Ga Di Madgulkar – कै.गदिमा तथा ग.दि.माडगूळकर यांची आज जयंती
1/10/2021,
मरावे परी गीतरुपी उरावे !! माणदेशा सारख्या दुष्काळी भागात जन्मलेल्या तरीही कवितेची हिरवळ वाढविणारे, कथाकार नाटककार अभिनेते संगीतकार,चित्रपटनिर्माते पटकथाकार दिग्दर्शक राजकारणी माजी आमदार, कवी शाहीर भावगीत कार लावणी कार अभंगकार_समरगीतकार सर्वांचे लाडके कै.गदिमा तथा ग.दि.माडगूळकर Ga Di Madgulkar यांची आज जयंती त्यांचा जन्म शेटेफळ ह्या गावचा. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरिबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात आले. लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा.विनायक दिग्दर्शित ‘ब्रम्हचारी’ (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोटया भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिध्द साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. ‘नवयुग चित्रपट लि.’ ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. नवसंह पिक्चर्सच्या ‘भक्त दामाजी’ (१९४२) आणि ‘पहिला पाळणा’ (१९४२) ह्या चित्रपटांनी गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या ‘लोकशाहीर रामजोशी’ (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहिली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली; गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून Ga Di Madgulkar दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते ‘चैत्रबन’ (१९६२) ह्या नावाने संग्रहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिध्द झालेल्या आहेत. (तीन चित्रकथा, १९६३). ‘युध्दाच्या सावल्या’ (प्रयोग, १९४४) ह्या नावाने एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. संगीतामधील बहुतेक प्रकारात त्यांनी गीते लिहिली लावणी , भावगीत हे तर त्यांचे होम पिछ ,त्यांनी लिहिलेली शेकडो गीते आजही लोकांचे तोंडी अहेत. Ga Di Madgulkar गदिमा आणि गीतरारामायण हे समीकरण झाले. त्याची अवीट गोडी कधीही न संपणारी आहे . कै शंकर पाटील-द मा मिरासदार -व्यंकटेश माडगुळकर यांचे कथाकथन म्हणजे मेजवानीच असे