Shahaji Maharaj – शहाजी राजे भोसले
Shahaji Maharaj – शहाजी राजे भोसले यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन
शहाजी राजांचा जन्म १८ मार्च १५९४ रोजी मालोजीराजे व दिपाबाई ऊर्फ ऊमाबाई साहेब यांच्या पोटी झाला . मालोजी व विठोजी हे दोन भोसले बंधू प्रथमतः
फलटणच्या वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांच्या बरोबर राहात होते .मालोजीराजे यांच्या पराक्रमामुळे वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांनी आपली मुलगी दिपाबाई
मालोजीराजे यांना दिली होती. नंतर त्यांचे नाव ऊमाबाई ठेवण्यात आले. त्यांना दोन मुले एक शहाजी व दुसरे शरीफजी.
मालोजीराजे यांच्या अकाली मृत्यूनंतर शहाजीराजे वयाच्या पाचव्या वर्षीच निजामशाहीचे जहागिरदार झाले. शहाजीराजे अत्यंत देखणे व तेजस्वी होते. त्यांची कीर्ती ही
निजामशाही आणि आदिलशाहीत कदाचित इतर कुळातील सरदारापेक्षा अधिक प्रस्तुत झालेली होती. शहाजी राजांच्या आई उमाबाई या एक धाडसी , दूरदृष्टी असलेल्या
महिला होत्या .आणि त्यांच्या देखरेखीखाली शहाजीराजे घडले होते व वाढलेही होते .बालपणापासूनच राजकारण-समाजकारण त्यांना जवळून पाहता आले .
त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला युद्धशास्त्र निपुणतेचे उच्चकोटीचे अधिष्ठान लाभले होते. त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले होते .त्यामुळे ते फक्त योध्दा नसून
त्यांचे मन साहित्य संगीत याकडेही आकर्षित झाले होते.
उत्तरेकडे आणि दख्खनमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथी घडल्या त्यातच शहाजीराजांचे कर्तुत्व हे इतिहासात उजळून निघालेले दिसते . रणशौर्य हा Shahaji Maharaj शहाजीराजांच्या
जीवनाचा जन्मजात आणि अविभाज्य गुण आहे.ह्या तरुण मराठा योध्याने ,वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी ,म्हणजे इ. स.1624 ऑक्टोबरमध्ये , अहमदनगर जवळ
भातवडीच्या टेकाडबहुल प्रदेशात दोन सुलतानी महासत्तांचा एकाच दिवशी, एकाच वेळी , जंगी पराभव केला. दिल्लीच्या जहांगीर बादशहाची फौज एकवटून निजामशाही
बुडवण्यासाठी महाराष्ट्रावर लोटली होती. ती निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजांनी , आपल्या त्या मानाने अगदीच कमी असलेल्या फौजेनिशी , अत्यंत कल्पकतेने प्रचंड
मोठ्या फौजेचा कमीत कमी वेळात संपूर्ण पराभव केला.मुघल शहेनशाहने इ.स.१६२४ लष्कर खानला १.२ लाखाचे सैन्यासह निजामशाही संम्पवण्यासाठी दक्षिणेस पाठविले,
त्यास आदिलशहा ८० हजाराचे सैन्य घेऊन मिळाला.
शहाजीराजांकडे Shahaji Maharaj २० हजाराचे सैन्य होते. त्यातील् १० हजार अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेऊन, १० हजार त्यांनी स्वत:कडे ठेवले. एवढ्या मोठ्या सैन्याला प्रचंड पाणी लागेल
म्हणून मुघल आणि आदिलशाही सैन्याने उत्तर-दक्षिण वहाणाऱ्या मेखरी नदीजवळ भातवडी येथे छावणी उभी केली. एरवी दुष्काळी असलेल्या अहमदनगरला तेव्हा चांगला
पाऊस झाला होता. शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला असे तडे पाडले, की रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीला काही कळण्यापूर्वीच छावणीची
वाताहात झाली. अनेक योद्धे शहाजीराजांचे बंदी झाले, अणि शहाजीराजांचे नाव भारतवर्षात दुमदुमले. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले.
भातवडी हे गावं अहमदनगर पासून १५ किमी अंतरावर आहें.
Also Visit :https://www.postboxlive.com