- diwali 2022
Diwali 2022 – “दिवाळी – बळीमहोत्सव”
diwali 2022 – दिवाळी हा सण भारताच्या बहुतांश भागांतून तर साजरा केला जातोच,पण त्याबरोबरच भारतीय लोक जगातील ज्या विविध देशांतून स्थलांतरित झाले आहेत आणि तेथे तात्पुरते वा कायमचे वास्तव्य करीत आहेत,त्या त्या ठिकाणिही तो साजरा केला जातो.हा सण अतिशय लोकप्रिय असा असून तो आपल्या संस्कृतीमधील अनेक घटनांशी संबंधित असल्यामुळे अनेक सणांचा एक समुच्चय असे त्याचे स्वरूप बणले आहे.
आपल्याकडे ऋतूंची गणना करतांना सहा ऋतू मानण्याची एक पद्धत आहे.प्रत्येक ऋतूचा काळ दोन महिण्यांचा मानला जातो.या गणनेनुसार आश्विन आणि कार्तिक या दोन महिण्यांचा मिळून शरद ऋतू मानला जातो.हा ऋतू सफलतेचे,समृद्धीचे आणि स्वप्नपूर्तीचे प्रतिक बनला आहे.प्राचीन भारतात शरद ऋतूपासून नव्या वर्षाची गणना करण्याची पद्धत होती.म्हणूनच ‘जीवेत् शरद: शतम्’ अशी सदिच्छा देण्याची प्रथा आपल्याकडे होती आणि आहेही.या ऋतूमध्ये पावसाळ्याची तीव्रता संपलेली असते.आकाश निरभ्र झालेले असते.नद्यांचे पूर ओसरल्यामुळे त्यांचे पाणी स्वच्छ आणि पारदर्शक बनलेले असते.महत्वाची गोष्ट म्हणजे खरीपाची बरीच पिके निघालेली असतात वा निघण्याच्या बेतात असतात.याचा अर्थ हा वर्षातील पहिल्या सुगीचा आणि परिपक्वतेचा काळ असतो.त्यामुळे समाधानाचे वातावरण पसरलेले असते.स्वाभाविकच,आनंदोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने हा काळ अनुकूल असतो. विविध पक्वान्ने,नवे कपडे,दिपांच्या रांगा इ. मार्गांनी लोक हा आनंद व्यक्त करतात.
महाराष्ट्रामध्ये शेतकर्याला बळीराजा म्हटले जाते.हा शेतांमधील सुगीचा काळ असल्यामुळे या काळात भारतीयांचा प्रेरणापुरुष असलेल्या बळीराजाच्या आठवणी निघणे स्वाभाविक आहे.खरे तर diwali 2022 दिवाळीचा हा सण अतिशय कृतज्ञतापूर्वक बळीमहोत्सव साजरा करण्याचा आहे. त्याचे मुळचे स्वरूप बळीराजाला आणि कृषीला केंद्रस्थानी ठेवून निश्चित करण्यात आले आहे.सध्या साजर्या केल्या जाणार्या दिवाळीमध्येही कार्तिक शुक्ल प्रतिपदा ही बलीप्रतिप्रदा म्हणून साजरी केली जाते आणि कार्तिक शक्ल द्वितीयेला भाऊबीज साजरी करण्याच्या दिवशी बहिण भावाला ओवाळताना ‘इडा पिडा टळो आणि बळीच राज्य येवो’ अशी सदिच्छा अंत:करणपूर्वक व्यक्त करते.याचा अर्थ केरळमध्ये ज्याप्रमाणे सुगीचा सण असलेला ‘ओणम्’ साजरा केला जातो,तशेच diwali 2022 दिवाळीचेही स्वरुप आहे.
आश्विन कृष्ण द्वादशी हा दिवाळीचा पहिला दिवस होय.या द्वादशीला ‘गोवत्सद्वादशी’ वा ‘बसुबारस’ असे म्हणतात.या दिवशी गाय आणि वासरू यांची पुजा करण्याची पद्धत आहे.या काळात ज्याप्रमाणे शेतांमधील धान्य घरी आलेले असते,त्याप्रमाणे दूधदुभतेही विपूल प्रमाणात मिळत असते.कृषीसंस्कृती आणि पशुपालनसंस्कृती यांचा निकटचा संबंध आहे.स्वाभाविकच,दिवाळीच्या या पहिल्या दिवशी आपल्याला दूधदुभते देणार्या गायीगुरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते शिवाय कृष्णाचा गायी आणि वासरे यांच्याशी जो जिव्हाळ्याचा संबंध होता,त्याचे स्मरणही या निमित्ताने केले जाते.
आश्विन कृष्ण त्रयोदशीला ‘धनत्रयोदशी’ म्हटले जाते.माणसाला आनंदाने उपजीविका चालविण्यासाठी धनाची आवश्यकता असतेच.ते एक अतिशय महत्वाचे साधन आहे.कष्ट करून योग्य मार्गाने मिळविलेले धन हे मानसाला सुरक्षितता,स्वावलंबन,स्वातंत्र्य आणि आनंद देणारे असते.अशा धनाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे,हा धनत्रयोदशीचा अभिप्रेत अर्थ आहे.या दिवसाचे एक वेगळे महत्वही आहे.वैदिक परंपरेमध्ये दक्षिण दिशा अशुभ मानण्यात आली आहे.यामागे एक सांस्कृतिक इतिहास आहे.वैदिक लोक आणि त्यांना विरोध करणारे बळी वगैरेंचे अनुयायी यांच्यामध्ये एक दीर्घकाळ संघर्ष चालू होता.
बळीचे अनुयायी दक्षिणेकडे सरकले होते.ते यज्ञयागांना विरोध करणारे होते.युद्धे होत,तेव्हा ते दक्षिणेकडून हल्ले करीत असत.वैदिकांना या हल्ल्यांची भिती वाटत असे.म्हणून ते भितीपोटी दक्षिण दिशेला अशुभ मानू लागले होते.दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा लावू नये,अशी प्रथा रूढ करण्याइतका दक्षिण दिशेचा धसका त्यांनी घेतलेला होता.धनत्रयोदशीच्या दिवशी जाणीवपूर्वक दक्षिणेकडे तोंड करून दिवे लावले जातात.याचा अर्थ हा दक्षिण दिशेचा आणि तिकडे राहणार्या अवैदिक लोकांचा गौरव करण्याचा उत्सव ठरतो.
diwali 2022 ….दिवाळीच्या सणामध्ये आश्विन कृष्ण चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ या नावाने प्रसिद्ध आहे.प्राचीन भारतात नरक नावाचे अनेक राजे होऊन गेले आहेत.त्यांच्यापैकी वैदिक इंद्राचा विरोधक असलेला अतिशय सामर्थशाली,गुणसंपन्न आणि भ्रामक कर्मकांड वगैरेंना नाकारणारा एक महान राजा होऊन गेला आहे.तो राजा इंद्राच्या संस्कृतीपेक्षा पर्यायी अशी एक निकोप संस्कृती जपणारा होता.नरक चतुर्दशी हे नाव या राजाच्या नावावरूनच प्राप्त झाले आहे हे उघड आहे.
https://www.postboxindia.com/diwali_2022/