Bababsaheb Ambedkar डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिनांक १४ एप्रिल १८९१ मध्ये रामजी व भिमाबाई यांच्या पोटी झाला.रत्नागिरी जिल्ह्यातील, मंडणगड जवळचे आंबवडे हे त्यांचे मुळ गाव .
कोणाचा जन्म कोठे व्हावा हे कोणाच्या हाती नसते. आपल्या जीवनाचा जन्मपूर्व संदर्भ नियती ठरवित असते. जन्माबरोबर येणाऱ्या उपाधी स्विकारुन जीवन यात्रेला माणसाला प्रारंभ करावा लागतो, असे Bababsaheb Ambedkar डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना निश्चित माहिती होते.
त्यावेळच्या सामाजिक स्थितीमुळे अस्पृश्य समाजाचे जीवन मातीमोल झाले होते .सरकारी चांगल्या नोकऱ्या, प्रतिष्ठित धंदे, अथवा पोलिस खात्यात त्यांना प्रवेश मिळत नसे.
हलकी सलकी कामे करून पोटाची खळगी त्यांना भरावी लागत होती. धार्मिक , शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक या व्यवसायिक बंधनामुळे हा समाज अगदी माणुसकीहीन झाला होता.
हिंदू समाजाचा तो घटक असूनही अस्पृश्याला दारिद्र्यात आणि उपासमारीत जीवन जगावे लागत होते. त्या काळाच्या सामाजिक परंपरेमुळे व विध्वंसक रुढीच्या वरवंट्याखाली हा सर्वच्या सर्व समाज रगडून ,भरडून निघाला होता.
दुःख ,दारिद्र्य आणि दास्य यांच्या चिखलात युगानुयुगे गाडून टाकला गेला होता.
थोर पुरुष राजवाड्यात जसे जन्माला येतात तसे झोपड्यातही जन्माला येतात.हे Bababsaheb Ambedkar डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेले होते.
Bababsaheb Ambedkar आंबेडकरांचे अलौकिकत्व अनन्यसाधारण होते . ज्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्या कुटुंबातील शंभर पिढ्या या अत्यंत वाईट रीतीने वागविण्यात आल्या होत्या. त्यांचा स्पर्श अमंगल मानला जात होता.
Also Read : https://www.postboxindia.com/marathi-नवी-मुंबई-चे-संग्राम-पाट/