ED – ईडीच्या नोटीसा आल्या म्हणून बंड झाल हे अर्धसत्य आहे.
बंड करायला प्रवृत्त व्हाव, दुसरा मार्गच दिसू नये म्हणून ED – नोटीसा आल्यात.
आस्तेकदम सगळ्या बाजूनी कुंपण लावून मंडळी जाळ्यात अडकवली गेलीय.
“ संघाच स्वातंत्र्यलढ्यात असणार योगदान काय ? “ असा प्रश्न विचारला तेव्हाच उद्धव ठाकरेंच सरकार आणि राजकारण संपवण्याचा आटोकाट आणि कुठल्याही थराला जाऊन संघ प्रयत्न करणार हे नक्की ठरलेलं होत.
कशासाठी ?
पहिली बाब.
फडणवीस काळात गृहमंत्रालय त्यांच्याकडे होत, त्यांच्या काळाच्या सुरुवातीला जज लोयांचा मृत्यू झाला.पाच वर्षात फडणवीसांनी गृह खात कुणालाही दिल नाही.
नंतर आलेल्या गृहमंत्र्यांना ED – ईडीचा फास बसला. सतीश उके वकिलांनी त्याबद्दल शब्द काढला, फडणवीसांच्या निवडणूक शपथपत्राची केस काढली, उकेंवर ED – ईडीची संक्रांत आली.
अमित शहांचा राजकीय पटलावर मागची झेंगट बाजूला काढून गृहमंत्री म्हणून प्रवास नंतर सुरु झाला.तरीही महाराष्ट्र पोलिसांकडे किंवा गृहखात्याकडे असणाऱ्या महत्वाच्या माहितीची टांगती तलवार आहेच.
महाराष्ट्राची सत्ता हातात ठेवण्याच एक महत्वाच कारण हे आहे.कदाचित इच्छा नसूनही फडणवीसांची मदत अमित शहा या कारणासाठी करत असावेत.
या बाजूला असणारा अजून एक कोन म्हणजे समृद्धी , जलयुक्त शिवार, चिक्की सारख्या अनेक बाबी फडणवीसांना सतत अस्वस्थ करणाऱ्या आणि त्यांची कथित स्वच्छ राजकारणी इमेजच्या चिंधड्या करणाऱ्या आहेत,
या बाबी दाबून टाकायला सत्तेची कवचकुंडले गरजेची.
दुसरी बाब
आर्थिक, औद्योगिक पातळीवर महाराष्ट्र अग्रेसर आहे, तिथून मिळणारा महसूल महत्वाचा आहे.सगळ्याच प्रकारचा.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून राजकीयदृष्ट्या सजग असणारी राज्य किंवा प्रांत अशी ओळख असणारे भाग महाराष्ट्र, बंगाल, बिहार आणि पंजाब.
संघाच्या सरसकटीकरणाराला विरोधाचा झेंडा उभा राहू नये यासाठी इथली सत्ता महत्वाची. संघाच्या विरोधातली राजकीय आघाडी उभी झाली
तर सगळ्या प्रकारची, कार्यकर्ते, आर्थिक, वैचारिक रसद पुरवू शकणारे पक्ष आणि नेते म्हणजे ठाकरे आणि पवार. त्यांच्या सत्तेची कवचकुंडल काढून टाकायची धडपड त्यासाठी.
तिसरी
हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख असणारे पक्ष दोनच आहेत. सेनेला फोडणे, बदनाम करणे, विस्कळीत करणे आणि शक्तिपात घडवून आणणे संघाला अनिवार्य आहे.
पहिल्या युतीचा उद्देश तेव्हापासूनच तो होता, आता तो मूर्त स्वरुपात दिसायला लागलेला आहे. हिंदुत्वाचा ब्रँड आणि मतपेढी फक्त आपल्या खिशात पाहिजे यासाठी हि सगळी धडपड.
चौथी बाब
मोदी शहा आणि संघाला राज्यांच्या निवडणुकापेक्षा २०२४ ची निवडणूक जास्त महत्वाची वाटते.
पाकिस्तान-पुलवामा-चीन यांच सरप्राईज एलेमेंट संपलेलं आहे. लोकांना हा खेळ करणार हे ठाऊक आहे.महाराष्ट्रात असणारी खासदारांची संख्या मोठी आहे.
निवडणुकीत सगळ्याच बाबींच व्यवस्थापन करायला स्थानिक सत्ता हातात असणे गरजेचे आहे.
या बाबींचा विचार करता कोर्टकज्जे होऊन भलेही महिना लागेल पण आघाडी सरकारला भाजप पाडणार आणि सत्तेत येणार.
बंड करणारी मंडळी ओटीपी आहेत ( ज्येष्ठ पत्रकार अभय दुबे यांचा शब्द ) वन टाईम पासवर्ड टाकला कि आपण डिलीट करून टाकतो.
हवतर ज्योतिरादित्य, पाचपुते, कोल्हे, विखे, हर्षवर्धन , राणे कुणालाही विचारा. आपल्यामागे ED – ईडी नाहीये हाच त्यांच्यासाठी मोठा बहुमान आहे.
आपण राजकारणात आहोत एवढच समाधान यापुढे बंडकरी मंडळीना राहील.
उद्धव ठाकरेंनी वापरलेली म्हण अचूक होती, ‘ कुऱ्हाडीचा दांडा , गोतास काळ ‘ सरकार स्थापन झाल, नव्या गटाच्या चौकटीत बंडकरी अडकले कि त्यांची उपयुक्तता शून्य होईल.
हे आज त्यांना कदाचित उमजलेल असेलही पण परतीचे दोर कापले गेलेले आहेत.
महाराष्ट्र धर्माची लढाई यापुढे फक्त आघाडीची उरलेली नाही. महाराष्ट्र धर्म ज्यांना समजतो त्या प्रत्येकाची आहे.
उत्तरेच आक्रमण थोपवण्याची कुवत आणि हिंमत फक्त महाराष्ट्राची आहे , मात्र हि लढाई फक्त राजकीय नाही किंवा राजकीय नेत्यांची पक्षाची नाही तर तर अजित डोभाल यांच्याच भाषेत तितकीच गंभीर आणि सर्वंकष अशी सिव्हील सोसायटीची सुद्धा आहे.
हिंदीभाषिक गायपट्टा भाषिक, सांस्कृतिक , राजकीय आक्रमण करत असताना आपण मराठी भय्ये, भय्यीन बनून राहायचं कि महाराष्ट्र धर्म टिकवायचा आपला प्रश्न आणि निर्णय.