book – अरण्येर अधिकार विषयी..
इसवी सन १८९५ ते १९०५ या काळात लढल्या गेलेल्या मुंडा विद्रोहाचा नेता असलेल्या बिरसा मुंडा यांची कहाणी म्हणजे अरण्येर अधिकार हि book – कादंबरी होय. बिरसाचा
विद्रोह हा आपले जंगल, आपली उपजीविका आणि धर्म यावर आक्रमण करणाऱ्या साम्राज्यवादी सत्तेविरुद्ध आहे. सोबतच एत्तदेशीय जमीनदार वर्गाविरोधातही. सामंतशाही
व साम्राज्यशाही विरोधातील संघर्षाबद्दलची एक सुस्पष्ट भूमिका बिरसाच्या संघर्षात आहे. कुणाला तरी हाकलून लावणे एव्हढेच बिरसाचे म्हणणे नाही त्यापुढे एक घोषणा
आहे.” आबुआ: दिशोम रे अबुआ: राज” वरील परिच्छेदातील वाक्यात “आहे” का म्हणतोय “ होता”
का नाही ? “ आहे” हेच या book – कादंबरीचे बलस्थान आहे आणि मराठीत “अरण्येर अधिकार” या book – कादंबरीच्या मराठी आवृत्तीच्या पुनश्च प्रकाशनाची प्रासंगिकता आणि औचित्यही.
book – कादंबरीला लिहिलेल्या छोटेखानी भूमिकेत महाश्वेतादेवी यांनी स्पष्ट केले आहे की ,“ book – कादंबरीला स्वत:ची अशी एक अंगभूत पद्धत असते.त्यामुळे ही कादंबरी बिरसाच्या
मृत्यूपाशी थांबवावी लागली. परंतु जीवन,त्यातील संघर्ष…त्यामागचे प्राणतत्व कधीही, कोठेही नेत्याच्या मृत्यूमुळे नष्ट होत नाही ;वारसदारांच्या संघर्षमय
धडपडीतून ते अव्याहतपणे पुढे जात राहते. त्यातूनच पुढे क्रांती उभी राहते.” आज आपण जेव्हा देशभर पाहतो तेव्हा महाराष्ट्रातल्या पालघर,धुळे,गडचिरोली इत्यादी ते
मध्यप्रदेश, छत्तीसगड,झारखंड ते बंगाल ते पुढे जात पूर्वोत्तर भारतात उभ्या विनाशकारी प्रकल्पाविरोधात सुरु असलेल्या जल-जंगल- जमीन यावरील अधिकाराच्या, व
स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचे तत्व अंमलात आणण्याची मागणी करणाऱ्या ज्या लढाया सुरु आहेत त्याच्या मागील प्राणतत्व हे बिरसाची घोषणा “आबुआ: दिशोम रे अबुआ:
राज” हीच तर दिसते आहे असे आम्हास वाटते. लेखिका महाश्वेतादेवी ह्या स्वत: प.बंगाल,बिहार,मध्यप्रदेश,छत्तीसगड येथे सुरु असलेल्या
आदिवासींच्या शोषणाविरोधातील लढाईचा कायम भाग राहिल्या. सदर कादंबरी हि त्यांच्या बांधिलकीतूनच जन्माला आली. बांधिलकी आहे काहीतरी प्रचारकी लिहिले
असेही या book – कादंबरीबाबतीत घडलेले नाही. श्रेष्ठ कलाकृती ती सर्वत्र गौरविली गेली. तिचे मराठीसह अनेक भाषांत
अनुवादही झाले.
भारतीय स्वातंत्रलढ्याचा जो इतिहास आहे त्याच्या केंद्रस्थानी फक्त गांधी व कॉंग्रेस नेतृत्वाखालील याचीच चर्चा जास्त आणि प्रामुख्याने झाली आणि होतही राहते. यातून
बिरसासारख्या आमुलाग्र क्रांतीचा विचार मांडणाऱ्या,त्यासाठी भांडणाऱ्या व वयाच्या २५ व्या वर्षी शहीद झालेल्या क्रांतिकारक नेत्याचा इतिहास परीघावर
फेकल्या गेल्या. अरण्येर अधिकार सारख्या वांग्मयीन कलाकृतीनी सदर इतिहासाला केंद्रस्थानी आणण्याचे काम केले आहे.
आधार कार्ड नाही म्हणून भात-भात म्हणत मरण पत्करावे लागलेल्या आदिवासी महिलेचा तो आक्रोश आजही हृद्य हेलावून टाकतो. book – कादंबरीच्या सुरुवातीला आलेल्या दुसऱ्या
परिच्छेदात लेखिका म्हणते “ बिरसाच्या जीवनाची सूत्रेही कोणत्या ना कोणत्या रूपाने या भातानेच हलविली होती.जन्मभर तावातावाने प्रश्न उठवला तो भाताचाच. ‘
मुंडाच्या भुकेला घाटा का ? दिकून्प्रमाणे मुंडांना भात का नाही ? “ भुकेचा, आत्मसन्मानाचा, नैसर्गिक संसाधनावरील अधिकाराचा, कष्टकरी जनतेच्या राज्याचा प्रश्न आजच्या
घडीला जास्त जटील होण्याबरोबरच जरुरीचा बनला आहे.
( प्रस्तावनेतून )