Border issue करा कष्ट, सोडवा सीमाप्रश्न
उदगीर येथे ‘९५ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन’ नुकतेच संपन्न झाले. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचे अध्यक्षीय भाषण देशातल्या सद्य:स्थितीचा मर्मभेद घेणारे झाले. त्यावर भाष्य करणे म्हणजे ‘पिवळा पितांबर’ म्हणण्यासारखे आहे.
असो. उदगीर हा लातूर जिल्ह्यातला कर्नाटक राज्याला खेटून असलेला महाराष्ट्राचा सीमावर्ती तालुका. ‘उदगीर बाबा’मुळे नाव मिळालेल्या या शहरावर ८०० वर्षे मुघलांचे राज्य होते. हे शहर ‘मराठा विरुद्ध निजाम’ यांच्यात इ.स.१७६० मध्ये झालेल्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे.
या युद्धात सदाशिव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या सेनेने निजामाचा पराभव केला. ’पानिपत’च्या (आता हरयाणा राज्यात) तिसर्या लढाईची सुरुवात (जानेवारी १७६१ मध्ये) उदगीर येथून झाली. अशा उदगीरला लागून कर्नाटक राज्याचा ‘बिदर जिल्हा’ आहे.
यातील बिदर व भालकी तालुक्यात मोठ्या संख्येने मराठी बांधव आहेत. तेही कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मराठी सीमा बांधवांप्रमाणेच महाराष्ट्रीय होण्यासाठी गेली ६५ वर्षे सनदशीर मार्गाने Border issue लढा देत आहेत.
Border issue भाषावार प्रांतरचनेच्या सूत्रानुसार, खानदेश – मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्र (देश), विदर्भ, कोकण आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची १ मे १९६० रोजी स्थापना झाली. त्यासाठी मराठींना पाच वर्षांचा ‘संयुक्त महाराष्ट्र’चा आग्रह धरणारा लढा मोठ्या जिद्दीने द्यावा लागला.
त्यात १०६ हुतात्मे झाले. त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तरी पालघरच्या पुढचा डांग जिल्हा गुजरातेत गेला. बिदर, भालकी, निपाणी, बेळगाव, कारवार हा मराठी भाषिक बहुल भाग कर्नाटकात गेला.
विदर्भातील नागपूर लगतचा काही भाग मध्य प्रदेशात आणि नांदेड, चंद्रपूर, यवतमाळ लगतची शेकडो गावं आंध्र प्रदेशात (आताच्या तेलंगणा राज्यात) गेली. ह्या सर्व भागातील मराठी भाषिक आपला भूभाग महाराष्ट्रात आणण्यासाठी आपल्या कुवतीनुसार गेली ४-५ पिढ्या झटत आहेत.
जिथे आहेत, तिथे ’माय मराठी’साठी सत्तेचा अन्याय सोसत आहेत. महाराष्ट्रातील जनता त्यांच्या Border issue सीमाप्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी संघटितपणे उठून उभी राहात नाही, हे त्यांचं दुःख आहे. हे दुःख व्यक्त करण्यासाठी ‘अ.भा. मराठी साहित्य संमेलन’ ही त्यांची हक्काची जागा आहे.
कारण ‘अ.भा. मराठी साहित्य संमेलना’तूनच आचार्य अत्रे आणि ग. त्र्यं. माडखोलकर यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ मराठी राज्याच्या मागणीची गर्जना केली आणि १९५६ मध्ये ‘संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा लढा’ उभा राहिला.
त्यामुळे ‘महाराष्ट्र राज्य निर्मिती’नंतर जे लाखो मराठी सीमाबांधव ; विशेषकरून कर्नाटक राज्यात आपल्या घरदार-जमीनजुमल्यासह अडकून राहिलेत, ते प्रत्येक ‘अ.भा.मराठी साहित्य संमेलना’त महाराष्ट्रीय होण्यासाठी आपला आवाज उठवत असतात.
तशा घोषणा भालकी-बिदरहून आलेल्या मराठी बांधवांनी उदगीर साहित्य संमेलनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाच्या वेळी दिल्या. त्या आधी महाराष्ट्र विधान ‘परिषद’च्या उपसभापती व ’शिवसेना’ नेत्या डॉ. निलम गोर्हे यांनी आपल्या भाषणात ‘संयुक्त महाराष्ट्र’ संपूर्ण करण्याचा ठराव मांडला.
मंत्री अमित देशमुख (काँग्रेस) यांनी ‘बिदर-भालकी जिल्हा महाराष्ट्रात आणण्याच्या कामी लक्ष घालावे,’ अशी विनंती शरद पवार यांना केली.
कर्नाटकाच्या वादग्रस्त सीमाभागातील मराठींवरील भाषिक अत्याचार थांबवावेत, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राज्य शासनातर्फे पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात Border issue ”सीमाप्रश्न सोडवण्यासाठीची लढाई ‘महाराष्ट्र सरकार’च्या वतीने जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे.
वादग्रस्त Border issue सीमाभागातील मराठी भाषिकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल,” अशी खात्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. या सोपस्कारामागची भावना प्रामाणिक असली तरी त्याचेही आता कर्मकांड झाले आहे.
ते केले की, संमेलनात घोषणा देणारे सीमाबांधव शांत होतात, हाही सालाबादप्रमाणे होणारा चमत्कार झाला आहे. या सीमाप्रश्नासाठी ‘शिवसेना’ने १९६९ मध्ये मुंबईत जोरदार आंदोलन केले होते. तेव्हाच्या राज्यकर्त्यांची ‘तख्तलालसा विरुद्ध शिवसैनिकांची तत्त्वनिष्ठा’ असा सामना तेव्हा झाला.
