ती फुलराणी तिच्या फक्त आठवणी
फुलराणी’चे ११११हून अधिक प्रयोग करणाऱ्या अभिनेत्री कै. भक्ती बर्वे इनामदार यांचा आज जन्म दिवस.
त्यांचा जन्म सांगली येथे १० सप्टेंबर १९४८ रोजी झाला. त्यांच्या शालेय जीवनात सुधा करमरकर यांच्या ‘लिटल थिएटर’मध्ये नाटकातून काम करून त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले.आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर त्यांनी निवेदिका म्हणून काम केले.
अशोक हांडे यांच्या ‘माणिकमोती’ या कार्यक्रमाचे निवेदन त्यांनीच केले. दूरदर्शनवर त्यांनी बहिणीबाई चौधरी यांची भूमिका देखील केली.दूरदर्शन वरील साप्ताहिकी तसेच वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले.त्यांनी अनेक गुजराती नाटकातूनही अभिनय केला.
कुंदन शाह यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जाने भी दो यारों ‘या विनोदी हिंदी फिल्ममधे त्यांनी नासिरुद्दीन शहा ,पंकज कपूर ,सतीश शहा यांचे बरोबर काम केले. त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले ते फुलराणीने .पु.ल. देशपांडें यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या ‘पिग्मॅलियन’ या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण म्हणजे ती फुलराणी.
पु.ल .ना हे नाटक मराठीत छान होईल असे वाटले.भाषेच्या उच्चारपद्धतीवरून ठरणार्या उच्च- नीचत्वाच्या कल्पना जगभरात रूढ आहेत हे त्यांना नाटकाच्या रूपातून दाखवायचे होते व त्यांच्या कल्पनेला भक्ती बर्वे यांनी आपल्या अभिनयातून न्याय दिला.अशोक पाटोळे यांनीलिहिलेल्या ‘आई रिटायर होतेय’ नाटकाची निर्मिती भक्ती बर्वे यांना डोळय़ांसमोर ठेवूनच करण्यात आली होती.या नाटकाचे त्यांनी ७५०प्रयोग केले.या नाटकाचा पहिला प्रयोग १७ ऑगस्ट १९८९ रोजी मुंबईच्या शिवाजी मंदिर येथे झाला होता.भक्ती बर्वे यांच्या निधनानंतर त्यांच्याऐवजी स्मिता जयकर त्या नाटकात काम करू लागल्या.त्यांनी १९७३ पासून एकूण १०० कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत. त्यात ७० हौशी आणि व्यावसायिक नाटके, १७ मराठी चित्रपट, ३ टेलिफिल्म्स आणि १० मराठी-हिंदी मालिका यांचा समावेश आहे.
त्यांना त्यांची भूमिका असलेले नाटक ‘रातराणी ‘खूप आवडायचे .‘रातराणी’ हे प्रभाकर लक्ष्मण मयेकरांचे नाटक ‘भद्रकाली’या संस्थेने २२ जानेवारी १९८७ रोजी मंचावर आणले.या नाटकात पियानोवादक अॅसना स्मिथच्या भूमिकेत भक्ती बर्वे ,तर व्हायोलिनवादक तिचा नवरा म्हणून अरुण नलावडे यांच्या भूमिका होत्या. हेच नाटक म्हणून’ रेशीमगाठ ‘हिंदीत आणले व त्याच्यातही त्यांनी अभिनय केला केली तसेच या नाटकाचाच मराठीत ‘ रेशीमगाठ ‘ म्हंणून चित्रपट करायचे ठरविले पण तो मात्र पूर्ण झाला नाही .२००२ मध्ये पूनम टेलिफिल्मतर्फे मराठी ‘रेशीमगाठ’आणि हिंदीत ‘तुम्हारा इंतजार है’ चित्रपट आले ,ज्यामध्ये अॅाना स्मिथचे काम रीमा लागू यांनी केले.‘अॅनना स्मिथ’ला त्या वर्षीची नाटय़दर्पण, नाटय़ परिषद, व्यावसायिक राज्य नाटय़ स्पर्धेत पारितोषिके मिळाली, तर महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ‘अॅलना स्मिथ’सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.
मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना इ.स. १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हिंदी चित्रपटांतील आघाडीचे सहअभिनेते शफी इनामदार यांच्याशी त्यांचा विवाह झाला.१२ फेब्रुवारी २००१ रोजी त्या वाई येथील कृष्णाबाई उत्सवास उपस्थित राहून रात्रीच मुंबईला परत गेल्या त्या कायमच्याच वाटेतच त्यांचे आयुष्यावर कायमचा पडदा पडला. ती काळरात्रच ठरली, ख़ुप चटका लावणारी घटना घडून गेली.
माधव विद्वांस