ketaki chitale – पवार, केतकी, चंगो आणि सदाभाऊ खोत
अलीकडच्या काळात शरद पवारांच्या बाबत त्यांचे पूर्ण नाव न लिहिता किंवा त्यांना इतर संबोधने वापरून सोशल मीडियामध्ये गलिच्छ पोस्ट करणे हा महाराष्ट्रातील एका विशिष्ट वर्गातील मुठभर विकृत लोकांचा पूर्णवेळ उद्योग बनलेला आहे.
कायद्याच्या भाषेत हे जरी अतीगंभीर गुन्ह्याच्या प्रवर्गात येत नसले तरीही, यातून निर्माण होणारे विखारी वातावरण समाजास आणि राजकीय संस्कृतीस अत्यंत घातक आहे. काही उदाहरणे द्यायची झाली तर चंगोने स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या दुःखद निधनावेळी त्यांच्या मृत्यूऐवजी वाकड्या तोंडाचा नेता अजुन कसा जिवंत आहे यावर दुःख व्यक्त केले होते. एखाद्याच्या मरणाची कामना करणारी अशी उच्च दर्जाची संवेदनशीलता (?) महाराष्ट्राने याधी कधीच पाहिली नव्हती.
चंगोच्याही एक पाऊल पुढे जाणारी, शिसारी यावी अशी पवारसाहेबांच्या आजाराची आणि वयाची खिल्ली उडवणारी पोस्ट आणि सोबत त्यांच्या मृत्यूची आणि त्यांना नरक मिळण्याची कामना करणारी पोस्ट ketaki chitale केतकी चितळे हिने काही दिवस आधी केली. पवारांच्या बाबतीत ह्या गोष्टी वारंवार होत आहेत याला सर्वात महत्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्र आणि देशपातळीवर भाजप आणि संघाच्या सामान्य माणसाच्या विरोधात असणाऱ्या धोरणांना आणि धार्मिक विद्वेष पसरवण्याला यशस्वीपणे विरोध करण्याचे आणि विरोधी पक्षांची एकजूट बांधण्याचे सतत प्रयत्न पवार करत आहेत.
महाराष्ट्रातून भाजपला सत्तेबाहेर ढकलत तीन पक्षांची आघाडी पवारांनी घडवून आणली हे आजही भाजपला सहन होत नाहीये. साहजिकच देव-धर्माचा, भाषेचा, जातीचा आधार न घेता सर्वसमावेशक राजकारण करणारे पवार हे भाजपचे प्रमुख शत्रु ठरतात.
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आसपास जेव्हा हिंदू-मुस्लिम दंगा भडकला होता तेव्हा गांधीजी शांतीचा आणि बंधुत्वाचा संदेश देत होते. त्या काळात गांधीजींना रावणाच्या रुपात दाखवणारे कार्टून काढणारे, त्यांच्यावर उगीचच फाळणीचा आरोप लावणारे किंवा पाकिस्तानला पैसे देण्याचा खोटा आरोप कुजबुज करून लावणाऱ्या संघाच्या विचाराचे लोकांनी गांधींच्या हत्येसाठी गोडसेसारखा माथेफिरू निर्माण करायला अत्यंत पोषक वातावरण निर्माण केले.
सरदार पटेलांनी तत्कालीन संघप्रमुख गोळवलकर यांना पत्र लिहून गांधीहत्येला पोषक वातावरण निर्माण केल्यासाठी आणि गांधींच्या हत्येनंतर मिठाई वाटून आनंद साजरा करण्यासाठी संघाला स्पष्ट शब्दात दोष दिला होता. संघ-भाजपचे ट्रोल आणि चंगो-चितळे यांच्यासारखे विकृत लोक सध्या अगदी तशाच प्रकारचे विष समाजात कालवत आहेत.
