rajiv gandhi khel ratna award – राजीव गांधीं
rajiv gandhi khel ratna award – डिजिटल इंडिया – संजय आवटे
राजीव गांधींनी ‘डिजिटल इंडिया’चा नारा दिला,
तेव्हा मोदींची गॅंग गाईच्या शेणात पार बुडालेली होती.
१९८४ मध्ये विक्रमी बहुमतासह राजीव भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा ते अवघ्या चाळीस वर्षांचे होते. आणि, तरुणाईचा भारत घडवण्यात मग्न होते.
तो काळ म्हणजे जागतिकीकरणाची गर्भारभूमी होती. जग बदलत होते. जुने कोसळत असताना, नवे काही उभे राहात होते. राजीव यांना या बदलाचे नेमके भान होते. जिल्ह्या-जिल्ह्यात नवोदय विद्यालये उभी करणा-या राजीव यांना नव्या तंत्रज्ञानाची व्याप्ती समजली होती आणि त्या मागचा विज्ञाननिष्ठ आशयही समजला होता. नियतीशी दुसरा करार राजीव करू पाहात होते.
आज जी ‘डिजिटल इंडिया”ची चर्चा सुरू आहे, त्याचे जनक राजीवच. जगाने त्यांचे नेतृत्व स्वीकारावे, अशी ‘तरूण’ मांडणी तेव्हाच ते करत होते.
सॅम पित्रोदांसोबत राजीव यांनी कॉम्प्युटर युगाला भारतात वाट करून दिली, तेव्हा जे संसदेवर ‘बैलगाडी मोर्चे’ काढत होते, ते आज आम्हालाच ‘डिजिटल इंडिया’ समजावून सांगताहेत.
ज्यांची पोरं आज ‘सिलिकॉन व्हॅली’त आहेत, ते तेव्हा मात्र ‘संगणक हा भारतीय संस्कृतीवरचा हल्ला आहे’, असं सांगण्यात मग्न होते.
मोदींना नंतर ज्या ‘डिजिटल इंडिया‘साठी श्रेय दिलं गेलं, ती सारी नेपथ्यरचना राजीव गांधींनी तयार केली होती.
राजीव यांचे विरोधकही ते नाकारणार नाहीत.
त्यांच्याच विचारातून कॉंग्रेसने पुढे जागतिकीकरण आणि आधुनिकीकरणाला वाट करून दिली.
मतदाराचे वय २१ वर्षांहून १८ वर्षांवर आणले तेही rajiv gandhi khel ratna award राजीव गांधींनी.
कारण, त्यांचा नव्या पिढीच्या समंजसपणावर भरवसा होता.
या नव्या भारताचे जन्मदाते राजीवच.
मात्र, सामाजिक समता, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता, विवेक आणि लोकशाही मूल्यांसोबत हे नवे बदल आपल्याला करावे लागतील, यावर ते ठाम होते. तसे त्यांनी ‘युनो’मध्ये बोलतानाही सांगितले होते.
त्यामुळेच राजीव नव्या जगाचे नेते ठरले.
म्हणून तर, जागतिकीकरणाला प्रवेश देणा-या कॉंग्रेसनेच पुढे मनरेगा, मध्यान्ह भोजन, अन्न सुरक्षा अशा योजनांनाही गती दिली.
राजीव अकाली गेले नसते, तर भारताचे भवितव्य आणखी वेगळ्या शैलीत लिहिले गेले असते.
राजीव rajiv gandhi khel ratna award यांचे हे तेज आणि वलय त्यांच्या समर्थकांपेक्षाही विरोधकांना नीट समजले होते. त्यामुळे राजीव यांची बदनामी करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. तरीही, राजीव पुन्हा पंतप्रधान होतील, हे लक्षात आल्यावर त्यांनी राजीव यांना संपवले. राजीव यांच्या हत्येचे गूढ समजेल, तेव्हा ही नेपथ्यरचना कोणी आणि का केली, हेही समजेल!
नव-याच्या आणि बापाच्या भाडोत्री मारेक-यांनाही माफ करत, त्यांच्या वारसदारांनी सहिष्णु, समंजस, सेक्युलर भारताची दिशा स्पष्ट केली.
खरा भारत तोच आहे, ज्यासाठी राजीव यांनी प्राणांची आहुती दिली !
संजय आवटे
1 Comment