दि.२४ एप्रिल १७०५ या दिवशी Yesubai ranisaheb महाराणी येसूबाई राणीसाहेबांनी मोगलांच्या कैदेतून आर्थिक अडचणी नंतर चिंचवडच्या मोरया गोसावी यांना लिहीलेले पत्र .
Yesubai ranisaheb येसूबाई राणीसाहेब छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर अत्यंत बिकट परिस्थितीत मोगलांच्या स्वाधीन झाल्या होत्या .
औरंगजेबाने त्यांची खास व्यवस्था केली होती. Yesubai ranisaheb येसूबाई राणी साहेबांच्या बरोबर कैदेत राजघराण्यातील अनेक लोक होते.
वारंवार होणारी आक्रमणे ,छावणीतील लवाजम्याचा खर्च, त्यात भर म्हणून कैद्यांची व्यवस्था आणि मोगलांकरीता उत्तरेकडून कडून येणारे अन्नधान्य, खजिना मराठे मधेच अर्ध्यापेक्षा जास्त लुटत असल्याने औरंगजेबाची आर्थिक स्थिती खालावत चालली होती .
आपल्या राजधानी पासून दूर असलेल्या या मोगल बादशहाला महाराष्ट्रात आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला होता.
औरंगजेब Yesubai ranisaheb येसूबाई व शाहू महाराजांना सुखसोयी पोहचवत असला तरी छावणीतील इतर लोकांप्रमाणे येसूबाई राणीसाहेब व शाहूराजे यांनाही आर्थिक गोष्टीचा सामना करावा लागत होता.
यावेळी Yesubai ranisaheb येसूबाई राणीसाहेब व शाहूराजे अहमदनगरच्या किल्ल्यात होते. दुष्काळी परिस्थितीची झळ आपल्याला लागत आहे, तेव्हा कर्जरूपाने मदत करावी असे पत्र येसूबाई राणीसाहेबांनी चिंचवडकर देवांना लिहिले होते.
हे पत्र २४ एप्रिल १७०५ मध्ये लिहिले आहे. या पत्रातून छावणीतील आपल्या दयनीय आर्थिक स्थितीचे वर्णन करून येसूबाई राणीसाहेबांनी चिंचवडकर देवांकडे मदतीची याचना केली आहे. हे पत्र म्हणजे Yesubai ranisaheb येसूबाई राणीसाहेबांच्या साहित्यविषयक गुणांचा एक नमुनाच म्हणावा लागेल.
हे पत्र पुढील प्रमाणे होते –
॥ श्री शंकर ॥
राजश्री श्री देव स्वामींचे सेवेसी श्रीमत परमपूज्य
तपोनिधी
मुक्तीदायक सकलगुणालंकरण देव वरदमूर्तीपरायण राजमान्य राजश्री आज्ञाधारक सेवेसी मातोश्री Yesubai ranisaheb येसूबाई दोनी करकमल जोडून चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार विनंती, उपरी येथील क्षेम तागाईत वैशाख शुद सप्तमी गुरूवार जाणऊन मुकाम अहमदनगरी दुर्गात स्वामींच्या आशीर्वादेकरून यथास्थि असे स्वकिय कुशलेलखन – आज्ञा केली पाहिजे.
विशेष बहुत दिवस जाले .स्वामींनी आशीर्वादपत्र पाठवून बालकाचा परामर्श केला नाही. याकरिता चित्तास स्वस्थता होत नाही ते देव जाणे.
तरी स्वामिंनी येणारा मनुश्या बरोबरी प्रतिक्षणी आशीर्वाद पत्र स्वामींपाशी सत्यच लेखन केले पाहिजे. चिरंजीव दाजी तो पृथ्वीपती समागमे गेले. आम्हास सार्वभोमाची आज्ञा झाली की ‘अहमदनगर जावे ‘आज्ञांप्रमाणे आम्हास अहमदनगरास घेऊन आले तेथे आलियावरी आजी पांच मास झाले. परंतु खर्चाची बहुत तंगचाई जाली. काय निमित्त तरी सार्वभौम दूर गेले.
Also Visit : https://www.postboxlive.com