मुंबई पेटली. ‘शिवसेना’प्रमुख बाळासाहेब ठाकरे १३ दिवस जेलबंद होते. पोलिसी गोळीबारात ६१ शिवसैनिक मारले गेले. आंदोलन संपले. ‘शिवसेना’ची ताकद वाढली. पण Border issue सीमाप्रश्न सुटला नाही.
१९९५ मध्ये युतीच्या सरकारमध्ये ‘शिवसेना’चे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यावर ‘आर या पार’ अशा निर्धाराने Border issue सीमाप्रश्न सोडवतील, असे वाटत होते. पण भ्रमनिरास झाला.
२००० मध्ये बेळगावला ‘अ.भा. मराठी साहित्य संमेलन’ झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. य. दि. फडके होते. त्यांनी आपल्या भाषणात Border issue ‘सीमाप्रश्नाला सर्वोच्च न्यायालयात न्यावे !’ अशी राज्य सरकारला सूचना केली. तेव्हा राज्यात ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस’चे आघाडी सरकार होते.
केंद्रात ’भाजप आघाडी’चे वाजपेयी सरकार होते. कर्नाटकात देवेगौडा यांच्या ‘जनता दल’चे सरकार होते. थोडक्यात, ‘भाजप’ला कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात अडचणीत आणण्याचा हा पेच होता. हा पेच पक्का करण्यासाठी ‘अ.भा.मराठी साहित्य महामंडळा’तर्फे मुंबईत आझाद मैदान येथे साहित्यिकांचे एक दिवसाचे धरणे जाहीर झाले.
साहित्यिक मंडळींच्या मर्यादा स्पष्ट असल्याने ‘संयुक्त महाराष्ट्र’ लढ्यात सहभागी झालेल्या दिनू रणदिवे, मधू शेट्ये,नारायण आठवले आदि ज्येष्ठ पत्रकारांनी ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’तर्फे लोकजागृतीची मोहीम राबवून साहित्यिकांचे आंदोलन अधिक व्यापक केले. त्यासाठी निर्माण केलेल्या ‘समिती’चा मी निमंत्रक होतो. तेव्हा दोन-तीन महिने महाराष्ट्रभर दौरे करून या आंदोलनात महाराष्ट्रातल्या पत्रकारांना, शाहिरांना व त्यांच्या संस्था-संघटनांना जोडले.
परिणामी, तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह त्यांचे अवघे मंत्रिमंडळ, विरोधी पक्षनेत्यांसह ‘आझाद मैदाना’वर धरण्याच्या ठिकाणी आले. भाषणं झाली; निवेदन घेतले आणि मान्य केल्यानुसार दिलेल्या कालमर्यादेत सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. तिथे तो कर्नाटकी हेकेखोरीच्या थपडा खात गेली २० वर्षे निकालाची वाट पाहातोय.
सध्या केंद्राप्रमाणे कर्नाटकातही ‘भाजप’चे सरकार आहे. ‘फडणवीस सरकार’च्या काळातही ‘केंद्र सरकार’कडून करवून घ्यायच्या कामाच्या यादीत Border issue ‘सीमाप्रश्न’ वरच्या क्रमांकावर होता.
ह्याचे फडणवीस यांना स्मरण देऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकरवी सीमाप्रश्नाचा सोक्षमोक्ष का लावत नाही? त्यांची महाराष्ट्रनिष्ठा का तपासत नाही? ६१ शिवसैनिकांच्या हौतात्म्याला स्मरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी Border issue सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीत लक्ष घातले पाहिजे.
अयोध्येतला ‘राम जन्मभूमी मंदिर निर्माण’चा अवघड प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार, उभय पक्षात कोर्टाबाहेर चर्चेच्या फेर्या होऊन सामोपचाराने सुटतो. मग तेवढाच जुना असलेला महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न त्याच पद्धतीने का नाही सुटणार ? ‘मोदीजी है तो सब मुमकिन है!’
जनतेला ‘महाविकास आघाडी सरकार’कडून महाराष्ट्राचे कुठले तरी एक दुखणे दूर व्हायला हवेय. ते मुंबई-पुणे शहरात परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्याचे असेल; मराठी भाषेच्या/शाळांच्या मृत्यूभयाचे असेल; सीमाप्रश्नाचे असेल; अथवा मराठवाडा- विदर्भ- कोकणच्या विकास उपेक्षेचे असेल ! महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस यांची ही आग्रही अपेक्षा आहे. या अपक्षापूर्तीसाठी राज्यकर्त्यांनो, थोडे तरी घ्या कष्ट !
जय महाराष्ट्र !
ज्ञानेश महाराव
Also Visit : https://www.postboxindia.com
Also Visit : https://www.postboxlive.com
Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :
https://www.youtube.com/channel/UCto0…
Subscribe our YouTube Channel :
https://www.youtube.com/channel/UCto0…
Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.
Website : https://www.postboxindia.com
Website : https://www.posboxlive.com
Facebook : https://www.facebook.com/indiapostbox
Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox
LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia
Tumbler : https://postboxindia.tumblr.com/
Twitter : https://twitter.com/IndiaPostbox
Telegram : t.me/postboxindia
Postbox India
Anytime Everything