Shivrajyabhishek din – शिवराज्याभिषेक सोहळा
shivrajyabhishek din – ३१ मे १६७४ विधि शांतीचा मुहूर्त
या दिवशी छत्रपती शिवरायांची अग्निप्रतिष्ठा करण्यात आली .यात इंद्रायणी पूजा झाली व अनुपान्गिक सर्व विधी झाल्यावर
आचार्य आणि ऋत्विक यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली. सर्व देवदेवतांना समारंभाची अक्षत गेली. महाराष्ट्राच्या आनंदाच्या, परमोच्च सुखाच्या ,
वैभवशाली सर्व शुभशकुनांनो या या ! महाराष्ट्राच्या आणि भारतवर्षाच्या देवदेवतांनो या या ! सहकुटुंब सहपरिवार या!
श्री मंगलमूर्ती मोरेश्वरा रिद्धी-सिद्धीच्या नायका, विघ्नहरा , सर्वाआधी आपण या! खंडेराया,घृष्णेश्वरा , पंढरीराया अवघे अवघे !
या हातची हजार कामे टाकून वेगे वेगे या ! वेगवेगळ्या धार्मिक विधींना प्रारंभ झाला होता. shivrajyabhishek din भाळी मळवट लेवून राजे सर्व विधीसाठी तयार होते.
रायगडावर आता जिकडे तिकडे प्रफुल्ल वातावरण विलसत होते. मंगल वाद्ये वाजत होती. राजवैभव भरून चालले होते, हे पाहून सर्वांचे डोळे तृप्त झाले होते.
विविध प्रांतातील थोर थोर विद्वान, मुत्सद्दी, कलावंत ,राजकीय अधिकारी ,कवी, वकील वगैरे व्यक्तींच्या परस्परात गाठीभेटी व परिचय घडत होते.
सकाळ- संध्याकाळ राजप्रासादात मिष्टांनाची भोजने होत होती. पाहुण्यांचे मनोरंजन करण्यात गुणीजन तप्तर होते. वाद-विवाद,
शास्त्रचर्चा वगैरे गोष्टींमुळे शास्त्री पंडितांना पर्वणी लागली होती. रायगडावर जनु दसरा-दिवाळी प्रकटली होती .
पोथ्या पुराणातून आणि हरदासांच्या तोंडून ऐकलेल्या राज नगरांच्या वैभवाचा साक्षात अनुभव सर्वांना येत होता. कुणास काही उणे पडत होते असे नाहीच.
एका दिवशी एक एक विधी पार पडत होते .सर्व शांतीचे विधी ३१ मे १६७४ रोजी पार पडले. रायगडावरचा आनंद आणि गडबड शिगेला पोहोचली होती.
रायगड म्हणजे स्वर्गीय नगरी शोभू लागली. दिवस संपून रात्र झाल्याचे भान तरी कोणाला राहिले असेल का?
अंधार वगळला तर रायगडावरची रात्र दिवसा सारखीच होती! राज मंडळातील सर्व लोकांना कामेधामें इतकी होती की,
वेळ पुरत नव्हता. shivrajyabhishek din राज्याभिषेक समारंभातील प्रत्येक विधी अत्यंत अभ्यासपूर्वक,
शास्त्रीय चिकित्सेने ठरविलेले होते .व ते अत्यंत साक्षेपाने पार पडत होते.
3 Comments