याची हिंमत झाली नाहीच ना ?

सध्याच्या काळातही दारूच्या बाटलीच्या बदल्यात आयएसआय ला गुपित विकणारे, हेरगिरी करणारे लोक पकडलेले आहेत ते कोण आहेत हे आडनाव वाचल कि कळत ना ?

२००० वर्षाच्या कालखंडात कुठल्याही राजवटीचा history of india इतिहास तपासून पहा. इथल्या जनतेची नाळ राजवटीशी जुळलेली अपवादाने सापडते, अन्यथा राजे एकमेकांच्या उरावर बसत असताना, वतन, जहागिरी ,संस्थान यासाठी लढत असताना सामान्य माणूस पोटाची लढाई लढत होता.

त्यामुळे अमक्या आक्रमकांनी आमच्या देशाला लुटलं,नागवल म्हणून गळे काढण हे अर्धसत्य आहे आणि इथल्या स्थानिक जनतेने त्यांना साथ दिली म्हणून शक्य झाल हे पूर्णसत्य आहे.

ते लुटायला आलेले होते हे उघड होत, तुमचे धर्माचे ठेकेदार, रक्षक त्यांच्याशी लढले कि त्यांच्याशी जुळवून घेऊन जहागिरी,वतन,पदव्या,तनखे घेऊन मालामाल झाले हे तुमच तुम्ही पहा.

 

आनंद शितोळे

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!