rss – संघाला काळी टोपी दाखवली
उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये महाराष्ट्राची मान भटी rss – हिंदुत्ववादाच्या पकडीतून मुक्त केलीच आहे.
२०१४ ते २०१९ या काळात उद्धव ठाकरे यांनी जे छोटेमोठे धक्के सहन केले. त्यापेक्षा २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणूकपूर्व आघाडी करून आणि
निवडणूक निकालानंतर मोडून ‘भाजप’, rss – ‘रा.स्व.संघ’ आणि देवेंद्र फडणवीस यांना आयुष्यभर लक्षात राहील, असा धक्का दिला.
या धक्क्यातून ‘भाजप’, फडणवीस आणि त्यांची बायको पुढची अडीच वर्षे सावरलेली नाही. त्याहीपेक्षा जास्त लक्षवेधक बाब म्हणजे
उद्धव ठाकरे यांनी ‘राष्ट्रीय काँग्रेस’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस’, ‘समाजवादी पक्ष’, ‘माकप’, ‘शेकाप’ या धर्मनिरपेक्ष पक्षांची एक प्रकारची मान्यता मिळवली.
तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. आमचं हिंदुत्व एत्तदेशीय आहे. बहुजनवादी आहे. rss – शेंडी- जानव्याचे नाही, असं बोलत त्यांनी संघाच्या दुटांगी धोतराच्या हिंदुत्वालाही हात घातला.
अलीकडच्या एका सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, rss – ‘संघाची टोपी काळी का ?’ हे वाक्य जबरी होते. अगदी शब्दबाणाने तुटून पडणाऱ्या त्यांच्या आजोबांनीसुद्धा हे वाक्य वापरले नव्हते.
संघावर असा हल्ला ‘काँग्रेस’ वा इतर प्रागतिक पक्षांनी केला नव्हता. rss – ‘संघ’, ‘भाजप’, फडणवीस तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्यावर भयंकर चिडून होते.
काहीही करून ‘शिवसेना’, उद्धव ठाकरे, त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांचा पाडाव केल्याशिवाय तरणोपाय नाही, म्हणून
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात थेट आदित्य ठाकरे यांना गोवण्याचा प्रयल झाला. तो अयशस्वी होताच;
‘सीबीआय’, ‘ईडी’ या केंद्रीय यंत्रणांना महाराष्ट्रात आणून ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ आणि ‘राष्ट्रीय काँग्रेस’ला टार्गेट केले. दोन मंत्र्यांना तुरुंगात टाकले.
पाच-पंचवीस आमदार- खासदारांना ‘ईडी’, ‘सीबीआय’, ‘इन्कम टॅक्स’ नोटिसा पाठवून घाबरवून सोडले.
तरीही राहिलेले लोक घाबरले तरी शरण येत नाहीत म्हटल्यावर जून महिन्यात राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सत्तातंर घडवायचेच,
असा मुहूर्त मुक्रर केला. कट्टर शिवसैनिक म्हटल्या जाणार्या एकनाथ शिंदेंची फुटीरांचा सरदार म्हणून निवड केली.
हे बारभाई किंवा साडेतीन शहाण्यांचे कारस्थान खूप आधीपासून सुरू होते. उद्धव ठाकरे यांना याची कुणकुण होतीच. त्यांनी एकनाथ शिंदेंची तपासणी केली होती.
पण शिंदे त्यांच्या पूर्वीच्या वर्तणुकीच्या विरुद्ध म्हणजे निष्ठावान शिवसैनिकाऐवजी दगाबाज बाजारू माणसासारखे वागले.
राजकीय परंपरा, विचार, कायदा, परिणाम यांचा विचार न करता तात्पुरती सोय म्हणून आपल्यासोबत १५ ते २० जणांच्या राजकीय कारकीर्दीची जन्मभराची माती करताना दिसले.
आजच्या घडीला त्यांचे बंड कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. ते कधी आणि कसे यशस्वी होईल की तोंडावर आपटावे लागेल, हे आज सांगता येणार नाही.
अलीकडच्या काळात न्यायपालिकेचा इतिहास बघितला तर खात्री बाळगावी, असा नाही. खर्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणावे,
असे लोक तिथे न्यायाची तागडी घेऊन बसलेले नाहीत. पण आज संशय घेता येणार नाही.
आणि समजा फडणवीस- शिंदे यांच्या कंपूला यश आलेच तर सत्तेत बदल होईलही. पण ती सत्ता किती दिवसांची ? फार तर दोन वर्षांची !
उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये महाराष्ट्राची मान rss – भटी हिंदुत्ववादाच्या पकडीतून मुक्त केलीच आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचा प्रखर ब्राह्मणेतरवाद,
हिंदुत्ववाद, बाळासाहेब ठाकरे यांचा रस्त्यावर उतरून लढायचा देशी हिंदुत्ववाद, ‘काँग्रेस’ पक्षाचा सर्वसमावेशक विचार आणि इतर पक्षांचा मध्यममार्गी,
डावीकडे झुकणारा प्रागतिक विचार यांना महाराष्ट्रात एकत्र आणायची संधी निर्माण केली आहे. सत्तेशिवायचा विचारांचा संघर्ष अधिक देदीप्यमान असतो.
उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी आणि इतरही नेते महाराष्ट्रात ताकदीने एकत्र येतील. देशातही येतील. संघर्षात सातत्य असेल तर
एकसुरी, एकपक्षीय, एकविचारी दादागिरी कधीतरी मोडतेच मोडते. महाराष्ट्रातल्या या सत्तासंघर्षात त्याच्या पाऊलखुणा जनमानसात दिसत आहेत.