writer editor संपादकाचं आजच्याएवढं सुमारीकरण झालं नव्हतं. संपादक म्हणजे वेगळ्या जगातली आसामी, असं वाटण्याचा तो काळ होता.
त्यात पुन्हा महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ताचे writer editor संपादक म्हणजे परग्रहावरचे प्राणी असल्याचाच समज होता. काळ बदलला.
सगळ्यांचंच वेगानं सुमारीकरण झालं त्याला संपादक मंडळीहीही अपवाद राहिले नाहीत. किंबहुना सुमारपणा आणि विलक्षण लवचिकता ही तर संपादकांची वैशिष्ट्येच बनली.
माझ्यासारख्या कोल्हापुरातल्या पत्रकाराची संपादकांसंर्भातली भावना वेगळी नव्हती.
आधी तळवलकर, गडकरी आणि नंतर टिकेकर, केतकर ही आमच्यादृष्टीनं सर्वोच्च शिखरं होती.
नंतरच्या काळात निखिल वागळे यांच्या वेगळ्या शैलीचं आकर्षण वेगळंच होतं.
आपण पामरांनी ही शिखरं दुरून अनुभवायची अशीच धारणा आणि परिस्थितीही होती.
पण घटना अशा घडत गेल्या की या थोर संपादकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले.
मी सकाळमध्ये असताना एकदा writer editor टिकेकरांचा फोन आला तेव्हाचा आनंद शब्दात सांगता येणारा नव्हता.
२००३ मध्ये लोकमतची कोल्हापूर आवृत्ती सुरु करायची होती, तेव्हा मी लोकमतमध्ये यावे अशी ऋषी दर्डा यांची इच्छा होती.
मी सकाळमध्ये कोल्हापूरहून मुंबईला येऊन दोन अडीच महिने झाले होते.
मी मुंबईत असल्यामुळं ऋषी दर्डा यांनी टिकेकरांना आधी माझ्याशी बोलून घ्यायला सांगितलं होतं आणि तिथून त्यांच्याशी दोस्ताना सुरू झाला होता.