काही महिने चाललेल्या ST कर्मचाऱ्यांच्या संपात, ज्याला आम्हीही सुरुवातीला सहानुभूती व्यक्त केली होती, तिथे सदावर्तेसारखा वकील उगीचच “जय श्रीराम”च्या घोषणा देवू लागतो. काही दिवसांनी यातले काही भान विसरलेले कर्मचारी मग “सिल्हर ओक” या पवारांच्या राहत्या घरी हल्ला करतात, हे चित्र भयानक आहे. “पवारांनी जातीचे, द्वेषाचे राजकारण केले” असा आरोप राज ठाकरे करतात, ज्यावर अगदी आठवलेसुद्धा राज ठाकरेंचे म्हणणे नाकारत पवारांच्या बाजूने उभे राहतात.
गेल्या आठवड्यात एक कोवळा मराठी तरुण या प्रोपगंडामध्ये वाहत जाऊन पवारांना मारायला एखादा गोडसे निर्माण व्हायला पाहिजे असे ट्विट करतो. त्यानंतर लगेच ketaki chitale केतकीची गलिच्छ पोस्ट येते. हे सगळे अपघाताने होत नाहीये. यामागे एक सुसूत्रता दिसून येते जी फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार पुढे नेणाऱ्या शरद पवारांच्या प्रतिमेचे भंजन करण्यासाठी कायम प्रयत्नशील असणारी एक विकृत विचारसरणी दाखवते.
ketaki chitale केतकी चितळेविरोधात जेव्हा पोलीस कारवाई झाली तेव्हा बहुतांश राजकीय नेत्यांनी तिच्या विचारांचा धिक्कार केला, पण सदाभाऊ खोत इथे थेट तिच्या समर्थनात आले. ketaki chitale “केतकी कणखर आहे. तिने न्यायालयात वकील न देता स्वतःची बाजू मांडली, त्यामुळे तिला मानावं लागेल!” वगैरे कौतुक सदाभाऊनी ketaki chitale केतकीबाबत केले.
त्याहीपुढे जाऊन सदाभाऊ ketaki chitale केतकी प्रकरणाला विस्थापित विरूद्ध प्रस्थापित राजकारण म्हणत, ketaki chitale केतकीलाच पीडित बनवून टाकतात. जी केतकी फुले-आंबेडकरांबाबत काहीही लिहिते, तब्लीग जमातच्या लोकांना “बायोटेररिस्ट” म्हणते आणि स्वतःच्या जातीय माजात “आम्ही कमी आहोत, पण ज्ञानी आहोत” असे ट्विट करते, ती सदाभाऊ खोत यांना विस्थापित, पीडित आणि सोबत कणखर दिसावी? सदाभाऊ, एक MLC टिकवण्यासाठी तुम्हाला इतके लाचार व्हावे लागते, आणि ketaki chitale केतकीच्या तालावर नाचावे लागते हे पाहून तुमची कीव येते.
एक गोष्ट या गदारोळात नक्की आहे, ती ही की महाराष्ट्र सतत धुमसत ठेवायचा जो प्रकार आहे आणि त्यातून दाभोळकर, पानसरे यांच्याप्रमाणे इतर पुरोगामी राजकीय नेते आणि विचारवंत यांच्या आयुष्याचे संहारक माथेफिरू निर्माण होवू शकतात. सरकारने यावेळी ketaki chitale केतकीसारख्या विकृत लोकांना योग्य धडा शिकावलाच पाहिजे !
– डॉ. विनय काटे
Also Visit : https://www.postboxindia.com
Also Visit : https://www.postboxlive.com
Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :
https://www.youtube.com/channel/UCto0…
Subscribe our YouTube Channel :
https://www.youtube.com/channel/UCto0…
Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.
Website : https://www.postboxindia.com
Website : https://www.postboxlive.com
Facebook : https://www.facebook.com/indiapostbox
Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox
LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia
Tumbler : https://postboxindia.tumblr.com/
Twitter : https://twitter.com/IndiaPostbox
Telegram : t.me/postboxindia
Postbox India
Anytime Everything