जुनी पेन्शन देण्यासाठी हे सोलुशन्स सरकारला पचतयं का?
रामचंद्र सालेकर
दिनांक १४ मार्च २०२३ पासून जुन्या पेन्शनसाठी राज्यातील विविध विभागातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर आहे, संपाबाबत समाजामधून अनेक प्रकारच्या तिखट गोड प्रतिक्रिया उमटत आहे. आज आमचे मायबाप भाऊबंद शेतकरी,बेरोजगार हलाखीचे जीवन जगत आहेत तेव्हा कर्मचाऱ्यांना एवढा पगार असून पेन्शनची एवढी काय येवून पडली?अशा आणि याहीपेक्षा अत्यंत खालच्या स्तरावरील प्रतिक्रीया ट्रोल कानावर पडत आहे. साधारणता आज जे काही कर्मचारी आहे हे सर्व शेतकरी शेत मजुरांचीच मुलंमुली आहेत. वयाची अठ्ठावन वर्षापर्यंत कर्मचारी कर्ज घेवून एखाद पक्क घर बांधू शकते या पलिकडे तो काहीही करु शकत नाही. सरकारने गेल्या पंधरा वर्षापासून नोकरभरती केली नाही. एका एका कर्मचाऱ्यावर अवाजवी कामाचा तान आहे. आज जरी प्रत्यक्ष नोकरीत असणाऱ्या कर्मचाऱ्याला या लढ्याचा फायदा होणार असेल परंतु ज्या शेतकऱ्यांचा मुलगा, मुलगी अथवा आप्तेष्ट बेरोजगार आहे पुढे जावून जेव्हा केव्हा त्याला सरकारी नोकरी मिळेल तेव्हा त्यांना या संपाच्या लढ्याचा अप्रत्यक्ष फायदाच होणारं आहे. हे प्रथम जनतेनं समजून घ्यावं.